Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा  

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण Zade Lava Zade Jagva  मराठी निबंध बघणार आहोत. या 8 निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी कश्‍याप्रकारे निसर्गाचे नुकसान केेले आहे. व त्‍यावर कोणते उपाय योजले जाऊ शकता हे तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना' चा संदेश आहे.  केवळ जंगलतोडीमुळेच पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. 

गावोगावच्या नद्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. 

Zade-Lava-Zade-Jagva
Zade-Lava-Zade-Jagva



अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा'ची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? 

निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. कधी त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. 

नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने आपापल्या परिसरात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.

शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तर ही वसुधा पुन्हा 'हरितश्यामल' बनेल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व झाडे लावण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे व तुम्‍ही वृक्षप्रेमी असल्‍यास कोणत्‍या उपक्रमात सहभाग घेतला आहे हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • आजचा मानव निसर्गापासून दूर 
  • वृक्षतोड
  • प्रदूषण
  • दुष्काळ
  • पर्यावरणाचा समतोल ढळला 
  • निसर्गाकडे चला 
  • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
  • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
  • वनोत्सव सुरू करावेत 
  • वृक्षमित्र पुरस्कार 
  • जंगल संपत्तीचे महत्त्व 
  • वृक्ष ही जीवनधारा 
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरी

निबंध 2 

एका कार्यक्रमाचा समारोप चालू होता. वक्ता आमंत्रित पाहुण्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत होता आणि आभार मानताना पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येकाच्या हाती एकेक रोप देत होता. अतिशय आवडली मला ही कल्पना.

माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड केली, वनांचा विध्वंस केला. जंगलांवर कुणाचा हक्क? कुणाची मालकी? कुणाचीही नाही; म्हणजे सर्वांचीच. वाहनांची सोय करण्यासाठी मोठमोठे रस्ते आवश्यक झाले. मग वाटेत येणारी झाडे; झाडे कसली मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. 

घरे उभारण्यासाठी लाकूड, घरे सजवण्यासाठी लाकूड... पुस्तके, ग्रंथ, कचेयांतील कामांसाठी कागद; त्यासाठी पुन्हा लाकूड. वर्षानुवर्षे डोळ्यांवर पट्टी बांधून आपण झाडे तोडत राहिलो. खेडेगावातील गरजा वेगळ्या, पण त्यांना त्यांचे अन्न शिजवण्यासाठी सरपण हवेच. मग झाडे तोडली जातात.

शेवटी व्हायचे तेच झाले. या बेसुमार वृक्षतोडीमुळे सारा देश उजाड झाला. देशातील वनस्पती लयास गेली आणि मग या नाठाळ माणसाच्या लक्षात आले, की पर्यावरणाचा तोल बिघडला आहे ! झाडे कमी झाली, तसा पाऊस कमी झाला. माणसे वाढली, पाण्याचा उपसा अखंड चालू राहिला. त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खाली गेली. आता माणसाला पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. सगळ्या जगापुढेच हा प्रश्न उभा राहिला आहे.

मग मात्र माणूस खडबडून जागा झाला. स्वतःला वाचवण्यासाठी झाडांना वाचवले पाहिजे, हे त्याच्या लक्षात आले. आता कुणी झाड तोडू लागला की चारजण धावून त्याचा हात धरतात, त्याला वृक्षतोड करू देत नाहीत.
प्रत्येक मंगलप्रसंगी वृक्षारोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे. 

घरात बाळ झाले की  झाड लावा. बाळाबरोबर झाडाला वाढवा. पाहुणे आले; त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा. इतकेच नाही तर घरातील प्रियजनांच्या वियोगप्रसंगी 'स्मृतिवना'त झाड लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत.जंगलतोडीच्या चुकीचे परिमार्जन झाडे लावूनच करायचे आहे. अगदी खेडोपाडी, समाजाच्या तळागाळापर्यंत हा विचार पोचवायचा आहे. त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • झाडांचे महत्त्व
  • नेहमी होत आलेली चूक
  • उजाड देश
  • पाऊस कमी
  • भूगर्भातील पाण्याची पातळी खाली
  • पर्यावरणाचा तोल हरवला
  • आपली चूक उमगली 
  • वृक्षतोड थांबवली  विविध कारणांनी झाडे लावायची. जोपासायची, वाढवायची
  • तरच देश सस्यश्यामल होईल.

निबंध  3 

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना'चा संदेश आहे. परंतु प्रचंड प्रमाणात वाढलेली वृक्षतोड एक दिवस ही पृथ्वी रसातळाला नेईल.


केवळ जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. गावोगावच्या नदयांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.


या साऱ्या गोष्टींवर जे प्रतिबंधात्मक असे अनेक उपाय आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृक्षारोपण होय. अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा' ची कल्पना आता रूढ होत आहे. झाड लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. 

झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.

यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने शाळेच्या आवारात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.


शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. म्हणजे ही वसुधा पुन्हा हरितश्यामल' बनेल.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आजचा मानव निसर्गापासून दूर 
  • वृक्षतोड 
  • प्रदूषण 
  • दुष्काळ
  • पर्यावरणाचा समतोल ढळला 
  • निसर्गाकडे चला 
  • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
  • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
  • वनोत्सव सुरू करावेत
  • वृक्षमित्र पुरस्कार
  • जंगल संपत्तीचे महत्त्व
  • वृक्ष ही जीवनधारा
  • वृक्षवल्ली आम्हा सोयरी


निबंध  4 

jhade lava jhade jagva


पर्यावरण संतलनासाठी एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टके वनक्षेत्र असणे आवश्यक असते. परंतु आज भारतात २२ टक्के वनक्षेत्र आहे त्यातही दाट वनक्षेत्राचे प्रमाण ६ ते ७ टके आहे. काही राज्यात वने दाट प्रमाणात आढळतात. तर काही राज्यात वनाचे प्रमाण अतिशय विरळ असते. अशाप्रकारे आपल्याला वन वितरणाच्या बाबतीत विषमता आढळते.

वनांबाबतची ही भीषण परिस्थिती फक्त भारतातच नव्हे तर बहुतांशी देशात आढळते. आज अनेक  कारणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. त्यामध्ये घरांसाठी. उद्योगधंद्यासाठी, उद्यानांसाठी, क्रीडागणे, मैदाने, रस्ते, तलाव, धरणे यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे वृक्षांची लाकडे बहुउपयोगी असल्यामुळे ती मिळवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते.

वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मानवाला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वृक्ष CO2 घेतात आणि ऑक्सीजन बाहेर सोडतात. त्यामुळे माणसाला श्वसनासाठी ऑक्सीजन चा पुरवठा होतो, त्याचबरोबर वातावरणातील ऑक्सीजन, आणि CO2  चे प्रमाणही संतुलित राखले जाते.

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वृक्ष हे मातीची धूप होण्यापासून रोखत असतात. पण आता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे जमिनीची धूप होते आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते आहे. या गोष्टीचा खूप दूरगामी परिणाम मानवावर होऊ शकतो. भविष्यकाळात मानवाला अन्नधान्याची टंचाई भासू शकते.

दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि पर्जन्याच्या प्रमाणात देखील असमतोल निर्माण होत आहे. वृक्ष हे पर्जन्य पडण्यासाठी एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मानव आपल्या दैनंदिन जीवनासाठी इतर सजीवांवर देखील अवलंबून असतो. या सर्व सजीवांची एक अन्नसाखळी असते. वृक्ष तोड झाल्यामुळे या अन्नसाखळीलाही मोठ्या प्रमाणात बाधा पोहचत आहे. 

कारण बरेच प्राणी, पशू, कीटक हे घनदाट वनात आढळतात. त्या वनांवरच त्यांचे आयुष्य अवलंबून असते. यात आपल्याला प्रामुख्याने वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे यांचा उल्लेख करावा लागेल. वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे या प्राण्यांचे प्रमाण देखील कमी होत आहे. त्यामुळे त्या प्राण्यांची संख्या वाढावी म्हणून सरकारला विशेष मोहीम हाती घ्यावी लागत आहे. त्यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे.

वनांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यामुळे तो विविध गोष्टींपासून वंचित राहू लागला आहे. कारण मानवाचे जीवन हे मोठ्या प्रमाणावर वनांवर अवलंबून आहे. वनांपासून त्याला इंधनासाठी, घरासाठी, इतर वस्तू बनवण्यासाठी लाकूड मिळते. त्याचबरोबर वनांचे विविध औषधी उपयोगही आहेत. विविध जर्जर व्याधींच्या उपायासाठी आजही मोठ्या प्रमाणात वनौषधींचा वापर होत असतो. 

त्याचप्रमाणे वनांपासून आपल्याला डिंक, लाख, फळे, फुले इ. उपयोगी वस्तूदेखील मिळतात. त्याचप्रमाणे काही आदिवासी जमाती झाडांच्या पाला पाचोळ्यापासून आपली घरे बनवतात. अशाप्रकारे वृक्ष हे कल्पतरू प्रमाणे असतात. ते आपल्याला विश्रांतीसाठी सावली देतात. वृक्ष हे आपल्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होण्यासाठी मदत करतात.

वनांचे अशा प्रकारे विविध उपयोग माहिती असून देखील, त्यांचे प्रमाण कमी होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी विविध उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेसारख्या देशात एक झाड तोडायचे असल्यास त्याआधी दोन झाडे लावावी लागतात. आपल्या देशातही अशी परिस्थिती निर्माण करावयाची असल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. 

लोकांचे वृक्षसंवर्धनाचे फायदे समजून सांगितले पाहिजे. यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी व्याख्याने आयोजित करून लोकांना वनांचे महत्त्व पटवून द्यायला हवे. वनसंपत्ती संवर्धनासाठी जोरदार प्रचार करायला हवा.

त्याचप्रमाणे शाळांतून देखील मुलांना वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजेत, कारण तेच भावी काळातील नागरिक आहेत. ते ही गोष्ट आपल्या घरच्यांनादेखील सांगू शकतील. त्यांना विविध गोष्टींद्वारे नैतिक मूल्याद्वारे हे पटवुन दिले पाहिजे. इतकेच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमात देखील वनसंवर्धन विषयक प्रकरणांचा समावेश केला पाहिजे. शाळेच्या मार्फत १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ''वृक्षदिंडी'' काढली पाहिजे. 

आज धार्मिक दिंड्यांऐवजी 'वृक्षदिंडी'' ची खरी गरज आहे. त्याचप्रमाणे शाळेत वृक्षसंवर्धन या विषयावर निबंध स्पर्धा, वकृत्त्व स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे. शाळेवर, गावपातळीवर सामहिकपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. सर्वात शेवटचा उपाय म्हणजे या विषयांबद्दल कडक कायदे केले पाहिजे. विनाकारण परवानगी न घेता झाड तोडल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. 

याआधी जनजागृती खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी सरकारने जनजागतीसाठी विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन यांचा उपयोग केला पाहिजे. अशाप्रकारे वृक्ष हे मानवी जीवनाचा, निसर्गाचा आधारस्तंभ आहे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे आणि हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

निबंध 


पृथ्वीने सुजनतेला प्रथम जन्म दिला मनुष्यरूपात ! परमेश्वराला वाटलं की या वसुंधरेला फुलवणारं चैतन्य इथे उमलावे, देवांचे व दैत्यांचे समान अंकुर रुजून, एका नंदनवनाची निर्मिती व्हावी, या क्षमेला, प्रेम, दया, शांती या जीवनमूल्यांचे बाळकडू पाजावे. पृथ्वीवर नंदनवन निर्माण करावे, हिरव्यागार मखमली सदाहरित वनांचा प्रसार सर्वत्र व्हावा आणि यासाठीच तर मनुष्याने जन्म घेतला आहे.

कावळा करतो कावकाव म्हणतो; माणसा झाडे लाव, एक तरी झाड लाव, असे म्हणतच आपण मोठे झालो या बालगीतातील बोध मात्र तेथेच विसरून गेलो. पर्यावरण हा शब्द आपणासाठी नवीन नाही, अगदी साध्या शब्दांत पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाची गोळाबेरीज,पर्यावरणाचा समतोल टिकविण्याचे काम निसर्ग करतो. 

जेव्हा निसर्गाच्या कार्यात माणसाचा नको तेवढा हस्तक्षेप वाढतो. म्हणजे हवा, पाणी, जमिनीचा नको तेवढा व नको तसा वापर होऊ लागतो तेव्हा पर्यावरणाचा समतोल बिघडतो. मानवाचे स्वास्थ्य हे पर्यावरणाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडले की आपले स्वास्थ्य बिघडते. आपल्या स्वास्थ्याची पर्यायाने पर्यावरणाची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी नाही का ?


पूर्वादीकालापासून संतांनी स्वतःच्या साहित्यातून व वर्तनातून हा आपल्या पर्यावरणाचा समतोल तर सांभाळला आहेच व मार्गदर्शनही केले आहे.तुकोबांनी वृक्ष-वेलींना आपले सगे-सोयरे संबोधले आहे. पण झाडे आपल्याला आरोग्यदायी जीवन देतात कारण 'काळी माती हिरवी सोने' प्राणवायूचे हे कारखाने आपण काटकसर करून सोने विकत घेऊ, प्रतिष्ठा वाढेल सर्व काही मिळेल केव्हा ? 'शिर सलामत तो पगडी पचास' आपण आरोग्याची मूर्ती असू तेव्हा त्या सोन्याचे तेज वाढले ना!

आज धूर ओकणारी वाहने व त्यातील कार्बन त्याबरोबर इतरही अपायकारक घटकद्रव्ये ही आरोग्याला मारक ठरत आहेत. श्वसनांच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. शहराच्या दगदगीच्या जीवनात शांती मिळते कुठे माणूस ती शोधायला निसर्गरम्य परिसराकडे वळतो. पण अशी वृंदावने, बागा आहेत तरी किती ? यांचे प्रमाण इतके कमी का ? याचा थोडा जरी विचार माणसाने केला तर आढळून येते की शहरवासीयांनी टुमदार इमारती, मोठमोठे कारखाने, बांधकामे यांकरिता वृक्षांचा नाश केला. 

वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके झाले, रखरख वाढली, पाऊस अनियमित झाला व पर्यायाने पर्यावरणाचा निसर्गाचा समतोल बिघडला स्वच्छ हवेऐवजी प्रदूषित हवा. याशिवाय पर्याय राहिला नाही. याची जाण आता होऊ लागली आहे. ही एक रोगराई विरुद्धची लढाई आहे. धुरीकरणामुळे सातत्याने छळणारा खोकला हा आपण मित्र बनू न देता वेळीच वृक्ष तोड रोखली पाहिजे. आत्तापर्यंत झालेल्या गोष्टीबद्दल चिंता करीत बसण्यापेक्षा नव्याने वृक्ष लागवड करणे यातच शहाणपणा आहे. 

