महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध | Mahatma jyotiba phule essay in marathi
याचा प्रत्यय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रातून येतो. नवव्या वर्षी वैधव्य आल्यामुळे वपन करून विद्रूप करण्यात आलेल्या गुरुकन्येला पाहून ज्योतिबांंच्या मनाला धक्का बसला. या आपल्या भगिनीसाठी काहीतरी करायलाच हवे हे त्यांच्या मनाने घेतले. असे कृत्य करायला 'धर्माची आज्ञा' हे एकटेच कारण असते, हे त्यांच्या गुरूंच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकल्यावर, तेव्हा त्यांनी आपल्या धर्माविषयी सत्यशोधन करायचेच असा पक्का निर्णय त्यांनी तरूण वयात घेतला.
Mahatma jyotiba phule essay in marathi |
त्यांनाही इतरांप्रमाणे इंग्रजांशी लढण्यासाठी शस्त्रविदया शिकावी असे वाटत होते, पण त्याच वेळी आपल्या समाजातील जातिभेद, अज्ञान आणि स्त्रियांच्या वाट्याला येणारी दुर्दशा त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी इतर धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांपैकी ख्रिस्ती धर्मातील माणुसकीची वागणूक, सेवा, समानता या गोष्टींचे त्यांना विशेष आकर्षण वाटले. येथेच ज्योतिबांंना आपल्या कार्याचा मार्ग सापडला आणि तो कृतीत आणण्यास त्यांनी सुरुवात केली.
नंतर ज्योतिबांंनी मीठगंज भागात १८५१ साली दलित वस्तीत मुलींसाठी शाळा काढली. मागासलेल्यांना सुधारायचे तर त्यांच्यामध्येच जाऊन राहिले पाहिजे, म्हणून त्यांनी आपले घर बदलले. दलितांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या घरातील हौद सर्वांना खुला केला. समाजातील उच्चवर्णीयांतील स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून या अभागी स्त्रियांसाठी त्यांनी १८६३ साली 'बालहत्याप्रतिबंधक गृह' सुरू करून अशा स्त्रियांना आश्रय दिला.
- समाजातील त्रुटी जाणून त्यावर मात करण्याचा निर्धार
- सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास
- इंग्रजीचे अध्ययन
- मुलींसाठी शाळा
- पीडित महिलांना आश्रय
- निर्भयता
- प्रत्यक्ष कृतीने विरोध
- सत्यशोधक समाजाची स्थापना
- सत्य व समता हा संदेश दिला
- सतत समाजाचाच विचार केला.
शाळेत घातले. त्यांंना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. मार्गात अनंत अडचणी आल्या, तरीही त्यांंनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले. ज्ञान ही एक शक्ती आहे,' अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या ज्योतिबांंनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे -
सार्वजनिक पाणवठ्यावरही दलितांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून त्यांनी त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती.
- एक थोर समाजसेवक
- जन्म
- शिक्षण
- महात्मा फुले समाजसेवकांचे अग्रणी
- परंपराग्रस्त समाजाला जागृत करण्याचे जोतिबांचे प्रयत्न
- 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे फुले यांचे आचरण
- स्त्री-शिक्षणाला प्राधान्य
- मुलींसाठी शाळा
- मनुस्मृतीवर घणाघाती हल्ला
- शेतकऱ्यांबद्दल कळकळ
- त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न
- खेडे हा त्यांच्या सुधारणावादाचा केंद्रबिंदू
- शिक्षणाला प्राधान्य
- शिक्षण हे समाजसुधारणेचे प्रवेशद्वार
- फुले यांचे समग्र विचार
थोर समाजसुधारक : महात्मा ज्योतिबा फुले
१९ व्या शतकातील एक महान संत, बहुजन समाज आणि पददलित जनतेचे पहिले उद्धारकर्ते. स्त्रियांना मानाची वागणूक आणि शिक्षण देऊन त्यांना सबल बनविण्याचा प्रथम प्रयत्न करणारी एक महान व्यक्ती. २० फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले बालक पुढील वीस, पंचवीस वर्षांत साऱ्या महाराष्ट्रातील विद्वानांना उच्चभू लोकांना, उच्चवर्णीयांना एक नवीन दिशा दाखवील, एक सामाजिक क्रांती घडवेल, असे स्वप्नातही कोणाच्या आले नसेल.ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण जीवन दीन-दुबळ्यांच्या, रंजल्या-गांजलेल्याच्या उद्धारासाठी निरंतर व्यतीत होत होते. महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांच्या सामाजिक क्रांतीपुढे ज्योतिबांनी घेतलेला ध्यास हा श्रेष्ठ ठरत होता, त्यांचे नाव अग्रगणी घेतले जात होते. आजूबाजूच्या प्रसंगातून-वेगवेगळ्या त्यांना जाणवलेल्या घटनांतून ज्योतिबांना कळून चुकले की भारतीय समाजातील असे कितीतरी घटक आहेत ज्यांना साधे माणुसकीचेही अधिकार मिळत नाहीत.