वेळीच जागा होणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे असा हा एककलमी कार्यक्रम अमलात आणणे गरजेचे आहे.
'दुर्दर राहे पाषाणात तया चारा कोण देतो' म्हणणाऱ्या संत सेना महाराजांनी आपणाला प्रश्न केला आहे की जर खडकाखाली राहणाऱ्या बेडकाला आपण चारा देत नाही तर आपल्याला त्याला नष्ट करण्याचा अधिकार काय ? पर्यावरण दूषित करणारे कृमी, कीटक खाऊन बेडूक पर्यावरणाला मदत करतो तो मानवाचा मित्र ठरतो.

 वृक्षतोड झाल्याने प्राणीजीवन विस्कळीत होऊन त्यांना निवाऱ्याची उणीव भासते व काहीवेळेस त्यांचा शिरकाव शहरांमध्ये झाल्यास त्यासारखे भयास्पद ते काय? पाणी, हवा, प्राणी, वृक्ष या सर्वांचा हितकारी संगम म्हणजेच पर्यावरणाचा समतोल.

वृक्ष मानवाचा खरा मित्र आहे तो त्याला लागवड करून सांभाळ करणाऱ्याला आणि त्याचे तोडून तुकडे करणाऱ्यालाही आपली थंड सावली, शुद्ध हवा, फळे, फुले देतो तो कुणाबरोबरही दुजाभाव करीत नाही. 
आपण स्वतःहून वृक्षलागवड करत नसू तर शासनाकडून किंवा सामुदायिकरीत्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संगोपन तरी आपण नक्कीच करू शकतो. वृक्षांचा गैरवापर केल्यास प्रदूषणासारख्या महाभयंकर संकटास तोंड देण्याची वेळ आपल्यावर येईल, हे आपण जाणून आहोतच. 

वृक्ष म्हणजे पृथ्वीने आशीर्वादासाठी उचललेले हात आहेत. ते आशीर्वाद नसतील तर मानवजीवन टिकणार नाही बालपणीच्या पाळण्यासाठी मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्याला सोबत करतात.या भूतलावर आधी वनस्पती व नंतर प्राणिसृष्टी जन्माला आली आहे, वनस्पती नष्ट झाल्या तर त्या मागोमाग मानवी जीवनही नष्ट होईल.

शहरांतील सिमेंट-काँक्रीटच्या उंच जंगलापेक्षा आपणांस जीवन ताळ्यावर आणण्यासाठी उंच उंच वृक्षराजींच्या वेसणीची गरज आहे मानवाला आज तनशांतीपेक्षा मनःशांतीसाठी जास्त भटकावे लागत आहे. बाजारात पैसे टाकला की खाण्यापिण्यातून, हिंडण्याफिरण्यातून मनःशांती प्राप्त होत आहे. पण मनाच्या शांतीचा लळा बाजारात पुरविला जाऊ शकत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेले मन बगीचा, उद्यान, अभयारण्य, वन, समुद्र, नदीकाठ, सरोवराच्या शोधात बाहेर पडते. 

निसर्गरम्य वातावरणासाठी खरी गरज आहे. वृक्षांची यासाठी का होईना आपण सामाजिक वनीकरण इ. माध्यमांतून केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपल्या स्वार्थी व नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.आजपर्यंत असे केले असले तरी आज सर्वांना अशी शपथ घेण्याची गरज आहे. 'झाडे लावू आणि झाडे जगवू.' या क्षेत्रात घोषणांना महत्त्व नाही प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे.


निबंध 6

झाडे लावा व पर्यावरण वाचवा



'हिरव्या पानांना पर्याय नाही, संतुलन झाडांशिवाय नाही' अशा ओळी असलेला एक बिल्ला काही दिवसांपूर्वी सामाजिक वनीकरणातर्फे वाटला गेला. तसेच जळगाव जिल्ह्यात इच्छापूर, कुंडशिवार, खामखेडा पूल व टहाकळी या मुक्ताईनगर परिसरात काही सिंचन योजनांचे भूमिपूजन तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे संपन्न झाले. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून जनमानसात पर्यावरणासंदर्भात जागृती होत आहे. 

प्रचंड जंगलतोड, चराऊ कुरणाचा हास व जमिनीची धूप या कारणांमुळे महाराष्ट्रावर वारंवार अवर्षणाचे संकट ओढवून टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून वनीकरण, मृद व जलसंधारण, चराऊ कुरणांचा विकास अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत. 


ज्या प्रदेशात वृक्षांचे जमिनीवर वनस्पतिक आवरण असते, तेथील वातावरण पावसाला अनुकूल असते. कारण तेथल्या जमिनीतून व वनस्पतींच्या पानांतून जे बाष्पीभवन होते, त्यामुळे हवेत आर्द्रता निर्माण होते. ही आर्द्रता ढगातून पाऊस पाडण्यास कारणीभूत होते. म्हणून वनीकरण, फलोद्यान, गवते व चारा यांची लागवड करणे गरजेचे वाटते. 



वृक्षतोडीमुळे भूपृष्ठ, माळराने उजाड झालीत. पावसाचे पडणारे पाणी या हिरव्या झाडाझुडुपांमुळे अडून राहते. मूळांकडे जाते. म्हणजे भूगर्भात पाणी मुरवण्याचे काम निसर्ग करीत असतो. म्हणून वृक्षारोपण केले, तर पाण्यासाठी दाही दिशा अशी कठीण अवस्था होणार नाही.


मानवजातीकडून होणाऱ्या निसर्गावरील वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत चालला आहे.  मूलभूत गरजा भागवताना होणारी वनसंपत्तीची बेछूट लूट थांबणे व त्याचवेळी पुनर्निर्मिती अर्थात झाडे लावणे आवश्यक आहे. 'नैसर्गिक संपदेचा नाश हा अविचार' आणि 'वृक्षारोपण हा आजचा सुविचार' आहे. वृक्षारोपण केले, तरच भूगर्भातील पाणीपातळी सांभाळली जाईल.


श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी ३०० वर्षांपूर्वीच त्यांच्या आज्ञापत्रांत वनउत्पादनातल्या वापरासंबंधी काही तत्त्वे ठरवून दिली आहेत. ते म्हणतात, 'रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिविलयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?' सम्राट अशोकाने २३०० वर्षांपूर्वी 'राजाज्ञेत प्राणिसंरक्षण आणि वृक्षसंवर्धन याविषयी नमूद केले होते. 


आज तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषण वाढत आहे. ही दखलपात्र घटना वरील पार्श्वभूमीवर विचारात घेण्यासारखी आहे. म्हणून या पर्यावरणाच्या जाणिवेची नितांत गरज आहे.
रस्त्याने चालताना डोक्यावर सावली धरणारी झाडे दिसत नाहीत. वृक्षामुळे आपणास अन्न, प्राणवायू, आर्द्रता मिळून मृद्संहार थांबतो. त्याशिवाय का तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लींना आपले सोयरे मानले? म्हणजे झाडे जसे भूमिपुत्र, तसे आम्हीही याच मातीची लेकरे... म्हणून 'झाडे लावा आणि पर्यावरण अर्थात विश्व वाचवा' अशा घोषणा अस्तित्वात आल्या.


वृक्षदिंड्याही कौतुकाने निघतात. चांदोबा लपायलाही पूर्वीपासून निंबोणीचे 'झाड' च लागत आले आहे. परसदारी पवित्र ‘तुळसी' चे रोप लागते. मंगलप्रसंगी केळीचे खोड स्नेह्यागत उभे राहते, तर आंब्याची पाने शुभ पताका होऊन दारी मुंडावळ्यागत शोभिवंत होतात. अशी संगसोबत आयुष्यभर झाडे देतात. खऱ्या अर्थाने सोयरे छायादायी ठरतात. बालकवींच्या शब्दांत हरिततृणांच्या मखमालीचे हिरवेहिरवेगार गालिचे आपल्या रंग-सौंदर्याने डोळियांचे पारणेच फेडतात. 


झाडे-पाने, फुले, फळे, औषधी, इंधने, सुगंध, पाऊस, छाया, आधार, चारा, प्रदूषणशोषण, निवारा एवढेच नव्हे, तर पैसासुद्धा देतात. म्हणूनच 'चिपको आंदोलन, वृक्षमित्र मंडळे, जलसंवर्धन, सामाजिक वनीकरण, वनशेती, पर्यावरण बचाव... या साऱ्या गोष्टींना खूप महत्त्व येत आहे.  प्रत्येकाने वृक्षवल्ली वाचवण्याचा, वाढवण्याचा स्वयंनिर्धार करायला हवा.


पर्यावरणाचे आपण केवळ वारसदार नसून त्याचे रक्षण करून, त्याला समृद्ध करणारे विश्वस्तही राहू. काळाची गरज म्हणून पर्यावरणाचा समतोल कायम राखू आणि त्यासाठी झाडे लावू !" यानिमित्त 'वनराई' चळवळीचे जनक मोहन धारियांना सलाम ! 'सामाजिक वनीकरण-ग्रामीण फळबागा-परसबागा' ही ग्रामीण विकासाची त्रिसूत्री राबविणाऱ्या अवघ्यांना सलाम ! 'एक व्यक्ती-एक झाड' योजना जे प्रत्यक्ष आचरणात आणतील, त्या प्रत्येकाला सलाम ! ‘पाणी अडवा - पाणी जिरवा' मोहीम राबविणाऱ्या राळेगणसिद्धीच्या सिद्धपुरुषाला अर्थात अण्णा हजारेंनाही सलाम !


चला, पर्यावरण वाचवण्यास, झाडे लावण्यास कटिबद्ध होऊया 
 रक्षावया पर्यावरण, उपाय एकच... वृक्षारोपण

निबंध 7


 झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध 

निसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. डोंगर, दऱ्या, नद्या, पहाड, विविध प्रकारची झाडे, वेली, पशू, पक्षी, कीटक, सूक्ष्म जीव इत्यादी सर्व मानवाला मिळालेली नैसर्गिक संपत्ती आहे. ही पृथ्वी सुंदर दिसते ती झाडे वेलींमुळे. झाडे नसती तर ही पृथ्वी उजाड, भकास दिसली असती. केवळ नद्या, नाले, पहाडांनी ही वसुंधरा सुंदर दिसली नसती. म्हणून पृथ्वीच्या सौंदर्यात वृक्ष वेलींचा महत्त्वाचा वाटा आहे. पृथ्वीचा साज श्रृंगार म्हणजे झाडे वेली.



तुकाराम महाराज केवळ वृक्ष वेलींनाच सोयरे मानतात असे नव्हे तर (वनचरे) वनातील प्राण्यांना सुद्धा ते आपले सोयरे मानतात. पक्षांचा मंजूळ स्वर त्यांना अतिशय आवडतो. मानवांच्या गोंगाटापासून जर दूर जायचे असेल तर भरपूर वृक्ष वेली असलेल्या वनात जावे लागेल. तेथे एकांत मिळतो. तुकाराम महाराज कधी-कधी एकांतात बसून मनन चिंतन करीत असत. 



एकांतात लोभ, मोह,माया, लालसा, द्वेष, मत्सर, या दुर्गुणांपासून मनूष्य दूर होतो. त्यामुळे एकांत सुखकर वाटतो. निसर्गाच्या सान्निध्यात मन प्रसन्न होते. पृथ्वीचं हे सुंदर रुप, विविध पशु पक्षी, त्यांचे विविध आवाज, खळखळ आवाज करुन वाहणारे ओढ्याचे पाणी, विविध रंगाची व विविध आकाराची फुले. त्यांचा वेगवेगळा सुगंध, वेगवेगळ्या रंगाची व आकाराची फळे, प्रत्येकाची वेगळी चव, वळणाच्या वाटा,चढ उताराचा रस्ता, ह्या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायचा असेल तर  निसर्गाच्या सान्निध्यात जावे लागेल. परंतु अशी ठिकाणे दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहेत. 


मनुष्य वृक्षांची कत्तल करतो आहे. जंगलेच्या जंगले नष्ट होत आहेत. जंगले नष्ट करणे म्हणजे मानवी जीवन धोक्यात घालणे होय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज वृक्षांना व वनचरांना आपल्या सोयऱ्यांची उपमा देतात. त्यामुळे त्यांच्या ह्या अभंगाला शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. त्यांचा हा अभंग मानवाला एक चेतावणी आहे की जंगले व त्यातील प्राणी नष्ट करु नका. नातलगा प्रमाणे त्यांना महत्त्व द्या. अन्यथा आपली हानी करुन बसाल. 


त्यांच्या चेतावनीची प्रचीती आज आपणास येत आहे. २००५ मध्ये कोंकणातील दासगाव, जुई इत्यादी गावे भूस्खलनामुळे गाडली गेली होती. तसेच २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीन हे गाव सुध्दा पूर्णपणे गाडले गेले. हा सर्व जंगल तोडीचा दुष्परिणाम आहे. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा हा दुष्परिणाम आहे.
जर कराल नष्ट जंगले तर, धराशायी होतील बंगले वाचवा वृक्ष वल्ली, वनचरे ,तरच राहील भविष्य बरे

निबंध 8


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! संत तुकारामांनी ३०० वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे!' वृक्ष, जंगले यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना आपले सगेसोयरे म्हटले आहे. माणसाचे निसर्गाशी नाते अतूट असते. मानवी


जीवन वनस्पतींवर अवलंबून असते. वनस्पती नसतील तर मानवी जीवन अस्तित्वातच राहणार नाही. म्हणून वृक्षवल्ली हे आपले निसर्गधन आहे. फार पूर्वी मानव निसर्गाच्या सान्निध्यातच वनांमध्ये राहत होता. अन्न, निवारा, वस्त्र (वल्कल) त्याला वृक्षांपासूनच मिळत होते. आजारी पडल्यास औषधे वृक्षवेलींपासूनच मिळत होती. त्यामुळे औदुंबर, तुळस अशा वनस्पतींत दैवी अंश आहे असे मानत असत, आजही आपण या वृक्षांना पवित्र मानतो.


'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमलीचे' अशी बालकवींनी वर्णिलेली मखमली हिरवळ आपणा सर्वांनाच आवडते. हिरव्यागार वनश्रीने नटलेले निसर्गाचे रूप आपल्या सान्निध्यात माणसाला आनंदाने बेहोष करून टाकते. त्याच्या मनातील उदासीनता नाहीशी करून त्याचे मन प्रसन्न करून टाकते. त्यामुळे हल्ली अनेक लोक पर्यटनाद्वारे निसर्गाच्या कुशीत जात असतात. वृक्ष केवळ मनालाच शांती देतात असे नाही, तर मानवाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी करतात.

जंगले असल्यास पाऊस भरपूर पडतो, जमीनीची धूप होत नाही, आपल्याला फळे, फुले, छाया यांची लयलूट होते. इमारती बांधण्यासाठी लाकूड, फर्निचरसाठी लाकूड, कागद निर्मितीसाठी लाकूड वृक्षांपासूनच मिळते. वृक्ष हवाशुद्धीचेही काम करतात. कारखान्यातून निघालेला दूषित वायू, कर्बवायू शोषून प्राणवायू बाहेर सोडतात. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनेही जंगलांचे महत्त्व खूपच आहे. 



आजकाल वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे जास्ती पाऊस, कमी पाऊस अशा दुर्घटना घडू लागल्या आहेत. मातीची धूप, दरडी कोसळणे अशा गोष्टी हल्ली जास्त प्रमाणात आढळून येतात. झाडे वातावरणातील उष्णता शोषून घेतात म्हणून झाडांभोवती गारवा असतो. हिरवी सृष्टी मनाला आल्हाददायक वाटते. 



आजकालच्या विज्ञानयुगात माणूस निसर्गापासून दूर चालला आहे. उंचउंच इमारतींच्या जंगलात खरी जंगले नामशेष व्हायला लागली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. हा तोल साधण्यासाठी पुन: झाडे लावण्याची मोहीम चालू झाली आहे. 'झाडे लावा, देश वाचवा' अशी घोषणा करून सरकारने सामाजिक वनीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. 


बहुगुणांचे 'चिपको आंदोलन' यासाठीच आहे. सरकारप्रमाणेच सामान्य माणसाचाही हातभार लागणे आवश्यक आहे. तेव्हा एकमेकांना भेटीदाखल रोप द्यावे, कुटुंबात मूल जन्माला आले की एक झाड लावावे, त्याची देखभाल करावी. सहकारी सोसायट्यांनी आपल्या परिसरात झाडे लावावीत. म्युनिसिपालिटीने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत. तसेच जंगलतोड होऊ नये म्हणून कागद कारखाने स्वत:च बांबूची जंगले वाढवितात. काही देवराया असतात, असे मानले जाते. म्हणजे काही जंगले देवांची मानतात. त्या ठिकाणी कोणी झाडे तोडत नाहीत. त्यामुळे त्या वृक्षांचे जतन होते.


या साऱ्या गोष्टींना यश येऊन पुन: जिकडेतिकडे हिरवेगार वृक्ष दिसू लागतील, सुजलाम् सुफलाम् अशी भारतभूमी नंदनवन बनेल, अशी आशा करूया. यंत्रयुगाची यांत्रिकता, कागदपत्रांची उलाढाल हे काही काळ दूर सारून माणूस वनराईच्या संगतीत राहिला तर निसर्गाचा  रंग त्याच्या मनावर चढेल आणि निसर्गाशी असलेले नाते घट्ट विणीने विणले जाईल. मानव निसर्गाशी एकरूप होईल, निसर्गात मिसळून जाईल.

Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा

Mazi Aaji Essay In Marathi

निबंध क्र १ 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आजी मराठी निंबध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये गावाकडे राहणा-या आजीची दिनचर्या व माहीती दिली आहे . या निबंधात आजीने माझे म्हणजे नातवाचे पुरवलेले लाड, गावात असणा-या लोकांची मदत आजी कश्‍याप्रकारे करते हे  तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


बाबांना 'पारितोषिक मिळाले होते आणि बाबांचा सत्कार समारंभ होता, म्हणून आजी गावाहुन आली होती. आज ती परत जायला निघाली होती. आम्ही तिला येथेच राहण्याचा खूप आग्रह करीत होतो. पण ती मुळीच तयार नव्हती. आजी म्हणाली, " अरे नंदू, माझी खुप कामे रखडली आहेत तिकडे. हे बघ यापेक्षा आता ऑक्टोबरमध्ये तुला सुट्टी लागेल ना, तेव्हा तूच तिकडे ये. अरे, तुझी मदत होईल मला." आजीने माझी समजूत घातली आणि घराबाहेर पाऊल टाकले. आम्ही पाहतच राहिलो.


आजीने वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे; पण आजी थोडीही वाकलेली नाही. खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांत आजीच्या शारीरिक ठेवणीत कोणताच बदल झालेला नाही. गेली वीस वर्षे आजीआजोबा त्या गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी आजोबा वारले, तेव्हा वाटलं की आजी आता तरी आमच्या घरी शहरात येईल; पण उलट आजी गावातच अधिक गुंतत गेली.


माझे आजीआजोबा हे पहिल्यापासूनच आदर्शवादी. उत्कृष्ट गुणवत्ता असतानाही ते कधी पैशांच्या मागे लागले नाहीत; तर आयुष्यभर ते दोघेही कर्मवीर भाऊरावांच्या 'रयत शिक्षण' संस्थेत काम करीत राहिले. संस्थेतून निवृत्त झाल्यावर ते सासवने गावात काम करीत राहिले. सगळा 'निष्काम कर्मयोग'! काम करणाऱ्याला कामांची उणीव कधीच भासत नाही हे खरंच!  


हे  निबंध पण वाचा  




आजीआजोबांच्या भोवती सदा माणसांचा गराडा असे. आता आजोबा नाहीत. पण एकटी आजी गावाचे सगळे प्रश्न सोडवत असते. ती साऱ्या गावाची 'मोठी आई' बनली आहे.

Mazi Aaji Essay In Marathi
Mazi Aaji Essay In Marathi


आजीच्या स्वतःच्या गरजा अतिशय मर्यादित आहेत. अगदी सकाळी लवकर उठून ती स्वतःची सर्व कामे  आवरते. साडेआठ नऊला ती न्याहरी करते. न्याहरी म्हणजे भाकरी किंवा पोळी. कधी भाताची पेज. पण हेच आजीचे दिवसभराचे जेवण. आजी दिवसातून एकदाच जेवते. मधल्या वेळी एखादे फळ आणि रात्री फक्त कपभर दूध; मर्यादित खाणे हेच आजीच्या उत्तम प्रकृतीचे गमक असावे, असे मला वाटते. 


आजी स्वतःसाठी नित्याच्या स्वयंपाकाखेरीज खास काही करत नसली, तरी निरनिराळे स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यात तिचा हातखंडा आहे. त्यामुळे सुट्टीत आजीकडे गेलो की, चंगळ असते. दुसरी चंगळ असते, ती वाचनाची. आजीकडे उत्तम पुस्तकांचा संग्रह आहे. त्यामुळे मला मनसोक्त वाचन करता येते. आजीने गावाला अगदी वेगळेच रूप आणून दिले आहे. गावातील सर्व स्त्रिया आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आजीने त्यांचे बचतगट स्थापन केले आहेत. आजी स्वतः कोणत्याही पदावर नसते; पण ती त्यांच्या मागे खंबीरपणे उभी असते. आजीच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनाचे हेच रहस्य असावे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व गावाकडील तुमच्‍या कोणत्‍या आडवणी ताज्‍या झाल्‍या त्‍या तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद 
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • शहरापेक्षा खेडेगावात राहणे आजीला आवडते
  • पंच्याहत्तरी ओलांडली तरी
  • तेवढीच कार्यव्यग्रता 
  • सुरुवातीपासून आदर्शवादी जीवन 
  • दुसऱ्यांसाठी झटणे 
  • वेळ अपुरा पडतो 
  • कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सतत कामात दंग.

निबंध क्र २ 

Majhi Aaji Essay In Marathi


माझी आजी ! आमच्या कुटुंबातील वयाने सर्वांत मोठी, वडीलधारी व्यक्ती. तिच्या वागण्याबोलण्यात कमालीचा साधेपणा आहे. ती सकाळी आमच्या लवकर उठते. अंघोळ आटोपली की ती माझ्या आईबरोबर स्वयंपाकघरात वावरते. आई तिला काम करू देत नाही. पण आजी ऐकतच नाही. आजीला स्वयंपाक करायला खूप आवडते. न्याहारीसाठी ती कधीतरी एखादा पदार्थ करते. तिने केलेला पदार्थ सगळ्यांना आवडला की ती खूश होते. दुपारी जेवून झाले की काही वेळ ती टी. व्ही. पाहते. कधी कधी टी. व्ही. पाहता पाहता तेथेच झोपते. संध्याकाळ झाली की ती फेरी मारायला बाहेर पडते. ही संध्याकाळची फेरी मात्र ती कधीच चुकवत नाही.


माझी आजी एका कारणासाठी मला खूप आवडते. ती कधीही रागावत नाही. मला तिने अजूनपर्यंत एकदाही साधी एक चापटही मारलेली नाही. एकदाही रागावली नाही. उलट, आईबाबा रागावले की ती माझीच बाजू घेते. माझ्या बाबांनाच दटावते ! आईबाबा अभ्यासासाठी खूप मागे लागले, तरी आजीला आवडत नाही. त्यामुळे मी आजीवर खूश ! तिने काहीही सांगितले की मी ताबडतोब करतो. तिला वाईट वाटणार नाही. याची काळजी घेतो. आईबाबासुद्धा आजीसारखेच वागले, तर किती छान होईल ! 



आजीला वाचनाचा छंद आहे; पण हल्ली तिचे डोळे दुखतात. मग ती मलाच, वाचायला सांगते आणि ती ऐकते. तिला माझी अभ्यासाची पुस्तकेसुद्धा आवडतात. माझीच पुस्तके मला मोठ्याने वाचायला सांगते. दररोज संध्याकाळी मी तिच्यासाठी माझे एखादे पुस्तक वाचतो. मध्ये मध्ये तिला काही कळले नाही की ती मला आपली शंका विचारते. मीसुद्धा माझ्या परीने तिचे शंकानिरसन करतो. अलीकडे माझ्या लक्षात येऊ लागले आहे की, आजीला वाचून दाखवता दाखवता माझा अभ्यास आपोआप होत असतो.


एका गोष्टीसाठी मात्र तिचा खास आग्रह असतो. काहीही खाण्यापूर्वी किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत, असे ती सांगते. बाबांनासुद्धा ती तसेच सांगते. आजीने काहीही सांगितले की बाबा निमूटपणे ऐकतात. माझे मित्र घरी आले की आजी बेहद्द खूश होते. ती काहीतरी खाऊ करून त्यांना देतेच. ऐंशीच्या घरातील माझी आजी अजूनही उत्साहात वावरते. ती कधी आजारी पडल्याचे मला तरी आठवत नाही. कधीतरी ती मला आपले पाय चेपायला सांगते, तेवढेच. अशी ही माझी आजी मला खूप खूप आवडते.


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • माझी आजी साधी 
  • दिनक्रम 
  • सकाळी अंघोळीनंतर देवपूजा
  • स्वयंपाकात आईला मदत
  • दुपारी टी. व्ही. पाहणे
  • संध्याकाळी फेरी मारणे
  • रागावत नाही
  • नीटनेटकेपणा स्वच्छता 
  • मित्रांशी प्रेमाने वागते 
  • अजूनही ठणठणीत.



निबंध क्र ३ 

आजीने केव्हाच सत्तरी ओलांडली आहे, पण याची आठवण आजीला कुठे आहे? तीन वर्षांपूर्वी तिचा सत्तरावा वाढदिवस साजरा करायला आम्ही सगळेजण तिच्या घरी-तळेगावला गेलो, तेव्हा तिला धक्काच बसला. आपण इतके वृद्ध झालो आहोत, असे तिच्या कधी स्वप्नातही आले नव्हते.आजीचे म्हणजेच आम्हा सर्वांचे घर तळेगावला आहे. तेथून जवळच आमचा एक शेतमळा आहे.

त्यामुळे माझे बाबा, काका, आत्या शिक्षणासाठी आणि पुढे नोकरी-व्यवसायासाठी गावाबाहेर पडले, तरी आजीआजोबा तळेगावच्या घरातच वास्तव्य करून राहिले आणि आजोबांच्या मागेही आजी आजवर त्याच घरात एकटी राहते. आपण एकटे आहोत असे मुळी तिला कधी वाटतच नाही. दिवसभर ती आपल्या कामातच गुंतलेली असते. आमची आजी तेथील शेजारपाजारच्या लोकांची 'आई' आहे.

ती सकाळी लवकर उठते आणि आपली स्वत:ची सर्व कामे उरकून, थोडीशी न्याहारी करून गावातल्या 'निवारा' केंद्रात जाते. तेथे अनेक वृद्ध राहतात. त्यांतील काही वृद्ध निराधार आहेत. रोज दोन तास आजी तेथील मंडळींची कामे करत असते. कुणाचे पत्र लिहायचे असते, कुणाच्या शर्टाला गुंड्या लावायच्या असतात. अशी बारीकसारीक हजारो कामे करताना आजी स्वत:ला कधी वृद्ध समजतच नाही.

दुपारच्या वेळी काही गृहिणी जमतात. त्यांच्याबरोबर चांगल्या पुस्तकांचे वाचन, वर्तमानपत्रांचे सामुदायिक वाचन, त्यावर चर्चा, चिंतन असे तिचे कार्य सतत चाललेले असते. तोपर्यंत दुपार संपत येते. नंतर आजी जवळच्या एका आदिवासी पाड्यावर जाते. त्या आदिवासी स्त्री-पुरुषांना चांगल्या कामात गुंतवून व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आजी धडपडत असते. हातपाय चालतात तोवर माणसाने काही तरी कार्य करत राहिले पाहिजे अशी तिची शिकवण आहे. खऱ्या अर्थाने आजी त्या गावाच्या परिसरातील लोकांची आई झाली आहे.


निबंध क्र ४ 

आमची आजी घरातील सर्वांना खूप आवडते. ती नेहमी हसतमुख असते. सगळ्यांशी प्रेमाने वागते.आमची आजी अजिबात आळशी नाही. ती सर्वांच्या आधी उठते आणि रात्री मात्र सर्वांत लवकर झोपते. ती आम्हांला नेहमी सांगते, “लवकर निजे, लवकर उठे, त्यास ज्ञान, आरोग्य भेटे." सकाळी उठल्यावर स्वत:ची सर्व कामे आटोपून घेते. मग देवपूजा व पोथीवाचन करते. देवपूजेनंतर न्याहरी करते. त्यानंतर ती आईसोबत थोडे कामही करते.

 नऊ वाजेपर्यंत सगळेजण आपापल्या कामावर निघून जातात, मग आजी एकटीच घरी असते. तीच मग घराची काळजी घेते. संध्याकाळी आम्ही घरी येतो, तेव्हा ती आम्हाला काहीतरी छानसा खाऊ करून देते,संध्याकाळी ती मुरलीधराच्या देवळात जाते. तेथे ती सातपर्यंत रमलेली असते, घरी जाल्यावर थोडेसे काहीतरी खाऊन ती वाचन करते आणि मग झोपी जाते. अशी ही आमची आजी सर्वांची आवडती आहे.
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • आजीचे घरातील आणि इतरांच्या मनातील स्थान 
  • वयदिनक्रम 
  • सुगरण, सुगृहिणी 
  • संध्याकाळी देवळात 
  • रात्री जेवण, वाचन व झोप.