स्त्रियांच्या दैन्यावस्थेने महात्मा फुल्यांचे अंतःकरण अक्षरशः कळवळले. ज्या समाजात स्त्रीला प्रतिष्ठेचे स्थान दिले जात नाही, त्या समाजाची प्रगती कदापिही होणे शक्य नाही. असे त्यांचे ठाम मत होते. त्यामुळेच ज्यातिबांनी सर्वप्रथम स्त्रीशिक्षण आणि स्त्रीचा उद्धार याच कामाकडे लक्ष दिले. एक स्त्री सुशिक्षित झाली. सारे घरदार सुशिक्षित होते.
'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगता उद्धारी।' या काव्यपंक्तीनुसार स्त्रियांना शिक्षण देऊन शहाणे करण्याचे काम आपल्या धर्मपत्नीच्या सहकायनि सुरू केले. सावित्रबाईंनीही ख्या अनि स्वतः ज्योतिबांकडून शिक्षण घेऊन मुलींच्या शाळेतील शिक्षिकेची भूमिका अत्यंत कष्ट-त्रास सहन करून साकारली. इ.स. १८४८ मध्ये ज्योतिबांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली. समाजकंटकांनी त्यांना आणि सावित्रीबाईंना खूप त्रास दिला. दोघांनी अनेक संकटे झेलली. पण ते डगमगले नाहीत. आपले हे आसिधाराव्रत अविरत चालू ठेवले.
स्वीशिक्षणाबरोबरच दीनदलित आणि अस्पृश्य लोकांची होणारी परवड ज्योतिबांना याचि डोळा, याचि देही अनुभवली होती. या बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्यावर मायेची पखरण घालणारा हा 'महात्मा ज्योतिबा आरंभी एकटाच होता, अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. त्यांना संघटित केले. त्यांच्यात आत्मविश्वास वाढविला. हक्कांची-अधिकारांची जाणीव करून दिली.
महात्मा फुले हे केवळ बोलघेवडे समाजसुधारक...फक्त व्याख्याने झोडणारे-पुढारी नव्हते. त्यांच्या प्रत्येक समाजसुधारच्या कृतीमध्ये एक प्रत्यक्ष कृती-बस्तुपाठ होता. त्यामुळेच ज्यावेळी पुण्यामध्ये एकेकाळी पडलेल्या कडक उन्हाळ्यात, पाण्याच्या दुर्मिक्ष्यतेच्या समयी महात्मा फुल्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी... खास अस्पृश्यांसाठी खुला केला.
'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले।' या संत उक्तीचे प्रत्यंतर अन्यत्र कुठे बरे दिसून येईल ? ज्योतिबांच्या समाजसुधारणा या केवळ चार-दोन क्षेत्रासाठीचे नव्हत्या तर समाजात जेथे जेथे अन्याय दिसतो आहे, अज्ञान दिसत आहे, त्या सर्व क्षेत्रात त्यांनी आपले कार्य सुरू केले. अज्ञानाविरुद्ध लढा देताना अनाथ बालके, विधवा स्त्रिया, कुमारी माता, अस्पृश्य जनता अशा सर्वांना घेऊन सज्ञानी आणि जबाबदार नागरिक बनविण्याचा त्यांनी विडाच उचलला होता. विधवा विवाहास सक्रिय पाठिंबा देऊन पुण्यामध्ये तसे पुनर्विवाह घडवून आणले. समाजातील दुष्ट, हानिकारक प्रथा नाहीशा करण्यासाठी 'भ्रूणहत्या प्रतिबंधक कायदा' आणि त्यांची गृहनिर्मितीसाठी अतोनात प्रयत्न केले.
सामाजिक कार्यामध्ये अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा तयार केला. स्वतःच्या घरी अनाथ बालिकाश्रम उघडला. दुष्काळाच्या प्रसंगी 'छात्रालय' उघडून सर्व समाजाला त्यांनी दिलासा दिला. दारूबंदीसाठी ही पुणे नगरपालिकेमध्ये ठराव पास करून घेतला. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्या कार्याविषयी ही फुल्यांना अतिशय आदर होता. त्यामुळे 'डोंगरी' तुरुंगातून त्या दोघांची सुटका झाल्यानंतर मोठा सत्कार समारंभ घडवून आणला.
१८८८ मध्ये मुंबईत सर्व जनतेमार्फत 'फुल्यांना' 'महात्मा' ही पदवी बहाल करण्यात आली.
अशा या महापुरुषाचे कार्य हे आजही अमर स्वरूपात आपल्यासमोर आहे. 'सत्यशोधक समाजा'चे ते संस्थापक होते. त्यांची साहित्य संपदा - शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न (नाटक), विवेकसार, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, इशारा अशी अनेक पुस्तके त्यांची आपल्याला त्यांच्या महान कार्याची आठवण करून देतात.
“विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।।नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।वित्तविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।"