निबंध क्र 5

“मी देवळात जाऊन येते ग,' पूजेच्या तबकात ओंजळभर मोगऱ्याची फुलं आणि दुर्वांची जुडी ठेवत आजी आईला म्हणाली. आम्हा नातवंडांपैकी एकालाही बरोबर चलण्याचा आग्रह तिने केला नाही. कारण आज तिला एकटीलाच जायचे होते. त्या दिवशी आजीने गजानन महाराजांच्या पादुकांवर मोगऱ्याची फुले वाहून माथा टेकवला तो अखेरचाच! मनाचा मोगरा, देहाचे दुर्वांकुर योगिराजाच्या चरणी समर्पित केले. असं भाग्याचं मरण 

एखाद्याच्याच भाळी रेखलं असतं.  आजीच्या मृत्यूने आमच्या कुटुंबावर दुर्भाग्याची कुन्हाड कोसळली. अपत्यांवर, सुनांवर, नातवंडांवर अतूट माया करणाऱ्या त्या माऊलीने 'भरल्या गोकुळा' चा कायमचा निरोप घेतला. 'देवळात जाते' सांगून 'देवाघरी' प्रयाण केले. आम्ही शोकावेगाने फोडलेला टाहो तिला ऐकू जाणार नव्हता. एकाच वर्षाच्या आत आजोबा-आजीचं छत्र हिरावून घेणारा देव ‘दयाघन' उरला नाही. आमचं दुःख शब्दातीत होतं.


आमच्यावर आजीचा केवढा जीव ! बाबा म्हणायचे, "तुझं मुलांपेक्षा नातवंडांवर काकणभर जास्तच प्रेम आहे.' त्यावर ती उत्तरायची, “अरे बाबा, नातवंडं म्हणजे दुधावरची साय'' खरं सांगायचं तर तिने आम्हाला सायीपेक्षाही जास्त जपलं. तिच्या शब्दात काय जादू होती कोणास ठाऊक, तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला पटायची. साहजिकच तिची अवज्ञा करण्याचा प्रसंग सहसा येत नसे.


लवकर उठणे, देवपूजेसाठी फुले तोडणे, आईला छोट्या छोट्या कामात मदत करणे, नियमित गृहपाठ करणे, संध्याकाळी खेळून आल्यावर शुभंकरोति, रामरक्षा म्हणणे यामुळे आजी माझ्यावर खूष असायची. माझी चुलत भावंडं लटक्या रुसव्याने म्हणायची, "नाहीतरी समीरदादा आजीचा जास्तच लाडका आहे.'' लोण्याहून मऊ अंतःकरणाची आजी कठीण वज्राचा भेद करण्याइतकी खंबीरही होती. तिचं जीवन म्हणजे एक कंटकमय प्रवास.


ऐन तारुण्यात आजोबांना अपघात झाला. 'जिवावरचं पायावर निभावलं' यातच आजीनं समाधान मानल. पदरी तीन अपत्य. संसाराचा गाडा कसा रेटायचा? यक्षप्रश्न होता. युधिष्ठिराच्या स्थिरतेने, चतुराईने तिने तो सोडवला. सुदैवाने एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पतीची सेवा, मुलांचं संगोपन करता करता विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याचे काम ती मनापासून करू लागली. तिच्या उद्बोधक गोष्टी नि सुरेल आवाजातील कविता ऐकणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक सुखद अनुभव होता.



आजीच्या स्वभावाचा एक उल्लेशनीय पैलू म्हणजे ती 'आदर्श सासू' होती. तिने सुनांना भरभरून प्रेम दिले. त्यांना माहेरची आठवण येऊ दिली नाही. “सून म्हणजे गृहलक्ष्मी. ती प्रसन्न असली तर घरात स्वर्गसुख नांदतं' असं तिचं ठाम मत होतं. त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला न घातला त्यांच्यावर प्रेमाचा अंकुश ठेवण्याचं तंत्र तिला उत्तम साधलं होतं. पुरणपोळी खावी तर आजीच्याच हातची. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली आजी 'सुगरण' होती हे सांगायलाच नको. चटणीपासून पंचपक्वान्नांपर्यंत तिच्या हातच्या प्रत्येक पदार्थाला अमृताची गोडी असायची. जेवणाऱ्याने तृप्तीची ढेकर दिली की आजीचं मन आनंदाने तुडुंब भरायचं. चेहऱ्यावर समाधान झळकायचं.


तिचं प्रत्येक काम स्वच्छ, व्यवस्थित, नीटनेटकं. अंगणात रेखलेली रांगोळी असो की पाटीवर लिहिलेली बाराखडी असो, ती पुसावीशी वाटत नसे. तिला काय येत नव्हतं ते विचारा. शिवणकाम, विणकाम, भरतकाम, पाककला, हस्तकला सर्वच कलांमध्ये तिला चांगली गती होती. अशा 'बहुगुणी' आजीचे गुण किती व" नि किती नको?


आजी म्हणजे अस्सल चंदनी खोड. झिजणे हा तिचा मंत्र. आजाऱ्याची शुश्रूषा करायची, अडल्यानडल्याच्या मदतीला धावून जायचे, हतबल झालेल्याला धीर द्यायचा हेच तिचं जीवनव्रत होतं. उपासना होती, देवपूजा होती. तिने व्रतवैकल्यं, सोवळंओवळं, पूजापोथी याचं फारसं अवडंबर केल्याचं स्मरत नाही. 'Work is worship, Duty is God' हे वचन तिनं आपल्या जीवनात उतरवलं होतं. तिच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला तेव्हा मनात विचार चमकून गेला, चितेवर रचलेली काष्ठे चंदनाची नसतील, पण देह मात्र अस्सल चंदनी आहे.'

निबंध क्र 6

 माझी आजी ही माझ्या जीवनातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. तिचे वय साठ वर्षे आहे. मात्र तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे. मी आजपर्यंत तिला कधीही आजारी पडलेले किंवा औषधे घेताना पाहिले नाही. फक्त वाचण्यापुरता तिला चश्मा लावावा लागतो. तिचा पोशाख म्हणजे साधी पण स्वच्छ सुती साडी. स्वच्छतेच्या बाबतीत ती फार काटेकोर असते.


आजी कायम हसतमुख असते. ती आजोबांच्या तब्बेतीची सर्व प्रकारे काळजी घेते. दिवसभर ती स्वत:ला व्यस्त ठेवते. तिला वाचनाची अतिशय आवड आहे. वेळ मिळेल तेव्हा ती पुस्तके वाचते. रोज संध्याकाळी ती नियमाने फिरायला जाते. सणांच्या दिवशी मंदिरात जाणे, पूजा-अर्जा करायला तिला अतिशय आवडते. तिने बनविलेले पदार्थही अतिशय रुचकर असतात. ती अतिशय शिस्तप्रिय आहे. आम्हा नातवंडांनाही ती शिस्तीचे धडे देत असते. बाबा तिचा व आजोबांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही काम करीत
नाहीत.


मला माझी आजी खूप आवडते. आई किंवा बाबा मला रागवल्यावर तीच माझी समजूत काढते. मी परिक्षेत चांगले गुण मिळवल्यावर ती माझे कौतुक करते. रोज झोपतांना ती मला एक छानशी गोष्ट सांगते. आजी आमच्या घरातील महत्त्वाची व्यक्ती आहे. मला माझी आजी खूप आवडते.

निबंध क्र 7

माझी आजी मराठी निबंध 


माझी आजी :  माझ्या आजीचे नाव आहे 'मथुरा'. ती मुंबईला  राहते. तिला निसर्ग फार आवडतो . तिला स्वच्छता फार आवडते. ती शिस्तप्रिय आहे. तिला रिकामे बसणे आवडत नाही . वेळ अमूल्य आहे, वेळेचा सदुपयोग करा हाच तिचा संदेश आहे.


सत्तरी उलटली तरी ती उद्योगी आहे. 'आळसे कार्यभाग नासतो' हे तिचे ठाम मत आहे. अजूनही ती दिवसभर घरकाम , बागकाम , समाजकार्य यात मग्न असते. ती रोज सकाळी देवदर्शनास जाते, ज्ञानेश्वरी वाचते, गीतेचे श्लोक म्हणते, बातम्या ऐकते व सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर जाते. तिला समुद्र, खळाळणाऱ्या लाटांचं संगीत , देखणा सूर्यास्त सारं खूप आवडतं. शांतपणे निसर्ग निरखित ती बराच वेळ स्तब्धपणे बसून राहते. जणू अथांग सागरासारख्या या अथांग जीवनाचा वेध घेत असावी.



माझी आजी उत्तम कवयित्री आहे. निसर्गाचं सान्निध्य तिला खूप आवडतं. वृक्ष , लता, वेली, पाखरं , चंद्र, चांदणे, धरती, आभाळ हे तिचे जिवाभावाचे शब्द . आपल्या हृदयातल्या भावना या शब्दात ती सहजगत्या ओवते. कविता जन्माला येते. नुसते शब्द नसतात ते! सारं जीवन बध्द असतं त्यात! 


आजीचं शिक्षण फारसं झालेलं नसलं तरी हृदयानं ती खूप खूप श्रीमंत आहे, मोठ्या मनाची आहे. केस पांढरे झाले पण मनाचा हिरवेपणा कायम आहे. ती चिरयौवना आहे. दुःखी, गरजू यांच्या हाकेला ती धावून जाते. सर्व जण तिला 'आजी' च म्हणतात.


पांढरी शुभ्र साडी, नितळ कांती, हसरा चेहरा, बोलके डोळे, केसांचा घट्ट अंबाडा, त्यात खोचलेले गुलाबाचे फूल, सारं काही सुंदर. तिच्या हातच्या बेसनाच्या लाडूची चव काही वेगळीच! अन्न हे पूर्णब्रह्म आहे, फक्त उदरभरण नाही, हे तिनेच मला समजाविले . संस्काराचं जे खत-पाणी तिने मला दिलं , तो माझा अमूल्य ठेवा आहे. तिच्याबरोबर राहण्याची गोडीच अवीट आहे. प्रत्येक सुटीत मी आजीकडे जातो.



सुटी संपली की तिला सोडून निघणं जिवावर येतं. पाय निघतच नाही तिथून . आम्हा दोघांचेही डोळे पाणावतात तिच्या सहवासातले क्षण अलगद मुठीत मखमली मुलायमतेने लपवून मी निघतो, परत लवकर येण्यासाठी! ती बरोबर नसताना तिने सांगितलेल्या गोष्टी आठवतात , मग एकटाच मी कधी खदाखदा हसतो तर कधी एकटाच हमसाहमशी रडतो.


तिने माझ्याबरोबर दिलेली तिची औषधे मला हमखास बरी करतात इतिहासातले आदर्श तिने गोष्टीतून माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात पेरले आहेत ; मला त्याची जाणीव आहे. मला खऱ्या अर्थाने 'मोठे' होऊन कुटुंब, समाज , देश यांचे ऋण फेडायचे आहे. तिनेच मला सांगितले 
“ फेक भविष्य फसवे,
हाती ठेव वर्तमान..." 

इतक्या सहजतेने ती जीवनाला सामोरं जाणं शिकविते . ती माझा गुरू , मित्र सारं काही आहे. दुधावरच्या सायीसारखं ती मला जपते. तिच्या मायेच्या पदराआड अखिल विश्वातली भीती लुप्त होते. तिच्या प्रेमात मी आकंठ तृप्त होतो. फुलासारखं कोमल तर प्रसंगी वज्राहूनही कठीण असं तिच हृदय आहे. माझ्या निराशेवर ती फुकर घालते. तिचे वर्णन करायला शब्द थिटे पडतात.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Mazi Aaji Essay In Marathi | माझी आजी मराठी निबंध

Maze Baba Marathi Essay | माझे बाबा मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे बाबा मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये एका सामान्‍य कुटुंबातील वडीलांची दिनचर्या व माहीती दिली आहे . या निबंधात तुम्‍ही तुमच्‍या वडीलांचा व्यवसाय व माहीती जोडुन आवश्‍यक तेथे बदल करू शकता. जास्‍त वेळ न घेता सुरूवात करूया निबंधाला  .

महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. ) :

  • वडिलांविषयीची भावना 
  • वडिलांचा व्यवसाय
  • वडिलांचा दिनक्रम
  • वडिलांचे कुटुंबीयांशी वागणे
  • वडिलांचा छंद

माझे बाबा मला खूप आवडतात. त्यांचा मी लाडका मुलगा आहे. माझे बाबा हे पदवीधर आहेत. नोकरी करत करत त्यांनी शिक्षण घेतले. आपण स्वतःचा एखादा व्यवसाय करायचा, असा त्यांनी निश्चय केला होता. त्यामुळे ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. सुरुवातीला ते दुसऱ्याची रिक्षा चालवत; पण आता त्यांनी स्वत:ची रिक्षा घेतली आहे.
Maze Baba Marathi Essay
Maze Baba Marathi Essay

बाबा सकाळी लवकर उठतात. आंघोळ आटोपतात. देवपूजा करतात आणि आठ वाजता बाहेर पडतात. दुपारी घरी आल्यावर जेवण व विश्रांती घेतात व रात्री आठ वाजता घरी येतात. बाबा घरी आले की, काही कामे करतात. मग आमचा अभ्यास घेतात. कधी कधी प्रवाशांच्या गमती सांगतात. कधी एखादे पुस्तक वाचत बसतात, त्यांना मुंबईतील खूप ठिकाणे माहीत आहेत. आम्हांला ते कधी कधी फिरायलाही नेतात. बाबांचे त्यांच्या रिक्षावर प्रेम आहे. ते प्रेमाने रिक्षाची देखभाल करतात, रिक्षाची छोटी छोटी दुरुस्ती ते स्वत:च करतात. आमच्या बाबांना वाईट व्यसन अजिबात नाही, म्हणून माझ्या बाबांचा मला खूप अभिमान वाटतो.

मित्रांंनो तुम्‍हाला majhe baba essay in marathi कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवावेे. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 
धन्‍यवाद    

 माझे वडील मराठी निबंध 2


माझे वडील केंद्रीय सचिवालयात काम करतात. त्यांचे कार्यालय आठवड्यातून पाच दिवस उघडे असते. शनिवार, रविवार त्यांना सुट्टी असते. माझ्या वाडिलांचे वय अंदाजे ४० वर्षे आहे. त्यांची उंची पाच फूट दहा इंच आहे. रंग सावळा आणि शरीर सुदृढ आहे. त्यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. ते एम.एस्सी. फिजिक्स आहेत. त्यांनी एम.बी.ए. पण केले आहे. त्यांना अभ्यासाची व वाचनाची खूप आवड आहे. ते रोज ४/५ तास अभ्यास करतात. आमच्या घरी एक चांगले ग्रंथालय आहे. आमच्याकडे रोज दोन वृत्तपत्रे येतात. त्यांचे ते वाचन करतात.
माझे वडील सकाळी ५.३० वाजता उठतात. 

सकाळी थोडा योगाभ्यास करतात. नंतर बागेत फिरावयास जातात. तेथून परतल्यानंतर स्नान करून नास्ता करतात, वतर्मानपत्र वाचतात. दूरदर्शनवरील सकाळच्या बातम्या पाहतात व त्यानंतर कामावर जातात. असा त्यांचा दैनादिन कार्यक्रम असल्यामुळे ते नेहमीच निरोगी आणि उत्साही असतात.


सुट्टीच्या दिवशी ते आम्हा सर्वांना फिरावयास घेऊन जातात. मागच्या शनिवारी आम्ही बागेत खूप खेळलो. आम्ही सर्व भावंडे आणि माझी आई त्यांच्यावर खूप प्रेम करतो. ते पण आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही सर्व जण त्यांच्या आज्ञेत असतो. माझे वडील सर्वांशी मिळून मिसळून वागतात. शेजाऱ्यांना, मित्रांना मदत करण्यास ते नेहमीच तत्पर असतात. कधी-कधी ते त्यांच्याबरोबर फिरावयास जातात. त्यांच्या मित्रांचेही आमच्याकडे जाणे-येणे असते. 

कॉलनीच्या कल्याण सभेचे ते सचिव आहेत. त्यामुळे कॉलनीच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. कर्मचाऱ्यांना, नेत्यांना भेटत असतात. त्यांच्यामुळेच आमच्या कॉलनीत पोस्ट ऑफिस आणि दवाखाना सुरू झाला.


ते कधीच दु:खी, अस्वस्थ नसतात. आम्हा भावंडांच्या अभ्यासातही ते मदत करतात. परीक्षेच्या काळात आमची खास तयारी करून घेतात. आमच्या आरोग्याकडेही त्यांचे पूर्ण लक्ष असते. आमच्याशी ते खेळतात आणि गोष्टींच्या माध्यमातून आमच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर चांगल्या सवयी आम्हाला लागाव्यात अशीच त्यांची इच्छा असते. आमच्या वाढदिवसाला आणि परीक्षेत पास झाल्यावर सुंदर-सुंदर भेटी देतात. असे माझे वडील मला खूपच आवडतात. मला त्यांचा अभिमान वाटतो.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maze Baba Marathi Essay | माझे बाबा मराठी निबंध

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध | Mobile Shap Ki Vardan Marathi nibandh  बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्‍या या क्रांतीकारी उपकरणाचे फायदे व आरोग्‍यावर होणारे तोटे सांगीतले आहे.मोबाईलमुळे मानवी जिवनात काय बदल झाले व त्‍याचा उपयोग कसा करून घेता येईल याविषयी सविस्तरपणे माहीती सांगीतली आहे चला तर मग सुरू करूया निबंधाला .

माणसाने लावलेल्या अनेक शोधांमध्ये स्‍मार्टफोन  म्हणजेच मोबाईलचा  शोध हा सर्वांत महान शोध म्हणावा लागेल. पुराणकथेतील वामनाने साडेतीन पावलांमध्ये सर्व विश्व पादाक्रांत केल्याचे सांगितले जाते. पण मोबाईलच्या इवल्याशा उपकरणाने एका पावलात अक्षरशः संपूर्ण जग पादाक्रांत केले आहे. आज श्रीमंतांपासून ते गरीबलोकांपर्यंत  अक्षरशः सर्वांच्या खिशात हा मोबाईल असतो. या मोबाईलशिवाय हल्ली कोणाचे पानही हलत नाही.

या मोबाईलने अल्पावधीतच आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. सर्व लोक या मोबाईलच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत. कोठेही जा, लोक मोबाईलवरून कोणाशी ना कोणाशी तरी सतत बोलत असतात. गाडीतून उतरल्यावर, रस्त्याने चालताना, गाडी चालवताना, इतकेच नव्हे, तर घरी आल्यावरही सतत कोणाशी तरी बोलत असतात. सतत बोलण्यात गुंतल्यामुळे बोलणाऱ्याचे भोवताली लक्षच नसते. यामुळे अनेकदा अपघात होतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बोलणाऱ्याचे भोवतालच्या माणसांकडे लक्ष नसते.

आपली मित्रमंडळी, नातेवाईक, घरातील माणसे यांच्याशी जिवाभावाच्या दोन गोष्टी बोलणे दुरापास्त झाले आहे. यामुळे माणूस भावनिकदृष्ट्या इतर व्यक्तींपासून दुरावत चालला आहे. एक प्रकारचा दुरावा निर्माण होत आहे. व्यक्तीला निवांतपणे स्वत:कडेही पाहायला वेळ राहिलेला नाही. आजकाल मोबाईलमध्‍ये गेम खेळने नेहमीची गोष्‍ट झाली आहे. त्‍यातच PUBG (Player Unknown's Battle grounds.) या गेमने  धुमाकुळ घातला आहे. मुले तहान भुक विसरून हा गेम खेळतात त्‍यामुळे त्‍यांंच्‍या अभ्‍यासाकडे व आरोग्‍याकडे दुर्लक्ष होते.   


Mobile Shap Ki Vardan
Mobile Shap Ki Vardan 


मोबाईलमुळे शारीरिक दुष्परिणामही होतात. हे उपकरण सतत कानाला लावून ठेवल्यामुळे विशिष्ट इलेक्ट्रॉनिक किरण मेंदूवर विपरीत परिणाम करतात. त्याचबरोबर माणसातील विकृतीला खूप वाव मिळू लागला आहे. इतरांना वाईटसाईट SMS, WhatsApp करणे , बदनामीकारक मजकूर पाठवणे हे सर्रास घडत आहे. परीक्षेतील गैरव्यवहारांसाठी या उपकरणाचा उपयोग विदयार्थी खूप चतुराईने करत आहेत.

 'गणपती दूध पितो' यांसारख्या अंधश्रद्धात्मक अफवा मोबाईलमुळेच जगभर पसरतात. भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठीही या उपकरणाचा उपयोग गुन्हेगारांनी केल्याचे उघड झालेले आहेच. हे सर्व पाहिले की, हा मोबाईल  शाप तर नाही ना, असे मनात आल्यावाचून राहत नाही.

मात्र मोबाईलला शाप म्हणणे खुपच एकांगी होईल. वास्तविक पाहता,मोबाईल  हे संपर्काचे उत्कृष्ट माध्यम आहे. आपण कोणाशीही, कधीही आणि अक्षरश: जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी कुठूनही संपर्क साधू शकतो. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना, माझा देश कसा, तर “सारे जहाँ से अच्छा" असे या मोबाईलमुळेच सांगू शकला.

आपण कोणाशीही चटकन संपर्क साधू शकत असल्यामुळे आपली कामे भराभर होऊ शकतात. विदयार्थ्यांनाही लहानसहान शंकांचे निरसन करून घेण्यासाठी हे साधन खूप उपयुक्त ठरते. यामुळे अभ्यासाचा, कामांचा वेग वाढला आहे. वेळेचा अपव्यय कमी झाला आहे. आपल्याला हवी असलेली व्यक्ती कामात गुंतलेली असेल, तर आपण एस्एम्एस् पाठवू शकतो. आधुनिक काळातील गतिमान जीवनाशी हा मोबाईल  सुसंवादी आहे.

नोकरीवर जाणाऱ्या पतिपत्नींना घरात एकटे असलेल्या आपल्या मुलांशी विडीओ कॉल करून संपर्क साधता येतो. त्यांना काही हवे-नको असल्यास त्यांची काळजी घेता येते. वृद्ध एकाकी व्यक्तींना तर हा फार मोठा आधार बनला आहे. हल्ली मोबाईलवरून आपल्या विविध बिलांची माहिती मिळते. बातम्या, चित्रपट तर केव्हाच सुरू झाले आहेत. नाटक-सिनेमा, रेल्वे, विमाने यांची तिकिटे मोबाईलवरून खरेदी करता येऊ शकतात. 

दूरदर्शन आकाशवाणीवरील कार्यक्रमांमध्ये या मोबाईलमुळे लोकांचा सहभाग वाढला आहे. हल्ली कित्येक गुन्हयांचा उलगडा मोबाईलमुळे झाल्याचे दिसून येते. एके ठिकाणी पावसाळ्यात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या व्यक्तीचा मोबाईल वाजला आणि त्याचा जीव वाचवणे अग्निशमन दलाला शक्य झाले !

मोबाईलचे फायदे किती सांगावेत ! तोटे आहेतच, पण तो त्या उपकरणाचा दोष नव्हे. हे उपकरण वापरणाऱ्या माणसाचा तो दोष आहे. तेव्हा या दूरसंचाराला - मोबाईलला - शाप कसे म्हणणार?

मित्रांनो तुम्‍हाला brahman dhwani shap ki vardan marathi nibandh हा कसा वाटला हे कमेंट करून शांगु शकता , तुम्‍ही मोबाईलचा वापर कमी करण्‍यासाठी कोणते उपाय उपयोगात येतील हे सांगु शकता यामुळे आमच्‍या इतर वाचकांना तुमच्‍या सल्‍याचा उपयोग होऊ शकेल, धन्‍यवाद .
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • भ्रमणध्वनीचा (स्‍मार्टफोन) शोध हा एक महान शोध 
  • खूप दुष्परिणाम
  • दूरध्वनीवर सतत
  • बोलत राहणे 
  • भोवतालापासून तुटलेपण 
  • SMS चे खूळ-वाईट उपयोग 
  • बदनामीसाठीही
  • अंधश्रद्धा पसरवण्यासाठी
  • परीक्षेतील गैरव्यवहार वाढण्यास मदत 
  •  बॉम्बस्फोट 
  • परंतु खूप उपयुक्त 
  • कोणाशीही, कुठेही, कधीही संपर्क
  • कामाचा वेग वाढला 
  • वेळेचा अपव्यय कमी
  • शाळकरी मुले व वृद्ध व्यक्तींसाठी उपयोगी 
  • अडचणींच्या वेळी तर देवदूतच 
  • गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही उपयोगी 
  • चांगले-वाईटपण वापर करणाऱ्यावर अवलंबून.

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan

Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध

निबंध क्रं. १ 

नमस्‍कार मित्रांनो आज आपण  Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध बघणार आहोत.  स्वामी विवेकानंद यांनी  भारताचे व हिंदू धर्माचे नाव नाव संपुर्ण विश्‍वात कश्‍याप्रकारे केले त्‍यांच्‍या बालपणा गमती जमती , त्‍यांनी केलेली भारत भ्रमंती ,  यांचे वर्णन खालील २  निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांच्या घरी १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी शिवाचे कठीण व्रत सुरू केले होते. या व्रतामुळेच आपल्याला पुत्ररत्‍न लाभले, अशी त्यांची भावना होती. मोठ्या कौतुकाने त्यांनी आपल्या मुलाचे नाव 'नरेंद्र' असे ठेवले.


नरेंद्र हा बालवयात कोपिष्ट होता. शाळेतही तो फार खोड्या काढत असे. पण पुढे त्याच्यात पूजाअर्चा, भक्तिभाव यांची आवड निर्माण झाली. नरेंद्राला तीव्र बुद्धि्मत्तेचे वरदान लाभले होते. नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन त्याने आपले शरीर सुदृढ बनवले होते. मोठा झाल्यावर नरेंद्र ब्राम्‍हणसमाजात जाऊ लागला. तेथे त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. 'खरोखरच देव आहे की नाही? देव असेल तर तो कोठे भेटेल?' नरेंद्र ज्याला-त्याला हे प्रश्न विचारत असे. तेव्हा ब्राहमसमाजवादी पुढारी देवेंद्र यांनी नरेंद्राला स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे पाठवले आणि पुढे तेच नरेंद्राचे गुरू झाले.

Swami Vivekananda Essay In Marathi
Swami Vivekananda Essay In Marathi



परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मानवातही आहे, ही शिकवण परमहंसांनी नरेंद्राला दिली. सुरवातीला नरेंद्राला हे मान्य झाले नाही. नंतर परमहंसांच्या शिकवणीतून हे सत्य नरेंद्राला प्रतीत झाले. तो कालिमातेचा भक्त बनला. रामकृष्ण परमहंसांनी या जगाचा निरोप घेताना नरेंद्राला सांगितले की, तू हिंदुत्वाचा प्रसार कर आणि त्यातील अमर तत्त्वज्ञान साऱ्या जगाला सांग.


१८९३ मध्ये नरेंद्र अमेरिकेतील सर्वधर्मीय परिषदेला उपस्थित राहिले. लोक त्यांना 'स्वामी विवेकानंद' म्हणून ओळखू लागले. त्या जागतिक परिषदेत विवेकानंदांनी भाषणाला सुरवात करताना 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे न संबोधता 'माझ्या बंधु-भगिनींनो' असे संबोधून उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे माहात्म्य सर्वांना पटवून दिले. आपले उर्वरित आयुष्यही त्यांनी या महान कार्यासाठी वेचले.







 स्वामी विवेकानंद निबंध क्रं. २ 


महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )


  1. बालपण वैभवात 
  2. अभ्यास,खेळ, व्यायाम, संगीत, काव्य इत्यादी अनेक गोष्टींत रुची
  3. १४-१५ व्या वर्षी भारतभ्रमण 
  4. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या भारतीयांचे दर्शन 
  5. स्वधर्म विसरलेल्या हिंदूंचे दर्शन
  6. राजा राममोहन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव
  7. अनेक धर्मांतील, ग्रंथांतील तत्त्वांचा अभ्यास
  8. रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व
  9. भारतभ्रमणाला सुरुवात
  10. कन्याकुमारी येथे तपश्चर्या 
  11. अमेरिकेत
  12. सर्वधर्म परिषदेला हजर 
  13. सभा जिंकली
  14. जगभर नाव.


जेव्हा भारत पारतंत्र्यात होता, तेव्हा भारतीय समाजाला एक प्रकारची धर्मग्लानीच आली होती म्हणा ना! अशा अंधकारात १२ जानेवारी १८६३ रोजी दत्त घराण्यात एक दीपज्योती जन्माला आली. तिचे नाव नरेंद्रनाथ दत्त, म्हणजेच विश्वविख्यात स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे बालपण अत्यंत आनंदात व वैभवात गेले. विशाल नेत्र आणि विशाल भाल लाभलेले स्वामी विवेकानंद अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, सुदृढ, निर्भय, विलोभनीय असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना अभ्यास, खेळ, व्यायाम, संगीत, काव्य, पाकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत खूप रुची होती. लहान वयात आईकडून धार्मिक विचारांचे; तर मोठेपणी वडिलांकडून आधुनिक बुद्धिवादी विचारसरणीचे संस्कार झाले. सत्य वचन व सत्य आचरण हा तर त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता.

१४-१५ वर्षांचे असतानाच अर्धाअधिक भारत त्यांनी पालथा घातला. त्या काळी त्यांनी भारतीयांची केविलवाणी अवस्था पाहिली. गुलामीच्या गर्तेत सापडलेल्या, स्वत्व विसरलेल्या हिंदू समाजाला पाश्चात्य शिक्षणाने भारून टाकले होते. परकीयांंच्या फसव्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाने भारतीय समाजाची दिशाभूल केली जात होती. हे सर्व पाहून विवेकानंद अत्यंत व्यथित व अस्वस्थ झाले.


 रवींद्रनाथ टागोरांशी चर्चा करून आणि राजा राममोहन रॉय यांची तत्त्वे विचारात घेऊन विवेकानंदांनी सर्व धर्माचा आणि तत्‍वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यांचे इंग्रजी, संस्कृत, बंगाली इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. निरनिराळ्या धर्मातील व पंथांतील विद्वानांशी त्यांनी तत्त्वज्ञानावर चर्चा केली. त्यांनी रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व पत्करले.


विवेकानंद हे १८८४ साली पदवीधर झाले. रामकृष्ण परमहंसांच्या प्रभावामुळे त्यांनी संन्यास घेतला आणि भिक्षेची झोळी घेऊन राष्ट्रकल्याणासाठी घराबाहेर पडले. अंतिम सत्य काय? या एकाच विचाराचा त्यांनी ध्यास घेतला आणि भारतभ्रमणाला सुरुवात केली. भारतभ्रमणानंतर कन्याकुमारीच्या समुद्रातील खडकावर बसून विचार करत असताना भारतातील दरिद्री, अज्ञानी जनतेसाठी सर्वस्व अर्पण करणारे अनेक स्त्री-पुरुष निर्माण केले पाहिजेत, असे त्यांना तीव्रतेने जाणवू लागले. 


 अमेरिकेतील शिकागो शहरी ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी सर्वधर्म परिषद भरणार होती. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद तेथे उपस्थित राहिले. परिषदेच्या दिवशी विवेकानंदांनी 'माझ्या अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो' अशी भावपूर्ण शब्दांनी सुरुवात करून सभा जिंकली. त्यावेळी दोन मिनिटे सतत टाळ्यांचा गजर होत होता. या परिषदेत ते ज्या दिवशी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत विचारगर्भ भाषणाने हिंदू धर्माविषयीचे निबंध वाचत होते, त्या दिवशी 'न भूतो न भविष्यति' अशी गर्दी लोटली होती. 


होमरूल लीगच्या नेत्या अॅनी बेझंट यांनी या प्रसंगी 'एक योद्धा संन्यासी, समस्त प्रतिनिधींमध्ये वयाने लहान तरीही प्राचीन व श्रेष्ठ सत्याची जिवंत मूर्तीच' असे स्वामी विवेकानंदांचे वर्णन केले आहे. विवेकानंदांनी खऱ्या धर्माची तत्त्वे सांगून धर्म हे उन्नतीचे साधन असावे, असे प्रतिपादन केले.


विवेकानंदांची प्रभावी भाषणशैली साऱ्या जगतात वाखाणली गेली. समस्त पाश्चात्त्य जगात विवेकानंदांची कीर्ती व भारताचा मान वाढला. अपूर्व सहनशीलता, असीम धैर्य, अलौकिक त्यागशक्ती यांचा सहज समन्वय म्हणजे स्वामी विवेकानंद ! ज्याने आपल्या देशाला आणि देशबांधवांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले, ते स्वामी विवेकानंद माझी आवडती विभूती आहेत. या महान विभूतीने ४ जुलै १९०२ या  दिवशी रात्री बेलूर या मठात महासमाधी घेतली.

मित्रांनो  तुम्‍हाला वरील निबंध कसा वाटला हे आम्‍हाला कमेंट करून जरूर कळवा . निबंध पुर्ण वाचल्‍याबद्दल धन्यवाद. 

टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  1. Swami Vivekananda Nibandh In Marathi
  2. swami vivekananda marathi madhe nibandh

Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh In Marathi

निबंध क्रं. १ 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा गांधी मराठी निबंध बघणार आहोत. सत्‍य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्‍या माध्‍यामातुन भारताला गुलामगीरीच्‍या बेळीतुन मुक्‍तता मिळवुन देण्‍याचे कार्य महात्‍मा गांधीजींनी पुर्ण केले. जन्माने सामान्‍य असणारे गांधीजी आपल्‍या कार्यामुळे कश्‍याप्रकारे महान व्‍यक्‍तीमत्‍व प्राप्‍त करू शकले याची सखोल माहीती खालील 4 निबंधात प्रस्‍तुत केली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.



मानवतेचा मानदंड महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून दयायची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे, 'महामानव', गांधीजी स्वत:ला नेहमी 'एक सामान्य माणूस' मानत असत. त्यांनी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणत्याही महान गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी मानदंड वापरला जातो. मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे 'गांधीजी' होय.



महात्माजींनी कोणतेही काम करताना मानवजातीचा विचार केला. ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते; पण तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून ते त्यांच्यामागे उभे राहिले. तेथील भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते, त्यांच्याविरुद्ध ते खंबीरपणे झगडले.


Mahatma-Gandhi-Nibandh-In-Marathi
Mahatma-Gandhi-Nibandh-In-Marathi


भारतात परत आल्यावर त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास केला. सामान्य भारतीय हे अर्धनग्न अवस्थेत जिवन ज‍गतात, अर्धपोटी राहतात हे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या पोशाखात, आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला. भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा  छोट्या वस्‍तीत राहणे त्यांनी पसंत केले. सर्व लोकांना समाजात समान वागणूक हवी, असे आग्रहपूर्वक सांगणारे महात्माजी कचराकुंडी साफ करण्याचे काम करायला स्वत: सदैव पुढे येत असत.



मीठ म्हणजे सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचे प्रतीकच! त्या मिठावर बसवलेला कर त्यांना अन्यायकारक वाटला; म्हणून त्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी महात्माजीनी 'दांडी यात्रा' काढली. महात्माजींंनी कधीही कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही. सर्व धर्मातील व सर्व जातीजमातीतील जनतेने एकदिलाने राहावे, यासाठी ते जीवनभर झटले. एका प्रार्थनासभेत त्यांची हत्या झाली. आज गांधीजी देहाने हयात नाहीत; पण त्यांच्या अलौकिक कार्याने  ते अमर झाले आहेत.  

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध क्रमांक २
राष्ट्रपिता महात्मा गांधी
 महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  1. सामान्यातून असामान्य 
  2. चुका कबूल करण्याची वृत्ती -
  3. आत्मवृत्ताला नाव 'सत्याचे प्रयोग ' 
  4. बॅरिस्टर झाल्यावर आफ्रिकेला प्रयाण 
  5. विषमतेची वागणूक सशस्त्र सत्तेला अहिंसेने उत्तर
  6. भारतदर्शन 
  7. राजकारणात प्रवेश
  8. सत्याग्रह निःशस्त्र प्रतिकार 
  9. सविनय कायदेभंग 
  10. उपोषण 
  11. निरपेक्ष समाजकार्य 
  12. सर्व जनतेचे बापू 
  13. सेवाग्राममधून समाजसेवा 
  14. कुटिर उदयोगांना महत्त्व 
  15. सत्ता पद स्वीकारले नाही
  16. सत्यासाठी मरणही पत्करले 
  17. राष्ट्राचा पिता.



भारताला स्‍वतंत्र करण्‍यासाठी अनेक महान स्‍त्री व पुरूषांनी आपले सर्वस्‍व राष्‍ट्राला अर्पण केले . अश्‍या महापुरूषापैकी एक होते महात्‍मा गांधी. महात्‍मा गांधी युगपुरूष होते. त्‍यांच्‍या बद्दल सर्व विश्‍व आदराची भावना ठेवत होते . अश्‍या महामानवाला नमन करूया आणि निबंधाला सुरूवात करूया .



महात्माजींच्या कार्याची थोरवी गाताना प्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणाले होते, "आणखी काही पिढ्यांनंतर लोकांचा विश्वासही बसणार नाही की, असा कधी कोणी माणूस झाला होता." ध्येयवेडाने प्रेरित झाल्यावर एका सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व कसे फुलू शकते, त्याचे महात्माजी हे उदाहरण आहेत. २ ऑक्टोबर १८६९ ला काठेवाडमध्ये पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला होता.

त्यांची विदयार्थिदशा ही इतर सर्वसामान्य मुलांसारखीच होती. त्या वयात त्यांच्याही हातून चुका झाल्या. त्यांचा वेगळेपणा एवढाच की, त्यांनी आपल्या चुका कबूल केल्या. पुढेही जीवनात वेगवेगळे प्रयोग करताना जेव्हा जेव्हा चुका झाल्या, तेव्हा तेव्हा त्या त्यांनी सर्वांपुढे मान्य केल्या व त्याचे शासनही स्वत:ला करून घेतले. आपल्या आत्मवृत्तालाही त्यांनी नाव दिले आहे  'सत्याचे प्रयोग.' दुसरा गांधीजींचे विशेष म्हणजे परदेशात जाण्यापूर्वी आपल्या मातेजवळ त्यांनी ज्या प्रतिज्ञा केल्या त्या आयुष्यभर पाळल्या.

वयाच्या अट्ठाविसाव्या वर्षी बॅरिस्टर गांधी कामानिमित्त आफ्रिकेत गेले, पण तेथील हिंदी लोकांना मिळणारी अमानुष वागणूक पाहून त्यांच्या कार्याचे स्वरूपच बदलले. त्यांना स्वत:लाही 'काळा आदमी' म्हणून हा छळ काही काळ सहन करावा लागला आणि तेथेच त्यांच्या कार्याचे स्वरूप ठरले. या अन्यायापुढे मान तुकवणे योग्य नाही, हे त्यांना जाणवले. त्याच वेळी गांधीजींनी सशस्त्र शक्तीपुढे 'अहिंसे'चे हत्यार स्वीकारले. "हे सामर्थ्य आपल्याला आपल्या पत्नीकडून मिळाले" असे महात्माजी सदैव सांगत.

आफ्रिकेतून परत आल्यावर आपल्या गुरूंच्या ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या - सांगण्यानुसार गांधीजींनी संपूर्ण भारताचे - भारतीय समाजाचे दर्शन घेतले आणि १९२० पासून आपल्या लढ्याला सुरुवात करताना सत्याग्रह, नि:शस्त्र प्रतिकार, सविनय कायदेभंग व स्वदेशीचा पुरस्कार या चतु:सूत्रीचा स्वीकार केला. एखादया लढ्यात हिंसेने प्रवेश केला, तर गांधीजी त्या क्षणी तो लढा थांबवत व उपोषणाचा मार्ग स्वीकारून स्वशासन करून घेत.

यानंतर गांधीजी जगले ते देशासाठी, त्यांनी कधीही आपल्या पत्नीचा, आपल्या मुलांचा, कुटुंबाचा वा घराण्याच्या स्वार्थाचा विचार केला नाही, त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांचा मोठा मुलगा हरिलाल त्यांना दुरावला, पण ते संपूर्ण भारतीय जनतेचे 'बापू' झाले होते. ब्रिटिशांशी लढण्यात ते अखंड गुंतलेले असतानाही आपल्या देशातील दलित पीडित समाजाचा त्यांना क्षणभरही विसर पडला नव्हता. हरिजनांच्या उद्धारासाठी त्यांनी 'हरिजन' साप्ताहिक चालवले. साबरमतीच्या सेवाश्रमात त्यांनी हरिजन, आदिवासी, कुष्ठपीडित सर्वांची सेवा केली. मोठ्या कारखान्यांपेक्षा 'कुटिर उदयोगा'ला ते महत्त्व देत.

बापूजी जे जगले ते इतरांसाठीच. म्हणून कवी मनमोहन म्हणतात, 'चंदनाचे खोड लाजे। हा झिजे त्याहूनही  कोणतेही पद, कोणतेही स्थान, सत्ता त्यांनी स्वीकारली नाही. असेच कार्यरत असताना ३० जानेवारी १९४८ रोजी या राष्ट्रपित्याचा एका मारेकऱ्याने खून केला. त्यावेळी प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले होते, “या जगात अतिशय चांगले असणेही तितके चांगले नाही."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



निबंध क्रमांक ३

Mahatma Gandhi Information In Marathi Essay

महत्‍वाचे मुद्दे : 

  1. महात्मा गांधी
  2. आवडते पुढारी
  3. सत्याग्रह व असहकार ही शस्त्रास्त्रे
  4. बापूजीपासून महात्माजी
  5. सत्वाचे प्रयोग' आत्मचरित्र
  6. असामान्य धाडस
  7. सशस्त्र शक्तीशी निशस्त्र मुकाबला
  8. असहकार चळवळ
  9. दांडी यात्रा
  10. चले जाव आंदोलन 
  11. निकंलक चारित्र्य 
  12. संयम, मनोनिग्रह
  13. सामान्याकडून असामान्यत्वाकडे वाटचाल

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे माझे आवडते पुढारी आहेत. सत्याग्रह व असहकार या जगावेगळ्या अहिंसक शस्त्रांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. बापूजी 'महात्मा' कसे झाले, याचा शोध घेतला की त्यांच्या चरित्रातील दिव्यत्व प्रत्ययास येते. आपली जीवन कहाणी सांगताना बापूजी तिचा उल्लेख 'सत्याचे प्रयोग' म्हणून करतात. आपल्या जीवनातील सर्व चुकांची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. गांधीजींनी लोकांना सत्याचे नुसते पाठ दिले नाहीत, तर स्वत:च्या जीवनात सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले.

महात्माजीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, बापूजींनी आयुष्यभर सत्य, अहिंसा या व्रतांचे कठोरपणे पालन केले: बापूजीजवळ असामान्य धाडस होते. आपल्या देशातील लोकांची गरीबीची अवस्‍था पाहून बापूजी केवळ पंचा नेसूनच सर्वत्र वावरू लागले. बापूजींंनी आपला देश, भारतीय संस्कृती, भारतातील सर्वसामान्य माणूस यांचा प्रथम विचार केला. म्हणूनच सशस्त्र चळवळीचा हिंसक मार्ग त्यांनी अनुसरला नाही.

सशस्त्र सरकारला त्यांनी आव्हान दिले ते नि:शस्त्र हातांनी. 'सत्याग्रह या नवीन अस्त्राचा उपयोग त्यांनी प्रथम आफ्रिकेत आणि नंतर भारतात केला. १९२० ची बापुजीची असहकार चळवळ, १९३० ची 'दांडी यात्रा' व १९४२ चा 'चले जाव' लढा' हे संपुर्ण विश्वातील स्वातंत्र्य आंदोलनांमधील सोनेरी क्षण होते. बापूजींच्या मोठेपणाचे रहस्य त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात होते. बापुजींजवळ विलक्षण 'संयम' होता. 


आजच्या विदयार्थ्यांत कोणत्याही त-हेचा 'मनोनिग्रह' आढळत नाही. मनोनिग्रहाचे महत्त्व त्यांना बापूजींच्या जीवनचरित्रातून कळून येईल. एकदा डॉक्टरांनी कस्तुरबांना आजारपणात मीठ सोडायला सांगितले होते, परंतु त्या तयार नव्हत्या. तेव्हा बापूजींनी त्यांचे मनोबल तयार करण्यासाठी स्वत:च मीठ सोडले. खजूर व शेळीचे दूध या साध्या पदार्थांवर ते अखेरपर्यंत राहिले. 

सत्ता, संपत्ती यांच्या जीवघेण्या स्पर्धेत बापूजी केव्हाच अडकले नाहीत. आफ्रिका सोडताना आपल्याला मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशकार्यासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेच्या कोणत्याही पदाची हाव न धरता, ते निर्वासितांच्या सेवेला धावून गेले. सामान्याकडून असामान्यत्वाकडे यशस्वी वाटचाल कशी करता येते, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे राष्ट्रपिता बापूजी


प्रख्यात तत्त्वज्ञ आईनस्टाईनने महात्माजी र्विषयी असे म्हटले आहे की, “आणखी काही वर्षांनंतर असा एक मनुष्य झाला होता, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही."सर्वाना सत्‍य व अहिंसेचा मार्ग दाखवणारे आपले आवडते बापू आता आपल्यात राहिले नाहीत, परंतु त्यांची तत्वे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहतील .

मित्रांनो मी आशा  करतो तुम्हाला महात्मा गांधी निबंध मराठी आवडला असेल , निबंध पुर्ण वाचल्‍याबद्दल  धन्‍यवाद 

निबंध क्रमांक 4

 राष्ट्रपिता महात्मा गांधी Essay On Mahatma Gandhi In Marathi

 भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला. परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर होते. त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य एव्हरेस्ट शिखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती.  आदर्शाची ते जिवंत साकार प्रतिमा होते. 


सत्य, अहिंसा, न्याय, समानता, सेवा, राष्ट्र समर्पणासारख्या आदर्शाचे आणि जीवनमूल्यांचे ते एक आदर्श उदाहरण होते. हिंसा, स्वार्थ, असत्य, संकुचितपणा, राजकारण, जातिभेद, घृणा, द्वेष, लोभ, लालसेच्या कलियुगातही त्यांनी आपले विचार आणि आदर्श यांचे उच्चांक गाठून मानवतेची कीर्ती वाढविली. या वास्तवतेवर कदाचित येणाऱ्या पिढीचा विश्वासही बसणार नाही.


जे असाधारण, असंभव आणि अविश्सनीय वाटत होते ते सर्व काही गांधीजींनी करून दाखविले. त्यांचे जीवन, आदर्श, उच्च विचार, साधेपणा, खरेपणा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहील.
त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आई ईश्वरभक्त, श्रद्धाळू साधी, धार्मिक स्त्री होती.  वयाच्या १३ व्या वर्षी गांधीजीचा विवाह कस्तुरबाशी झाला. ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने पोरबंदरहून राजकोटला स्थलांतर केले.


किशोरवयातच गांधीजींनी अहिंसा, ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ, कृत्रिम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही. ते भारतात परत आले व वकिली करू लागले. तेव्हाच त्यांना एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. 


तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. इंग्रजांनी त्यांना रेल्वेतून अपमान करून उतरविले. कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ते बसले होते. त्यांना अनेकदा कारागृहांत टाकण्यात आले व मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांच्या आदर्शाना आणखी बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनण्याचा निश्चय केला. 'गीता' त्यांचा आदर्श बनली. तिथे असतानाच त्यांनी सत्य, अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले. त्यात सत्याग्रह मुख्य होता.


१९१५ मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शाचा प्रसार प्रचार त्यांनी सुरू केला. त्यांनी गरीब शेतकरी, गिरणी कामगार, मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले व विजय मिळविला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती. गांधीजींनी त्यात भाग घेतला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला. भारतीय नेते आणि संपूर्ण जनता यांना त्यांनी संघटित केले. त्यांना मार्गदशन केले त्यांच्यावर प्रेम केले. 


त्याच्या सहकार्यामुळे व प्रेरणेमुळे हजारे लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. संपूर्ण भारतात खादी, स्वदेशी, स्वातंत्र्य, असहकार, परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याची जणू लाटच आली. त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा पाया डळमळू लागला. गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. नेते, गावप्रमुख जनता यांना भेटले आणि आपले विचार त्यांना पटवून दिले. त्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे चालू लागला. 

परिणामी इंग्रजांची दडपशाही आणखीनच वाढली. गांधीजींवर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले. अनेक सत्याग्रह केले. दीर्घकाळ उपोषणे केली व जनता संघटित केली.


१२ मार्च १९३० ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला जुलमी इंग्रज सरकारला हलवून सोडले. परंतु त्यांच्या मनांत इंग्रज शासकांविरुद्ध तिरस्कार नव्हता. द्वेष नव्हता. ते म्हणत पापाचा तिरस्कार करा पाप्याचा करू नका. त्यांनी 'यंग इंडिया''हरिजन' ही वत्तपत्रे चालविली. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व बळ दिले. काँग्रेस आणि भारताला गांधीजींनीच 'स्वराज्य' ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली 'भारत छोड़ो' चळवळीची सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा शेवट झाला.


शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला. जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु देशाचे दोन तुकडे झाले. जातीय दंगे भडकले. हजारो निरपराध लोक मारले गेले. अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट झाली. हे सर्व पाहून गांधीजींना दु:ख झाले. संपूर्ण शक्तिनिशी ते याला तोंड देण्यास सिद्ध झाले. ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले. लोकांची समजूत काढली. त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यांना या कार्यात अल्प यश मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व नैतिक धैर्याचे एक उदाहरणच जनतेसमोर प्रस्तुत केले.


दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून गांधीजींचा खून केला. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूबरोबरच एका झंझावाती युगाचा अंत झाला. पं. नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले, "आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. सर्वत्र अंधार पसरला आहे. राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वत:ला सत्य आणि त्या मूल्यांच्या प्रति समर्पित करू ज्याच्यासाठी ते जगले आणि हुतात्मा झाले."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध क्रमांक 5


बापूजी - एक थोर आदर्श

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती॥ २ ऑक्टोबर महात्मा गांधीजींचा जन्मदिवस. आता, आंतरराष्ट्रीय स्तरावर 'अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. अशी नुकतीच वर्तमानपत्रातून बातमी आली. राष्ट्रपिता महात्माजींची अनमोल कारकीर्द- प्रकर्षाने डोळ्यासमोरून जाऊ लागली.

सध्याचे युग 'कलियुग, आक्रमणाचे युग'. रोज वृत्तपत्रात कोठे ना कोठे तरी बंद - हरताळ, जाळपोळ, बलात्कार, लूटमार, दरोडा, घातपात, बॉम्बस्फोट, मोर्चे अशा बातम्या नित्य-परिचयाच्या झाल्या आहेत. शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र आणि सरळमार्गी असणाऱ्या क्षेत्रातूनही विद्यार्थी - शिक्षण महर्षी संस्थाचालक या सर्वामध्ये अनाचार-भ्रष्टाचार-मारामारीच्या बार्ता आता सरसकट येऊ लागल्या आहेत, मागील शतकार्धात आम्ही स्वातंत्र्यासाठी परकीयांसाठी लढत होतो. आता आपणच आपल्याशी झगडत आहेत आणि आपल्या प्रगती मार्गात मोठे अडथळे निर्माण करीत आहोत. - 'राष्ट्राचे भावी नागरिक' म्हणून आपण युवाशक्तीला, विद्यार्थ्यांना आवाहन करतो, जागरूक करण्याचा प्रयत्न करतो,

परंतु हीच शक्ती, हेच विद्यार्थी आपल्या हक्कांविषयी विशेष जागरूक असताना, पण कर्तव्यांविषयी नाही, त्यांच्या त्या पोरकटपणामुळे, अजाणतेमुळे ते न झालेल्या अन्यायाविरुद्धही चिडून उठताना दिसतात. आणि मग अशात-हेने चुकलेल्या या वासरांना योग्य मार्गाला नेणारा आदर्शच राहिला नाही. अशावेळी आठवण होते ती आपल्या बापूजींची, त्या थोर राष्ट्रपित्याची..

ही कोवळी, अपरिपक्व मुले आणि त्यांच्या सभोवताली हे स्वार्थान-अत्याचाराने-सत्ताप्राप्तीसाठी काहीही करायला निघालेल्या सत्तांधाने बरबटलेले. कसे आणि कोण करणार यांच्यावर संस्कार ? कोण देणार यांना उपदेश ? कोण ठेवणार यांच्यापुढे आदर्श ? अशा या बालकांपुढे गांधीजींच्या थोर जीवनाची अगदी जवळून ओळख करून देणे, आज आवश्यक ठरले आहे.

'२ ऑक्टोबर' महात्माजींचा जन्मदिवस या दिवशी आपण सुट्टी घेतो. परंतु निदान तो दिवस तरी विद्यार्थ्यांसाठी के वळ गांधीजींचा जीवनपरिचय करून देण्यात गेला तरी पुष्कळ गोष्टी साध्य होतील. गांधीजींचे बालपण, जीवनचर्या, शिक्षण, बालपणातील अनुभवातून लिहिलेले 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तक, हरिश्चंद्र नाटकाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम, एकदा कोठे बोलल्यानंतर त्यांच्या वडिलांकडून मिळालेली शिक्षा, नंतर प्रत्येक गोष्ट सत्यपणे सांगायची त्यांची सवय, जीवनातील अपयशही प्रामाणिकपणे सांगण्याची त्यांची पद्धत... अशा अनेक गोष्टींचा बालजीवनावर निश्चित चांगला परिणाम होईल.

बापूजींच्या जीवनातील तो अतिशय महत्त्वाचा प्रसंग, द. आफ्रिकेमध्ये असताना... काळ्या लोकांना दिली जाणारी वागणूक तो रेल्वेमधील प्रसंग... त्यातून त्यांचे दिसणारे देशप्रेम... धाडस-धडाडी, निश्चितपणे मुलांना देशप्रेमाचा उपदेश करून जाईल. आपण सामान्य माणसे अनेकदा न पटणाऱ्या गोष्टी इतरांसाठी करतो, इतर लोक आपल्याला हसतील म्हणून आपण घाबरतो. परंतु गांधीजी स्वतः धुतलेले कपडेच परदेशात घालत असत.


बापूजींच्या पंचाची तर आपल्या देशात तर चेष्टा झाली, परदेशातही फार चेष्टा झाली. पण त्यांनी पंचा वापरणे सोडले नाही, अशा पद्धतीने "माझ्या देशातील लोकांना जर अंगभर कपडा मिळत नाही तर, मी कसे घालू अंगभर कपडे ?" असा महान हेतू - विचार त्यांच्यामागे होता. म्हणूनच गांधीजींनाच ते शोभले आणि जीवनभर निभावले. गांधीजींचा ‘संयम' फार मोठा होता. मद्य, मांस आणि परस्त्री या तीन गोष्टींपासून कायम दूर राहण्याचे वचन त्यांनी आपल्या मातेला दिले होते, ते त्यांनी अखेरपर्यंत पाळले. हा संयम - असा मनोनिग्रह आजच्या पिढीत कोठून येणार, कोठे आढळणार?

तो गांधीजींच्या चरित्रातून निश्चितच विद्यार्थ्यांना मिळेल. एकदा त्यांच्या पत्नी-कस्तुरबा यांना 'मीठ' सोडण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्या तयार नव्हत्या म्हणून बापूजींनीच मीठ सोडले, नंतर त्या कबूल झाल्या. गांधीजी खजूर आणि शेळीचे दूध या साध्या गोष्टींवर अखेरपर्यंत जगले.

सत्ता, संपत्ती यांच्या विनाशक स्पर्धेत बापूजी केव्हाही अडकले नाहीत. द. आफ्रिकेतून परत येताना त्यांना मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते कोणत्याच सत्तेच्या पदावर राहिले नाहीत तर निर्वासितांच्या सेवेसाठी रुजू झाले. त्यांचे स्वतःचे अक्षर चांगले नव्हते. पण ते म्हणत वाईट अक्षर हे अपूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे.

अशा या केवळ भारतापुरतेच नाही तर साऱ्या जगात महान ठरलेल्या बापूजींना आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिनाचा हीरक महोत्सव साजरा करताना आमचे शतशः प्रणाम...

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh In Marathi

दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध बघणार  आहोत.  कोणत्यारही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परीणाम दिसण्यास सुरूवात होतात, दूरचित्रवाणी शाप ठरू शकेल अश्या प्रसंगाचे वर्णन या निबंधात केले आहे आणि दूरचित्रवाणी वरदान ठरण्यापसाठी काय केले पाहीजे  याबद्दल माहीती दिली आहे चला तर सुरूवात करूया निबंधाला. 


दूरचित्रवाणीचा प्रसार मुख्यतः शहरांतून मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तरीही काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. असे का बरे?

दूरचित्रवाणीच्या प्रलोभनातून काही धोके जरूर संभवतात. शहरात जागेची समस्या फारच बिकट असल्याने, विशेषत: चाळीतील व झोपडपट्टीतील लोक दूरदर्शनवरील कार्यक्रम अगदी जवळून पाहत असल्यामुळे, त्याचा त्यांच्या दृष्टीवर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी लहान जागेत खूप माणसे तासन्तास बसतात, हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातक आहे. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या विविध वाहिन्यांवरील चित्रपटांमुळे मुले क्रीडांगणाला दुरावली, ग्रंथवाचनाला पारखी झाली. टीव्हीवर कार्यक्रम पाहताना कुणी पाहुणे आले, तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही.

दूरचित्रवाणीवरील बहुसंख्य कार्यक्रम हे चित्रपटांवर आधारित असतात. त्यामुळे युवावर्ग त्या आभासामागे धावतो व वास्तवाला पार विसरून जातो. विविध कार्यक्रमांतून जाहीर केलेली मोठमोठ्या किमतीची बक्षिसेही त्याला स्वप्ननगरीत नेतात आणि प्रामाणिक प्रयत्नांचे व कष्टांचे महत्त्व त्याला वाटेनासे होते.

वास्तविक पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे. खेड्यांतील शेतकऱ्याला, मजुराला त्यांच्या विविध उपयुक्त अशा व्यवसायांचे ज्ञान देता येईल, आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा यक्षप्रश्न उभा आहे. हा प्रश्न सोडवण्यास दूरचित्रवाणीची मोलाची मदत होईल. ज्ञानप्राप्तीत केवळ ऐकण्‍यापेक्षा , पाहणे व ऐकणे अधिक परिणामकारक ठरते. 'दूरदर्शन'मध्ये तर पाहणे व ऐकणे दोहोंचाही समन्वय आहे. या साधनांच्या मदतीने साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो.


तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध खेळांच्या स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे घरी आरामात बसून घेता येतो. हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले रामायण, महाभारत हे ग्रंथ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले ते दूरचित्रवाणीमुळेच ना!

अशा या दूरचित्रवाणीला शाप समजून दूर लोटणे योग्य होणार नाही. मात्र दूरचित्रवाणीचे कोणते कार्यक्रम पाहायचे याबददल कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांनी तारतम्याने विचार करणे आवश्यक आहे. अभ्यासाला पूरक ठरणारे कार्यक्रम विदयार्थ्यांनी अवश्य पाहावेत.

'आधी अभ्यास, मग मनोरंजन' हे पथ्य मात्र दूरदर्शनवरील इतर कार्यक्रमांच्या बाबतीत अवश्य पाळावे. असे झाल्यास दूरदर्शन आपल्याला मोठे वरदानच ठरणार आहे, यात शंका नाही.

 



Television A Bane Or Boon Essay In Marathi
Television A Bane Or Boon Essay In Marathi




मित्रांनो तुम्हाला दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi कसा वाटला हे कमेंट करून कळवा.  भारताला प्रगतीशील समृध्द  राष्‍ट्र बनविण्यातसाठी व दूरचित्रवाणीच्या वापराबद्दल जनजागृती होण्याासाठी हा निबंध आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करा . धन्यवाद 

Nibandh 2 

"अग नीता, तू आहेस तरी कोठे?" नीताच्या आईच्या शब्दांत संताप अगदी ओथंबला होता. “अग, उदया तुझी परीक्षा आणि तू बसली आहेस टी. व्ही. वरचा चित्रपट पाहत." पहिली पाच मिनिटे नीताने लक्ष दिले नाही, पण आईचा सूर चढला, तेव्हा नीता त्या गर्दीतून उठली, मोठ्या नाखुषीनेच. कारण तिच्या आवडत्या नटनट्यांचा चित्रपट चालू होता. नीताच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून नीताच्या बाबांनी दूरचित्रवाणी  आणण्याचे टाळले; पण नीता शेजारीपाजारी जाऊन टी. व्ही. पाहतेच.

  आता हे दुसरा प्रसंग  पाहा. टी. व्ही. वर काहीतरी रंगतदार कार्यक्रम चालला आहे. आईबाबा त्यात रंगले आहेत; तरी घरातील बाबांच्या शिस्तीमुळे मोहन व मुग्धा आपल्या खोलीत अभ्यास करीत आहेत. सातव्या इयत्तेतील मोहनला नफ्यातोट्याचे गणित अडले. खूप प्रयत्न करूनही सुटेना तेव्हा तो वही-पुस्तक घेऊन आईकडे गेला आणि ते उदाहरण सोडवून देण्यासाठी विनवणी करू लागला. “थांब रे बाबा, आता मध्येच नको तुझी कटकट,” टी. व्ही. पाहणाऱ्या आईसाहेब कडाडल्या. मोहन हिरमुसल्या तोंडाने खोलीत परतला. पण त्याचे अभ्यासात लक्ष लागेना. या प्रसंगांतील नीताच्या आईला व छोट्या मोहनला दूरचित्रवाणी ही नक्कीच शाप वाटेल.

दूरचित्रवाणीची लोकप्रियता ही आपल्या देशात वाढतच  आहे,  पण आजही तिचा संचार  मोठमोठ्या शहरांतूनच आहे. अदयापिही ती खेडोपाडी पोहोचली नाही तोच काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. तिचे तोटेच अधिक भासू लागले आहेत. दूरचित्रवाणीच्या आकर्षणातून काही धोके संभवतात. आजकाल त्याची चर्चा वृत्तपत्रांतून होत असते. मुंबईसारख्या ठिकाणी अनेक लहानसहान खोल्यात T.V. ठेवतात व कमी अंतरावरून  चित्र पाहिले जाते. त्याचा दृष्टीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. हा परिणाम काही वर्षांनी लक्षात येईल. दुसरी गोष्ट अशी की, लहान जागेत खूप माणसे तासन् तास बसतात हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातकच आहे.

शनिवारी, रविवारी टी. व्ही. वर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांमुळे मुले क्रीडांगण विसरली. टी. व्ही. वर कार्यक्रम पाहताना कुणी पाहणे आले तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही. मित्रमंडळींशी मोकळ्या गप्पा मारण्याऐवजी बहुसंख्य लोक टी. व्ही. वर नजर लावून बसतात. ज्यांच्याकडे टी. व्ही. संच असतो त्यांना कार्यक्रम पाहावयास येणाऱ्यांकडून विविध त-हेचे त्रास होतात. दूरचित्रवाणी ही ज्ञान व मनोरंजन या दोन्ही उद्दिष्टांसाठी काम करीत असते; पण आज लक्षात घेतला जातो तो भाग केवळ मनोरंजनाचा. त्यामुळे आज अनेकांना दूरचित्रवाणी शाप वाटते. काहींच्या मते दूरचित्रवाणीमुळे समाजातील आर्थिक विषमतेची दरी फार मोठी झाली आहे.

ठराविक रंगाचा चष्मा लावून पाहणाऱ्यांना सर्व वस्तू त्याच रंगाच्या दिसणार. त्यामुळे दूरचित्रवाणीचे तोटे उगाळणाऱ्यांना तोटेच दिसणार. खरं पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी साधन आहे. त्यासाठी दूरचित्रवाणी अगदी खेडोपाडी जाऊन पोहोचली पाहिजे. किंबहुना तिची तेथेच अधिक गरज आहे. खेड्यातील शेतकऱ्याला, मजूराला ती विविध क्षेत्रांतील ज्ञान देईल आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यास दूरचित्रवाणीची फार मोठी मदत होईल. 

ज्ञानप्राप्तीत ऐकण्‍यापेक्षा पाहण्‍याचा मोठा वाटा असतो. केवळ ऐकण्यापेक्षा जे आपण पाहतो ते आपल्या स्मरणात अधिक राहते; अनेक कलावंतांना आपण पूर्वी फक्त चित्रपटांतून पाहत होतो; त्यांना आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीत पाहू शकतो. साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो. विदयार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध त हेच्या खेळांतील स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे साधता येतो. पण त्यासाठी योग्य नियोजन मात्र हवे. 

उलट विदयार्थ्यांपुढे पालकांनी असा दंडकच ठेवावा की अभ्यास पूर्ण झाला तरच चित्रपट पाहावयास मिळेल. आपल्याबरोबर आपल्या घरातील चाकरमाणसे, शेजारची गरीब माणसे यांना दूरचित्रवाणी पाहावयास सहभागी केले तर आर्थिक विषमतेमुळे निर्माण होणारी दरी थोडी कमी होईल.


Nibandh 3

दूरदर्शन (टी. व्ही.): शाप की वरदान? 


अंध धृतराष्ट्राजवळ बसून युद्धभूमीवरील घडामोडी पाहण्याची 'दिव्यदृष्टी' एकट्या संजयला होती. परंतु स्थलकालाचे बुरूज फोडून जगातील कोणतीही गोष्ट, घडामोडी घरबसल्या दाखविण्याची जादू दूरदर्शनने केली आहे. जॉन लॉग बायर्डने दूरदर्शनचा शोध लावून सर्व जग आपल्या छोट्या खोलीत आणले. दूरदर्शनचा शोध अमेरिकेत १९२६ साली जरी लागला असला तरी प्रत्यक्ष भारतात यायला त्याला १९५८ साल उजाडले व रंगीत रूप धारण करायला १९८२ साल.



 सध्या एकंदरीत दूरदर्शनवर (T.V.) 200 पेक्षा जास्त चॅनल्स सुरू झाले आहेत. या 'इडियट बॉक्स'नं खरोखरच सर्वांना वेडं केलं आहे.मुक्त व्यापारी धोरणाचा परिणाम दूरदर्शनवर निखळ, शुद्ध मनोरंजनाचे, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम दाखविण्याऐवजी हिंसा, विकृती यांचे दर्शन मोठ्या प्रमाणात घडविणारे कार्यक्रमच जास्त दिसू लागले आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये दूरदर्शनविषयी जबरदस्त आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, समाजसेवक यांना दूरदर्शनच्या दूरगामी होणाऱ्या दुष्परिणामांची भीती वाटू लागली आहे.



 मुले अभ्यास करत नाहीत, बाहेर खेळायला जात नाहीत, खात नाहीत, त्यांचे डोळे बिघडले, इत्यादी तक्रारी तर ऐकायला मिळतातच, परंतु दूरदर्शनवरील कार्यक्रमातून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण पाहिल्यावर भारतीय संस्कृती' नष्ट होईल की काय, या विचाराने सुशिक्षित लोक धास्तावले आहेत. त्यामुळे उत्तम शैक्षणिक मूल्यं असलेलं हे दृक्श्राव्य साधन ‘शाप' वाटू लागलं आहे.


दूरदर्शनवर ज्ञान व माहिती देणारे कार्यक्रम असतात.  दूरदर्शनवर बालांसाठी, प्रौढांसाठी तसेच युवकांसाठी, महिलांसाठी व ग्रामीण भागातील लोकांसाठी खास कार्यक्रम असतात. दिवसभर कष्ट करून आल्यावर 'दूरदर्शन' म्हणजे एक "दिलासा'च वाटतो.


 परंतु या दूरदर्शनचे नकळत वाईट परिणाम झाले. 'रामायण' टी. व्ही.वर लागायचं त्या काळात आजारी माणसाला 'रिक्षा' किंवा 'टॅक्सी'ही मिळायची नाही. किंवा टी. व्ही.वर चांगला कार्यक्रम लागला असला, की आलेल्या पाहुण्यांशी बोलायलाही लोक तयार नसतात. टी. व्ही.मुळे प्रौढांचे व मुलांचे वाचन कमी झाले. मुलांचा संध्याकाळचा खेळ व प्रौढांचे सायंकाळचे फिरणे बंद झाले. 


ध्वनिप्रदुषण वाढले. केबल टी. व्ही. तर पालकांना डोकेदुखी वाटू लागली. मुलांची मित्रमंडळी कमी झाली. बुद्धिबळासारखे खेळ खेळण्यास पार्टनर मिळू शकत नाही, अशा तक्रारी ऐकू येऊ लागल्या. डोळ्यांवर वाईट परिणाम झाले. एवढेच काय, एखादा दिवस टी. व्ही. बंद ठेवला तर घरात करमत नाही.



वातावरण उदास होते. या झालेल्या सर्व दुष्परिणामांना स्वीकारूनही असं म्हणावं लागेल, की गेल्या तीस वर्षांत टी. व्ही.ने फार मोठी सामाजिक, शैक्षणिक कामगिरी बजावली आहे. टी. व्ही.मुळे अभ्यास होत नाही,' ही गोष्ट तितकीशी खरी नाही. कारण गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांनीही आम्ही टी. व्ही. बघत होतो,' असे मुलाखतीत स्पष्ट सांगितले आहे. 


टी. व्ही.मुळे अंधश्रद्धा कमी झाल्या. वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण झाला. कुटुंबनियोजनाचा सोपा उपाय जनतेला समजला. बालकांच्या आरोग्याचे रक्षण होऊ लागले. पॉझिटिव्ह हेल्थ शो' व 'योगा' या कार्यक्रमामुळे आरोग्यविषयक जाणीव निर्माण झाली. 


टी. व्ही.वरील बातम्या व इतर क्रीडा-विषयक सामने पाहून आंतरराष्ट्रीय खेळाडू लोक पाहू शकले. भौगोलिक ज्ञान व सामान्य ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. एवढी महान कामगिरी टी. व्ही.द्वारे होत असताना टी. व्ही.ला 'शाप' म्हणणे बरोबर होईल का?


टी. व्ही.चे वाईट परिणाम टाळायचे असतील तर पालकांनी, कुटुंबप्रमुखांनी कंबर कसली पाहिजे. टी. व्ही.वरील कार्यक्रमांची निवड केली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवून दिले पाहिजे. त्यात टी. व्ही. पहाण्यासाठी वेळ ठेवला पाहिजे. 'बातम्या,  वर्ल्ड धिस वीक'सारखे कार्यक्रम मुलांसमवेत आपण पाहिले पाहिजेत. 



शैक्षणिक कार्यक्रमांबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण केली पाहिजे.  एखाददुसरी चांगली सिरियलही आवर्जुन मुलांसह पाहावी. परंतु टी. व्ही.वरचे सर्व कार्यक्रम आपण पाहिलेच पाहिजेत, नाहीतर ते कार्यक्रम फुकट जातील असा गैरसमज करून घेऊ नये. 


काय पहावे? किती पहावे? केव्हा पहावे? यांचे भान ठेवल्यस टी. व्ही. देवदूत वाटेल. टी. व्ही.चा उपयोग फक्त मनोरंजनासाठी केल्यास जीवन विलासी बनते. दिवास्वप्न पहाणे, कल्पनाविश्वात रमणे, वास्तवतेला सामोरं जाण्याची असमर्थता निर्माण होणे हे दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे टी. व्ही.वरील सर्वच कार्यक्रम पहाणे हिताचे नाही याची जाणीव पालकांना हवी व ती त्यांनी मुलांमध्ये निर्माण केली तर भावी पिढी प्रक्षोभक, हिंसाचारी, भोगवादी, विलासी न होता सदाचारी, ज्ञानी, देशाबद्दल व मानवतेबद्दल प्रेम बाळगणारी, राष्ट्रीय एकात्मता जपणारी, वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणारी एक सुजाण पिढी निर्माण होईल. मग दूरदर्शन एक वरदान किंवा देवदूत वाटेल!

दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi