vidnyan shap ki vardan essay in marathi | विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी 

निबंध क्रं.1  

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. या 2 निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी कश्‍याप्रकारे विज्ञानाचा वापर करून  स्‍वताचे  कश्‍याप्रकारे फायदा  नुकसान केेले आहे. हे तुम्‍हाला निबंधात सवीस्‍तर  वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

'विज्ञान-शाप की वरदान? (science boon or curse?) हा माणसाला पावलोपावली पडणारा प्रश्न आहे. विज्ञानाने प्राप्त करून दिलेल्या शेकडो सोयी-सुविधा तो उपभोगत असतो आणि त्याच वेळी वैज्ञानिक शोधांतून ओढवणारे जीवघेणे अपघातही तो अनुभवत असतो. मग त्याला पुनःपुन्हा प्रश्न पडतो की, विज्ञान हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान?

'विज्ञान'रूपी ही कामधेनू माणसावर प्रसन्न झाली आणि मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाला. चाकाचा शोध लागल्यामुळे माणसाच्या जीवनाला गती आली. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने आपल्या सर्व प्रकारचे सामर्थ्य वाढवले. सात महासागरांपलीकडे पसरलेले जग जवळ आले. इतकेच नाही, तर माणसाने अंतराळात झेप घेतली, संगणकाच्या साहाय्याने तर माणसाने आज अशक्‍य वाटलेल्‍या गोष्टी प्राप्त केल्या. इंटरनेटच्या साहाय्याने दुरवर  असलेली माणसे एकमेकांना रोज भेटू लागली.


vidnyan-shap-ki-vardan-essay-in-marathi
vidnyan shap ki vardan essay in marathi


विज्ञानाची ही किमया श्रीमंतांपासून अगदी गरिबांपर्यंत पोचली आहे. अगदी खेड्यातही भाकरीच्या पिठासाठी कुणा अन्नपूर्णेला जाते फिरवावे लागत नाही. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने स्वत:चे कष्ट खूप कमी केले आहेत; तसेच वैदयकीय क्षेत्रात अनेक शोध लावून अनेक असाध्य आजारांवर मात केली आहे. 

वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांवर मात करता येते. हे सारे पाहिले की मन ग्वाही देते, विज्ञान मानवाला लाभलेले श्रेष्ठ वरदान आहे. अणुशक्ती ही मानवाला लाभलेली परमशक्ती आहे, पण त्याच क्षणी या विसाव्या शतकात झालेल्या दोन विध्वंसक महायुद्धांची आठवण येते. या महायुद्धांत झालेला मानवसंहार पाहिला की विज्ञानाची अवास्तव शक्ती याला कारण आहे, हे प्रकर्षाने जाणवते.

 गेली पन्नास वर्षे साऱ्या विश्वाला तिसऱ्या महायुद्धाची छाया सतत झाकोळून टाकत आहे. 'तिसरे महायुद्ध' झाले तर सारे विश्व नष्ट होण्याची भीती आहे. माणसाने आपल्या विज्ञाननिष्ठेने जे काही मिळवले त्यांतूनच माणसाने आपला विनाश ओढवून घेतला आहे, असे म्हणावे लागते.

विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने भयंकर शस्त्रास्त्रे निर्माण केली, त्यांतून आज दहशतवाद फोफावला आहे. माणसातला माणूस हरवला आहे आणि तो जास्तीत जास्त स्वार्थी बनत चालला आहे. माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. त्यामुळे तो सुखी झाला आहे का, याबाबत संशयच आहे. हे पाहिले की प्रश्न पडतो, खरोखरच 'विज्ञान शाप आहे की वरदान?'

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व विज्ञान शाप आहे की वरदान याविषयी तुमचे मत काय आहे.  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • विज्ञान, माणसाची निर्मिती
  • अनेक फायदे 
  • मानवी जीवन संपन्न करण्यासाठी उपयोगी
  • आरोग्य 
  • वाहतूक 
  • दळणवळणात क्रांती
  • परग्रह निरीक्षणसृष्टीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न 
  • शोधातून अंधश्रद्धा निर्मूलन 
  • प्रयोगाला महत्त्वअणुशक्तीनिर्मिती 
  • मात्र, अणुबॉम्ब आणि इतर शोधांमुळे मानवी जीवन संकटातविज्ञानाचा दुरुपयोग टाळणे मानवाच्या हाती 
  • विज्ञानाचा सुज्ञपणे उपयोग करणे आवश्यक

                                                                 निबंध क्रं.2

Vigyan shap ki vardan marathi nibandh | विज्ञान-सुखदायक की दुःखदायक मराठी निबंध 

इतीहासात राजे महाराजे यांना पण टी.बी. सारख्‍या आजारापुढे काहीही न करता आल्‍यामुळे मृत्‍युशिवाय पर्यांय नव्‍हता परंतु आजच्या युगातील गरीब व्‍यक्‍ती त्यावर मात करून जगतो ही आहे विज्ञानकृपा, हे विज्ञान वरदान  नाही काय ? | आजच्या दैनंदिन जीवनातील एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाचा परिसस्पर्श झालेला नाही. अंघोळीला गिझर, स्वयंपाकाला कुकर, हिंडायला स्कूटर, टोस्टर, रूम हिटर, टी. व्ही. अन् संगणक सारेच! 

ज्ञानाच्या जिज्ञासेतून विज्ञान आले आणि मानवाने आपल्यासाठी त्याला यथेच्छ राबवले. अनेक सुविधांनी माणसाचे शारीरिक कष्ट कमी केले. सुखासीनता वाढवली. निरोपांसाठी स्वतः जाण्याचे श्रम वाचवून फोनवर काम भागवू लागले. हजारो मैलांचा प्रवास, पोटातील पाणी न हालता, विमानाने काही तासांत होऊ लागला. किचकट बौद्धिक समस्या संगणक (Computer) सोडवू लागला. अवकाशाचा शोध घेतला, सागरतळांचा ठाव घेतला. 

चंद्रावर उतरून आता तर मंगळ काबीज करू लागला आहे. काही दशकांपूर्वी देवी, टॉयफॉइड, टी. बी. या रोगांपुढे हात टेकणारा माणूस आता रोग मोडीत काढू लागला आहे...पृथ्वीवरच्या प्रत्येक निसर्गदत्त गोष्टीचा मानवाने, विज्ञानाच्या साह्याने, कौशल्याने वापर करून घेतला...जग अधिकच सुंदर केले ! आकर्षक केले ! ! मोहमयी केले ! ! ! 

स्वतःलाही दीर्घायू करवून घेतले. नैसर्गिक प्रकोपांचे इशारे अगोदरच मिळवून स्वतःचे रक्षण केले.  चार हजार वर्षांपूर्वीच्या पशूच्या पिढीत व आजच्या त्याच पशूच्या पिढीच्या जीवनमानात काहीच फरक पडला नाही...पण माणसाचे तसे नाही. सर्व प्राणि मात्रांमध्ये सर्वात अवलंबी, अशक्त माणसाने, मेंदूच्या चमत्कारातून विज्ञान निर्माण करून करामत केली. 'विज्ञान' या तीन अक्षरांच्या तीन पावलांनी वामनासारखे तिन्ही लोक पादाक्रान्त केले.

पण गुणांच्या छायेतच दुर्गुणही वाढतात. दीर्घायू झाल्याने लोकसंख्येचा विस्फोट झाला. त्याने सामाजिक तसेच वैयक्तिक जीवनातही अनंत प्रश्न निर्माण केले. जीवन यांत्रिक झाले. यंत्रांच्या अती वापराने बेकारी वाढली, शारीरिक दुखणीही वाढली. निसर्ग आणि माणूस यांत अंतर पडले. आयुष्याला एक प्रचंड गती आली आणि माणूस गरगरू लागला. सर्वांत जास्त हानी झाली-मानवी मनाची! विज्ञानाने जरी

                               " दहा दिशांचे तट कोसळले । ध्रुव दोन्ही जवळी आले ॥" 

अशी स्थिती केलेली असली तरी मनामनांमध्ये अंतर पडून “ दोन ध्रुवांवर दोघे आपण"  अशीही परिस्थिती झाली आहे. घरांचे घरपण हरवले आहे. विज्ञानाने समृद्धी दिली पण बदल्यात चैन हिरावून घेऊन बेचैनी दिली... डोळे दिपवणारी प्रगती विज्ञानाने केली पण मानवाला लाक्षणिक अर्थाने आंधळे केले. चेर्नोबिलचा अणुस्फोटाचे भिषण परीणाम बघितल्‍यावरीही मानव अणुभट्ट्या तयार करणे चालूच ठेवत आहे.

एक प्रकारचा उन्माद त्याला आला आहे.  E = MC2 चा वापर माणसांच्याच विध्वंसासाठी करणे म्हणजे तर कु-हाडीचा दांडा गोतास काळच ! अण्वस्त्रांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य ढवळून निघाले आहे. म्हणजेच, विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. ते सर्वस्व नाही. त्याला लक्ष्मणरेषा हवी. ते साध्य नसून साधन आहे. वैज्ञानिक साधनांचा वापर चुकीचा केला गेला तर त्यात चूक साधकाची ! साधनांची नव्हे ....

पण हे ऐकण्याच्याच मन:स्थितीत आज माणूस नाहीये. त्यामुळेच आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आणि कदाचित त्यातच जगाचा अंत आहे.


निबंध क्रं.3  

विज्ञान : शाप की वरदान!

विज्ञान म्हणजे ज्ञान. वस्तुमात्राच्या स्थितीचे गुणधर्मांचे, व्यवहाराचे ज्ञान. आपल्या विश्वातील अणूरेणूंपासून आकाशातील ग्रहगोलांपर्यंत सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची लालसा माणसाला होती व आहे. ही ज्ञानलालसा पुरी करण्यासाठी मानव अखंड धडपडत आहे आणि विज्ञानाची वाटचाल अखंड चालू आहे.


विज्ञान ही माणसाला लाभलेली दिव्य शक्ती आहे. मानवाने विज्ञानाची उपासना केली आणि म्हणूनच त्याची आदिमानवाच्या अवस्थेपासून आजच्या अवस्थेपर्यंत प्रगती झाली. आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र नाही जेथे विज्ञानाने प्रवेश केला नाही व जे समृद्ध केले नाही. विज्ञानाच्या बळावर माणसाने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. 

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आपल्याला टी.व्ही., रेडिओ, पंखे, फ्रीज, वॉशिंग मशीन, वातानुकूलन यंत्रे अशा अनेक सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत. टेलिफोन, फॅक्स, ई-मेल, इंटरनेट या साऱ्यांद्वारे आपण जगाच्या कानाकोपऱ्यात संपर्क साधू शकतो.


औद्योगिक क्षेत्रातही विज्ञानाने फार मोठी क्रांती केली आहे. अत्याधुनिक छपाई यंत्रावर वृत्तपत्रांच्या लाखो प्रती काही तासांतच छापून वितरणासाठी पाठवल्या जातात. माणूस विविध प्रकारची वाहने वापरतो. समुद्राच्या तळाशी जातो, आकाशातही भरारी घेतो. कृत्रिम उपग्रह सोडून माणूस अवकाशावर सत्ता गाजविण्याच्या प्रयत्नात आहे. वेधशाळेत यंत्रांद्वारे वादळ, मुसळधार पाऊस आदी अनिश्चित गोष्टींचा अंदाज करता येऊ लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा विज्ञानामुळे मानवाने फार मोठी झेप घेतली आहे.


रोगनिवारणासाठी अनेक प्रभावी औषधे निर्माण झाली आहेत. मानवाचे निरुपयोगी झालेले अवयव शस्त्रक्रियेद्वारा बदलून त्याला जीवदान देता येते, अपंग माणसाचे अपंगत्व घालवून त्याला निरोगी सुखी जीवन जगण्याची संधी देता येते.


विज्ञानाने शेतीमध्येसुद्धा अनेक प्रयोग केले आहेत. संकरित बी-बियाणे, जपानी भातशेती असे प्रयोग करून आपण धान्य उत्पादन वाढवू लागलो आहोत. अशा त-हेने विज्ञानामुळे आजच्या मानवाचे जीवन अधिक आनंदमय व स्वास्थ्यपूर्ण झाले आहे. विज्ञान ही आपल्याला लाभलेली कामधेनू आहे. __परंतु या विज्ञानरूपी गुलाबाला काटे आहेतच.


विज्ञानामुळे अनेक उद्योगधंदे वाढले आहेत. त्यामुळे वायुप्रदूषण, जलप्रदूषण वाढत आहे. मानव यंत्रांचा गुलाम बनू लागला आहे. शाश्वत नीतिमूल्ये नष्ट होऊ लागली आहेत. विज्ञानाच्या शोधांमुळेच अॅटमबाँब निर्माण होऊ शकला, भयानक शस्त्रास्त्रे तयार केली गेली आणि जीवघेणी महायुद्धे मानवाच्या नाशाला कारणीभूत ठरली. विज्ञानाने माणसांच्या विघातक सामर्थ्यात केलेली वाढ भयावह आहे. त्यामुळे विज्ञान हा अखिल मानवजातीला मिळालेला शापच आहे असे वाटू लागते.


परंतु हा दोष विज्ञानाचा नाही, तर माणसाच्या वृत्तीचा आहे. विज्ञान ही एक शक्ती आहे. अग्नी जसा उष्णता निर्माण करण्यासाठी, अन्न शिजविण्यासाठी वापरता येतो, तसाच आग लावण्यासाठीही वापरता येतो. तो कशासाठी वापरावयाचा हे वापरणाऱ्यावर अवलंबून असते. विज्ञानाचे तसेच आहे. विज्ञानाने मानवी जीवनाला विलक्षण गती दिली आहे,


मानवाची सर्वांगीण प्रगती घडविली आहे. विज्ञानामुळेच त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. म्हणून विज्ञानाचा वापर चांगल्या कार्यासाठीच केला तर हे वरदान मानवाला निश्चितच उपकारक ठरू शकेल. आपले जीवनमान उंचावणारे विज्ञान हे मानवाला लाभलेले वरदानच होय!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद 

vidnyan shap ki vardan essay in marathi | विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी


Internet shap ki vardan in marathi essay | इंटरनेट  शाप की वरदान मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण इंटरनेट  शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. इंटरनेटचा वापर करणे आजकाल फार सामान्‍य झाले आहे. परंतु जसा इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्‍यांचे वाईट व चांगले परीणाम स्‍पष्‍ट दिसायला सुरूवात झाली आहे. इंटरनेटचे फायदे तोटे (internet che fayde tote)  या निबंधात सविस्‍तरपणे स्‍पष्‍ट केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 
 
निसर्गाने दिलेल्या शक्तीचा वापर हा माणसाच्या मतावर आणि त्याच्या माणुसकीवरच अवलंबून आहे. भौतिक सुख प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केलेल्या अविरत मेहनतीचे फळ म्हणजेच आजच्या भौतिक सुधारणा होय. त्यांपैकी इंटरनेट  हे सुद्धा एक होय. हे दिव्य ज्ञान आता वरदान आहे की शाप हे खालील मुद्द्यांवरून ती स्पष्ट करू इच्छितो.

इंटरनेटचा वापर मुख्यत्वे संकेतस्थळांवर (वेबसाईट) साठवलेल्या माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता होतो.  इंटरनेटच्या माध्यमातून आपण काही गोष्‍टींचा उत्कृष्ट वापर करू शकतो. जसे e - बँकिंग, e - कॉमर्स, e - चौपाल, e - मेल इत्यादी. म्हणजे आज इंटरनेट वापर ही नित्याची बाब झाली आहे.

इंटरनेटला मेलच्या (संदेशाच्या) माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या 'साबीर भाटीया' या युवकाने 'हॉटमेल'चा शोध लावून केले. सध्या न्यूयॉर्क शिकागो, पॅरीस इत्यादी ठिकाणी अनेक कंपन्यांचे 'माहिती साठवणूक केंद्रे' आहेत व त्या माध्यमातून भूस्थिर उपग्रहाच्या साहाय्याने संकेतस्थळांचा वापर करून हवी ती माहिती इंटरनेटवरून मिळवता येते.

internet-shap-ki-vardan-in-marathi-essay
internet-shap-ki-vardan-in-marathi-essay


इंटरनेटचे संकेत स्थळ असलेले 'Google Earth' हे लष्‍करी दृष्‍टीकोनातुन बघीतले  एक शापच आहे. उपग्रहाच्या साहाय्याने जगातील कुठल्याही ठिकाणांची चित्रे व चित्रफिती कोणत्याही अडथळ्याशिवाय बघणे हे लष्करीदृष्‍टीकोनातुन अतिशय हानिकारक आहे. 

'इंस्टंट न्यूज'सारखे 'ब्लॉग' तयार होण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. त्यामुळेच चुकीची  माहिती सर्रास उपलब्ध असते. ही सामाजिक व राजकीयदृष्ट्या गंभीर बाब आहे. 'व्हायरस' ही इंटरनेटला लागलेली कीडच होय. अशी प्रोग्राम्स तयार करणे ही समाजाला लागलेली कीड, असाध्य रोग आहे. विशेषतः इंटरनेटच्या माध्यमांतून मुलींसोबत होणाऱ्या गैरव्यवहाराचे प्रमाणसुद्धा अतिशय जास्त वाढले आहे.

स्वतःची ओळख लपवण्याची सुविधा असल्याने व कोणतीही प्रतिक्रिया न होण्याच्या विचाराने सामाजिक, राजकीय, आर्थिक गैरव्यवहारांचे प्रमाण गेल्या ३-४ वर्षांत खूप वाढले आहे. वरील गैरव्यवहार, गैरप्रकार इतके जास्त वाढले आहेत की त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'सायबर क्राईम विभागांची' स्थापना करावी लागली. म्हणजे मानव जातीला ठरलेला शापच आहे.

पण याच इंटरनेटमुळे जगातील प्रत्येक व्यक्ती एक-दुसऱ्याच्या अतिशय जवळ आला, त्यांचा वेळ वाचला, त्यांच्यात आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली. जग प्रेमाने जिंकता येते असे म्हणतात, त्याच शब्दांना खरे करण्याचे कार्य इंटरनेट करते आहे. हवी असलेली माहिती क्षणार्धात तुम्हांला इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या मिळते, तुमचा फायदा होतो, वेळ वाचतो. पत्र व्यवहार, आर्थिक व्यवहार यांना लागणारा वेग हा १००० पटीनी वाढला झाला आहे त्‍यामुळे ही कामे कमी वेळात पुर्ण होत आहेत.  

देशादेशाविषयीची माहिती उपलब्ध असल्याने देशांना संपर्क करण्यास व त्यातून सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक देवाणघेवाण करण्यास मदत होते, हा अतिशय मोठा फायदा आहे. आर्थिक व्यवहार हे वेळेच्या मर्यादेत जर झाले तर फायदेशीर असतात. इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणावर होतो (शेअर मार्केट).

कित्येक जणांनी इंटरनेटच्या माध्यमातून लग्नसुद्धा जुळवली आहे. मन जुळली आहेत, लोक जवळ आली आहेत, विभिन्न देशांतील संस्कृतीचा परिचय एकमेकांस झाला... एकूणच जग अतिशय छोटे झाले आहे तर आपण याला शाप कसे म्हणणार हे तर वरदानच होय. 

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .

हा निबंध मराठी भाषेत ( marathi language ) आहे.  शब्‍दमर्यादा 500 

या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते 

  • marathi essay on internet advantages and disadvantages
  • Internet is a blessing or curse in Marathi Essay

Internet shap ki vardan in marathi essay | इंटरनेट शाप की वरदान मराठी निबंध

Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध 


माझा आवडता ऋतु पावसाळा मराठी | maza avadata rutu pavsala essay in marathi

ग्रीष्म ऋतू म्हणजे सर्व निर्जीव-सजीव वस्तू आणि प्राणिमात्रांना होरपळून काढणारा ऋतू... न्हाळा म्हणजेच ग्रीष्म मानवाला नकोनकोसे करून सोडतो. सारी जीवनसृष्टी हवालदिल होऊन जाते. 'पुरे-पुरे आता तो उन्हाळा !' असा आक्रोश करू लागतात. आणि तेवढ्यात कोठे तरी एखादा काळा ढग दिसू लागतो.

चातकाप्रमाणे आतुर झालेला मानव त्याला न्याहाळू लागतो. एकाएकी एकमेकांवर ढग आपटू लागतात, त्या तालावर मोर नाचू लागतात, बेधुंदपणे वारा वाहू लागतो. आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर पडू लागतात. धरित्री तर केव्हाची तहानलेली असते. भराभरा ते पाणी अधाश्याप्रमाणे पिऊन टाकते. तिची तहान भागते, ती वसुंंधरा आनंदाने पुलकित होऊन...


सगळीकडे आपल्या जवळचा सुगंध पसरवून टाकते. मग तर मोर बेहोष होऊन नाचू लागतात. गुरे, ढोरे शेपट्या उंचावून धावत सुटतात. बेडकांच्या तर 'डराँव डराँव'ने सारा आसमंत भरून जातो आणि 'वर्षा ऋतू'चे आगमन मोठ्या उत्साहात या पृथ्वीतलावर होते.


खरोखरीच या चराचरसृष्टीला मिळालेली अनमोल भेट म्हणजे हा 'वर्षा ऋतू' होय. 'नवचैतन्य' घेऊन येतो हा वर्षा ऋतू. कालपर्यंत उजाड-खडकाळ माळरान तापलेला, तो दोन-तीन दिवसात हिरवागार होऊन जातो. या हिरव्या रंगांच्या छटा तरी किती हो ! हिरवा कंच... काळपट हिरवा... पोपटी हिरवा... हिरवागार हिरवा... अशा विविध रंगात रोपटी वाढतात.


शेते बहरतात. झाडे फळे-फुले-पाने यांनी बहरून जातात. मानवाला आपले सारे वैभव देण्यास आनंदाने डुलू लागतात, नम्र होतात. मक्याची-ज्वारीची-गव्हाची ताटे, लोंब्या वाऱ्यावर डोलु लागतात. कळ्या उमलू लागतात, फुले हसू लागतात अन् हिरव्यागार शालूवर पाण्याचे मोती चमकू लागतात.

ग्रीष्मात आटून गेलेल्या नद्या-नाले-ओढे आता दुथडी भरून वाहू लागतात. त्यामधील दगड-धोंडे-गोटे-खडक एकदम स्वच्छ धुऊन जाऊन चमकायला लागतात. नद्यांची पात्रे अथांगपणे भरधाव वाहु लागतात. असा हा जीवनदायी 'पावसाळा'. मानवी जीवनाला समृद्ध करून टाकतो.

Maza-avadata-rutu-essay-marathi-language
Maza-avadata-rutu-essay-marathi-languageAdd caption

कोठेही नजर टाका, हिरवा मांगल्याचा, सूचक समृद्धीचा प्रतिक, डोळे अन् आत्मामन तृप्त करणारा हा वर्षा ऋतू म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटतो. ना ग्रीष्माचा दाह ना शिशिरातील थंडीचा कडाका.. सगळा कसा सात्त्विक... सौम्य स्वभावाचा आल्हाददायी हा ऋतू. आषाढातील वर्षाचे आगमन...


याच आषाढात... संपूर्ण वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी वारकऱ्यांची लाट येते... 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात वारकरी चिंब भिजून जातात. पण उत्साहात नाचत राहतात.

शेतकरी या पावसाच्या धारामध्ये आपल्या घामाच्या...कष्टाच्या धाराही मिसळतो अन् मग काय ? आनंदच आनंद. धरित्री भरभरून पीक देते. शेतकरीच नव्हे तर सर्व प्राणिमात्र आनंदीत होतात.

तसा पाहिला तर 'वर्षा ऋतू', 'वसंत ऋतू'च्या पुढे उपेक्षिला जातो. परंतु त्या 'वसंत ऋतूच्या क्षणिक सुखापुढे या 'वर्षा'चा उदात्तपणा. उदारपणा केवढा महान असतो. खरोखरीच वर्षा ऋतू सृष्टीचे 'सौभाग्य' आहे. ती मानवी जीवनाची 'गंगोत्री' आहे. मानवाला मिळालेले 'महान वरदान' आहे.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .


Maza avadata rutu marathi nibandh


निबंध 2



घरामध्ये महिलामंडळच भरलं होतं. सर्वांजवळ पोळपाट लाटणी होती, म्हटलं , “ मोर्चा आहे की काय ? " म्हणून आईला विचारलं तर, " अरे, पावसाळा आला ना तोंडावर ! वर्षाचे पापड, लोणची करून ठेवते - " उत्तर आलं...पावसाळा येणार त्याची अशी आगमनाची वार्ता घरोघरी होणाऱ्या पापड लोणच्यांनी येते. तशीच लगबग सर्वत्र दिसते.

छत्र्या दुरुस्तीला निघतात, गच्चीवर गळती थांबवण्याचे लेप दिले जातात, बाजारात छत्र्या रेनकोटची रेलचेल होते, विक्सच्या जाहिराती वाढतात, शेतकरी शेतं नांगरून आभाळाकडे नजर लावून बसतात...!
पावसाची नऊ नक्षत्रं कोरडी गेली तर ग्रीष्माची अनिर्बंध सत्ताच ! एरवी ग्रीष्माने भाजून काढलेल्या जमीन, झाडवेली, पशुपक्षी यांना दिलासा देते ती वर्षाराणीच...

मृगाच्या रथात बसून बिजलीचा चाबूक घेऊन, नभांच्या मेघगर्जनेच्या तुताऱ्या फुकत तिचं दिमाखदार आगमन होतं. साऱ्या आसमंतात मृद्गंधाचं अत्तर उधळलं जाऊन सारं वातावरण कसं सुगंधी होतं. मरगळलेले वृक्ष वेली अंग झटकुन चैतन्यानं फुलू लागतात, आनंदान डोलू लागतात.

कोरड पडलेल्या नद्या, ओढे, तळी, धरणे पाणी पिऊन आनंदीत होतात. अगोदरच तयार करून ठेवलेल्या घरट्यात पक्षी विसावतात. दाणागोटाही अगोदरच साठवलेला असतो म्हणून हळूच डोकावून वर्षाराणीचं वैभव निःशब्दपणे कौतुकाने बघतात.


मुंग्याही वारुळाचा आश्रय घेतात. हिरवा शालू नेसून काळ्या मेघांचं काजळकुंकू करून तर जास्तच गोड दिसते. घरांच्या छपरावर होणारी टप टप् कृषिराजाला मधुर स्वर वाटू लागतात.
शहरातून वाहतूक विस्कळीत होते. क्वचित वीज जाऊन अंधारात जग बुडून जाते. “ ये रे ये रे पावसा..." म्हणत मुलं नाचतात. कागदी नौदल प्रमुख होऊन आईचा मार खातात...कुणी रसिक गरम गरम चहाचे घुटके घेत उबदार पांघरूण घेऊन झक्कपैकी कादंबरी वाचत पडतो...

सारी सृष्टी बेहोष होते. बेभान, धुंद होते. तशीच बेहोषी भाविकांनाही येते. नामसंकीर्तनात दंग होऊन त्यांची "पाऊले चालती पंढरीची वाट ! " चंद्रभागेच्या तीरी जल्लोष होतो. टाळ मृदुंग आकाश दणाणून सोडतात.
...पण हीच वर्षाराणी रुसली तर तोंडचं पाणी पळवते. डोळ्यात पाणी आणते. देवाला गाभाऱ्यात कोंडलं जातं, एवढेच काय गाढवागाढवीचं लग्नही लावलं जातं. कृषिराजा भिकारी होतो. गायवासरे कसायांची धन होते.

पाणी...वेळच्या वेळी, हवा तेवढाच पाऊस पडला तर सर्व धरित्री सुजलां सुफलां होते. तीन महिन्यांत वर्षाची बेगमी होते म्हणूनच का तिला वर्षा 'राणी म्हणत असतील."

Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध बघणार आहोत. क्रिकेटचे आणि भारताचे एक निराळेच नाते आहे.  हॉकी राष्‍ट्रीय खेळ असल्‍यावरही गल्‍ली बोळामधेही आपल्‍याला क्रिकेटचे सामने आपल्‍याला दिसुन येतील. क्रिकेटचे भारतात असलेले वेड  आणि खेळाडुंची क्रिकेटला जिव की प्राण म्हणुन खेळण्याची तळमळ आपल्याला खालील ४ निबंधामधुन दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  


माझा अविस्मरणीय सामना : यंदा 'महाविद्यालयीन ट्रॉफी जिंकून आणायचीच. अशी प्रतिज्ञा आमच्या मुंबई कॉलेज संघाने केली होती. त्यासाठी गेले सहा महिने रात्रंदिवस सराव चालू होता. मागील  वेळेस  हातातोंडाशी आलेली ट्रॉफी शेवटच्या बॉलवर घालवावी लागली होती. आता कोणतीही कसर सोडायची नाही अन् कसूरही करायची नाही असा निश्चय केला होता सर्व खेळाडूंनी...

सामने सुरू झाले, अन् आमचा सामना अंतिम डावापर्यंत तरी कोणतीही अडचण न येता पोहोचला. आता खरा कसोटीचा क्षण होता. आमच्याबरोबर खेळणारा संघही काही कमी नव्हता. त्याची ही तयारी उत्तम होती. 'ट्रॉफी' जिंकण्यासाठी त्यांनीही जिद्दीने खेळ सुरू केला होता. तोडीस तोड - धावांबरोबर धावा - खेळ कसा अटीतटीचा चालला होता. (हे पण वाचा मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध)

दोनवेळा सामना अनिर्णित राहिला. अर्थात त्यामुळे विश्रांतीचा दिवसही रद्द करून सामना चालू ठेवायचा आणि त्यातून निर्णय घ्यायचा असे ठरले. वादावादी, गाजावाजाही वाढत होताच. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. स्टेडियम माणसांनी कसे फुलून गेले होते. अशा सामन्यातून आंतरराष्ट्रीय संघांची निवड होणार असते. देशभरातून अनेक क्रिकेट शौकिनांनी आज भाऊगर्दी केली होती.

एखादा चौकार असो किंवा षटकार सारा स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमून निघत होता. एखादा झेल सुटला तरी सगळीकडे निराशेचा सुस्कारा ऐकू येत होता. इकडे विरुद्ध संघही बचावाचा खेळ खेळत होता. त्यामुळे खेळात तसा रंग चढत नव्हता. विकेट तर आमच्या गोलंदाजांनाच अनुकूल होती. परंतु नावाजलेल्या गोलंदाजांची गोलंदाजीही आज मूग गिळून बसली होती. 

मैदानाच्या दिशेने आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली, कागदांचे बोळे यायला लागले. अखेरीस दिवस संपेपर्यंत विरुद्ध संघ कसाबसा संपूर्ण आटोपला तेव्हा त्याच्या २१० धावा झाल्या होत्या.

दुसरा दिवस उजाडला तो आमच्या संघाच्या धडाडीच्या खेळानेच. चौकारांच्या दणक्याने कांबळीने सर्वांना खूश करून सोडले. तर सरदेसाईची त्याला साथ आणि चोरट्या धावा यामुळे आमचा संघ धावसंख्या वाढवीत होता. अखेरीस ३०४ धावांवर आमचा संघ बाद झाला अन् ९४ धावांनी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात विरुद्ध संघानेही धावांचा डोंगर रचायला सुरुवात केली.

पहिल्या आघाडीच्या पाच खेळाडूंनी जणू चंगच बांधला होता. एकही बॉल, बॅटला स्पर्श केल्याशिवाय जातच नव्हता. ९४ धावांची आघाडी पार करून त्यांनी पुढे जोराचा पवित्रा घेतला आणि अखेरचा गडी बाद होईपर्यंत आमच्यावर १९९ धावांची आघाडी मिळविली.

mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi
mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi


आमच्या संघाला वाटले, ही धावसंख्या आपण सहज पार करू. परंतु पहिले तीन खेळाडू जेमतेम ४०-४५ धावा करून तंबूत परतले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. इकडे विरुद्ध पक्षाला 'चिअरअप' जोरात सुरू झाला आणि आमच्यावर दबाव वाढला.

नशिबाने साथ दिली. अन् पुढील दोन खेळाडूंनी दमदार खेळ सुरू करून धावसंख्या १५० पर्यंत नेली. पुन्हा एकापाठोपाठ पाच गडी बाद झाले. आता धावसंख्या पार करण्यासाठी ५० धावांची गरज होती. नववा गडी म्हणून मी तंबूतून बाहेर पडलो. खरा मी गोलंदाज, आता बॅट कशी साथ देते तेच पाहायचे होते. कॅप्टनने मला धीर दिला. माझी पाठ थोपटली. मी मैदानावर आलो. बॅटला बॉल लागला आणि समोरच्या खेळाडूच्या मदतीने धावा सुरू केल्या.

 दोघांनी मिळून ४३ धावा केल्या. तेवढ्यात समोरचा गडी बाद झाला. पुन्हा टेन्शन वाढले. पाहिजे होत्या फक्त ७ धावा. आता दहाव्या खेळाडूला धीर देण्याची वेळ माझी होती. तो दबकत दबकत खेळत होता. चोरटी एखाद्-दुसरी धाव काढत होता. एक चेंडू आला अन माझ्याकडून दणदणीत चौकार मारला गेला अन् स्टेडियम दणाणून गेले. कप्तानासह सर्व खेळाडुंनी मैदानाकडे धाव ठोकली. मला व माझ्या जोडीदार खेळाडूला उचलून घेतले.

गौरवाने तंबूत आणले, जणू काही मीच एकटा यशाचा मानकरी होतो. आमच्या संघाने ट्रॉफी जिंकली होती. ट्रॉफी घेतानाही आमचा सर्व संघ उपस्थित होता. ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचत होता. असा हा माझा क्रिकेटचा सामना माझ्या जीवनातील अविस्मरणीय सामना ठरला. (100 हुन अधिक निबंध वाचा तुमच्‍या मोबाईलवर  )

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .

निबंध 2

 एक रंगलेला क्रिकेटचा सामना


आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. एके दिवशी मोठ्या माणसांचा क्रिकेटचा सामना घ्यायचे ठरले. माझे बाबासुद्धा त्यात सामील झाले. 'संघ अ' आणि 'संघ ब' असे दोन संघ तयार करण्यात आले. आमच्या वसाहतीतील सर्व घरांत ही बातमी पसरली. सर्वांना उत्सुकता वाटत होती.

मग सामन्याचा दिवस उगवला. दोन्ही संघ मैदानात उतरले. वसाहतीत सर्व लोक सामना पाहण्यासाठी जमले होते. काहीजण खिडकीतून पाहत होते. सामना सुरू झाला. काहीजण खरोखरच छान खेळले. 'अ' संघातल्या चित्रेकाकांनी ५० धावा काढल्या, तर 'ब' संघातल्या मूर्तीकाकांनी सहा गडी बाद केले. बोंद्रेकाका खूप जाडे आहेत. त्यामुळे धावताना ते मजेशीर दिसत होते.

एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते. अखेरीस ‘संघ अ' विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.

 महत्‍वाचे मुद्दे :

  • आम्ही मुले नेहमीच खेळतो 
  • एके दिवशी मोठ्या माणसांचा सामना 
  • काहीजण चांगले खेळले 
  • काही गमती 
  • आनंदाचे वातावरण.

निबंध  3

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना 


भारतीय संघ बांग्लादेशात खेळायला निघाला होता. कोण जाणार, कोण नाही याची चर्चा होऊन शेवटी संघ रवाना झाला. एकदिवसीय चार सामने आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार होते. सुरुवात तर चांगली झाली. एकदिवसीय चारही सामने भारतीय संघाने जिंकले.

पण यात विशेष आवडला तो दुसरा कसोटी सामना. कारण, या सामन्यामुळे विश्वचषक सामन्यात लागलेला कलंक पुसला गेला. बांगलादेशच्या याच संघाने आमच्या सर्व वीरांना चारी मुंड्या चित केले होते. त्याच संघावर  आमच्या क्रिकेट वीरांनी नेत्रदीपक विजय मिळवला.


असा हा सामना बांग्लादेशातील ढाका येथील शेरेबांगला स्टेडियमवर झाला. प्रथमच नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीलाच आपल्या खेळाडूंना सूर सापडला आणि भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या वेगवान व फिरकी गोलंदाजीचे पार खोबरे करून टाकले. एकापाठोपाठ एक अशा पाच फलंदाजांनी आपली शतके झळकावली.

सचिन व सौरभ यांनी आधीचा लागलेला डाग पुसून टीकाकारांची बोलती बंद केली. सहाशे दहा धावांचा डोंगर रचून भारतीय संघाने आपला डाव सोडला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला, बांग्लादेशला, खेळाची संधी दिली.
भारताच्या झहीर खानच्या तुफानी गोलंदाजीपुढे बांग्लादेशचा अर्धा संघ बाद झाला. उरल्यासुरल्या फलंदाजांना अनिल कुंबळेने तंबूत पाठवले.

चारशे धावांचे ओझे घेऊन फालोऑन स्वीकारून बांगलादेश दुसरा डाव खेळायला मैदानात उतरला. आता पाऊसच त्यांना वाचवू शकणार होता. पण त्या दिवशी तोही त्यांच्यावर फिदा नव्हता. या डावात बांगलादेशच्या खालेद मासूद, अश्रफूल आणि मोर्तझा यांनी अटीतटीची झुंज दिली. पण भारतीय खेळाडू आता पेटून उठले होते. अगदी सचिनने गोलंदाजीतही आपली करामत दाखवली आणि दोन गडी टिपले. भारताने बांग्लादेशचा १ डाव आणि २३९ धावांनी दणदणीत पराभव केला.

या यशाने भारताने जणू दाखवून दिले, 'हम भी कुछ कम नही !' आता आपल्या लाडक्या खेळाडूंवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली, याचा मला विशेष आनंद झाला.

महत्‍वाचे मुद्दे :
  • विश्वचषक सामन्यात आलेले अपयश 
  • त्यामुळे निंदानालस्ती
  • मन दुखावले 
  • बांग्लादेशात सामने 
  • फलंदाजीतील पराक्रम 
  • गोलंदाजीतील विक्रम
  • मिळालेले यश
  • यशाचा परिणाम. 

निबंध 4


मी पाहिलेला चुरशीचा सामना 

इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने चालले होते. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांत उपांत्य सामना होणार होता. हा मी पाहिलेला अत्यंत चुरशीचा सामना होता. सामन्याचा दिवस उजाडला. मी खादयपेये घेऊन स्टेडियमवर गेलो. ठीक वेळेवर दोन पंच आणि दोन्ही संघांचे कप्तान मैदानावर आले. नाणेफेक झाली.

त्यात दक्षिण आफ्रिकेच्या कप्तानाने हॅन्सी क्रॉनिएने बाजी मारली. मैदानाचा रागरंग पाहून त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. कप्तानाने चेंडू शॉन पोलॉक याच्या हातात दिला.

आता साऱ्या प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या खेळाची सुरवात मोठ्या सावधपणे केली. खेळ थोडा धीमा वाटत होता. प्रेक्षक धावांच्या आतषबाजीसाठी आतुर होते; पण फलंदाज फारच जबाबदारीने खेळत होते.

नियोजित पन्नास षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर २१३ धावा झळकावल्या. चाळीस मिनिटांची विश्रांती सुरू झाली. क्रीडांगणावर खेळाडू नव्हते, प्रेक्षक जरा सैलावले होते. बरोबर आणलेल्या खादयवस्तूंचा समाचार घेणे सुरू झाले. पण कोठेही कागद फेकाफेकी नव्हती. विश्रांतीचा काळ संपला; पण कोठेही अस्वच्छतेचा अंशही नव्हता.

थोड्याच वेळात दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मैदानावर फलंदाजीसाठी उतरले. ऑस्ट्रेलियाचा संघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. सुरवात चांगली झाली. धावफलकावर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बिनबाद ४६ धावा लागल्या. जॉन्टी होडस व लान्स क्लसनर यांनी वेगाने फलंदाजी केली.

धावफलकावर ७ गडी बाद २०० धावा लागल्या. आता फक्त १४ धावा करायच्या होत्या. बहुतेक हेच दोन्ही खेळाडु सामना जिंकून देतील, असे वाटत असतानाच जॉन्टी बाद झाला. सारे प्रेक्षक हळहळले. जमलेली जोडी फुटली होती. नंतर आलेला शॉन पोलॉक शून्यावर बाद झाला. आता चुटपूट लागली, दक्षिण आफ्रिका सामना गमावणार की काय? पण अखेरच्या षटकात क्लुसनरने तीन चौकार मारले.

 आता फक्त दोनच धावा हव्या होत्या; पण शेवटचा फक्त एकच गडी बाकी होता. कशीबशी एक धाव मिळाली. आता एक धाव काढली की विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार होता. सारे प्रेक्षक नि:स्तब्ध होते आणि दुर्दैव म्हणजे, डोनॉल्ड धावचीत झाला. दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच झाली, २१३ ! मॅच 'टाय' झाली होती.
मग विजय कोणाचा? सारे वातावरण संभ्रमित होते. पंच निर्णय काय देणार?

 सर्व अधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर झाला. साखळी सामन्यांत पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली असल्यामुळे 'ऑस्ट्रेलिया'चा संघ विजयी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. 'क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स' म्हणतात ते यासाठीच! आजवर मी अनेक सामने पाहिले; पण अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकवून धरणारा असा रंगतदार सामना मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.

महत्‍वाचे मुद्दे :
  • सामना कोठे व कोणत्या खेळाचा 
  • संघ 
  • सामन्याचे वर्णन 
  • सामना आवडल्याची कारणे 
  • अविस्मरणीय घटना 
  • सामना पाहून आल्यावर मनात आलेले विचार...

निबंध 5

मी पाहिलेला एक क्रिकेटचा सामना (क्रिकेट मॅच)


 एकदा मी एक विलक्षण अद्भुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते.


१ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं' हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता. 


वास्तविक ते टेनिस - बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस बांधले होते. त्यांच्या पॅडसचं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. 

त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस," पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस ? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुंकी  लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुंकी  लावली की चेंडू थुंकी  भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.  एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता.


त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट !" अंपायर गोंधळला "आऊट कसा' ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; 


अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!" अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.



गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. एका संघाची पाळी संपली. 


मग चौकशी सुरू झाली "स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, 


"मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो. "अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो." लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, 



त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. 


निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.

निबंध 6

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi


क्रिकेट मॅच) एकदा मी एक विलक्षण अदभुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. 

एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते. १ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. 


दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं" हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता.


वास्तविक ते टेनिस बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस् बांधले होते. त्यांच्या पॅडस्चं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. 


मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस, पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुकी लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुकी लावली की चेंडू थुकीने भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.



एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता. त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट!" अंपायर गोंधळला "आऊट कसा" ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. 


थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खूप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!'' अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.


गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. 


एका संघाची पाळी संपली. मग चौकशी सुरू झाली “स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. 


स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, "मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो.''अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो.


" लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. 



पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.


क्रिकेटची फारशी माहिती नसलेला एक नवखा गोलंदाज, पहिल्यानेच गोलंदाजी करायला आला. अंपायरने त्याला विचारलं, Are you bowling over the wicket or round the wicket ?' त्या नवख्या गोलंदाजाने उत्तर दिले. No, No! I am bowling at the wicket.


असाच एक नवखा खेळाडू खेळायला आला. जलदगती गोलंदाजाचा चेंडू त्याच्या पायावर एवढ्या जोरात लागला की तो विव्हळून खाली बसला. जरा पाय चेपलान, झटकलान् आणि पुन्हा खेळायला उभा राहिला. पंचांनी त्याला विचारलं; Can you walk ?' खेळाडू उद्गारला - Oh yes ! Just see, I can walk' म्हणून त्याने चालून दाखवले. तेव्हा पंच त्याला म्हणाला, you can walk , no ? Then walk to the pavilion, you are out !'



5 निबंध मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi

aai sampavar geli tar essay in marathi | आई संपावर गेली तर निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण aai sampavar geli tar marathi nibandh  बघणार आहोत. मानवाला कोणत्याही गोष्टीचे महत्व तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपल्या  जवळ असणारी एखादी गोष्टं आपल्यापासुन दुर निघुन जात नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास आईचे देता येईल, आपली आई संपुर्ण कुटुंबासाठी दिवस रात्र राबत असते. सर्वांची काळजी करत असते. पण हीच आई जर संपावर गेली तर काय होईल. हेच या निबंधात वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

'आई, माझं गणिताचे पुस्तक कोठे आहे?' 'आई, हा निबंध कसा लिहू ग? काही मुद्दे सांग ना.' 'आई, या रविवारी जिमखान्याची सहल आहे. काय देशील डबा?' 'आई, यंदा दिवाळीत फराळाचे पदार्थ भरपूर करायचे हं!' 'आई, मला बॅडमिंटनची रॅकेट हवी आहे. कधी घेशील सांग?' अशी आपली हर एक कामे आईशी निगडित असतात. पण समजा, आई संपावर गेली, तर ...

aai sampavar geli tar essay in marathi
aai sampavar geli tar essay in marathi



आई संपावर गेल्यास घराचे घरपणच हरवेल. सकाळी उठायला हमखास उशीर होईल; कारण नेहमीप्रमाणे लवकर जागे करण्यास आई नसेल. न्याहारीला टेबलावर केवळ कोरडा पाव असेल. लोणी स्वतः लावून घ्यायचे म्हणजे केवढे कठीण! जवळजवळ उपासमारच!  (हे पण वाचा माझी आई मराठी निबंध)


शाळेत जातानाही किती तरी गडबड झालेली असेल. कंपासपेटीच विसरल्यामुळे लिहायला पेन्सिल, पेन काहीच नसणार ! मग त्यासाठी शिक्षकांची बोलणी खावी लागणार. मधल्या सुट्टीसाठी डबाही नसणार, कारण न विसरता सुट्टीसाठी डबा देणारी आई संपावर गेलेली असणार.


शाळेतून दमून भागून घरी यावे, तर स्वयंपाकघरातील सारा पसारा आवरणार कोण? टेबलावर ब्रेड, लोणचे, चटणी ठेवलेली असणार आणि बरोबर एक चिठ्ठीही असणार. 'आई संपावर आहे.' या नुसत्या कल्पनेनेच माझे डोळे पाझरू लागले. आईच्या अपार वात्सल्याची ती जणू पावतीच होती!

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद .

निबंध 2

खरंच 'आई' म्हणजे आत्मा आणि ईश्वर आईची महती वर्णनासाठी घेतली तर शब्द अपुरे ठरतात. अशी सर्वांची लाडकी आई संपावर गेली तर?.... प्रत्यक्ष देवालाही आईच्या कुशीचा , तिच्या स्नेह - वात्सल्याचा मोह आवरता आला नाही, तिथे आम्हां माणसाचे  काय? आई संपावर गेली तर सकाळी लवकर अभ्यासाला कोण उठविणार? अन् तेही न रागावता..... केसात हलकीशी बोटे फिरवून ‘पिंटू , ऊठ' असं कोण म्हणणार? दूध, न्याहारी कोण देणार? सारे प्रश्नच प्रश्न ..... या सर्वांचे उत्तर तर 'आईच'! पण तिने संप पुकारला तर ..... बापरे कल्पनेनेच मला घाबरून सोडले.


आई दिवसरात्र आपल्यासाठी, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी किती कष्ट करत असते याची जाणीव झाली. तिच्याविना घर चालणार तरी कसे? बाबांना ऑफिसात वेळेवर जाता येईल का? स्वयंपाक कोण करणार? बाहेरचं जेवण रोज आवडेल का? घरात बहीण-भावंडाची भांडणे कितीतरी वाढतील आई असली की घर कसं प्रसन्न अन् शांत असतं. ती नसेल तर शिस्तच राहणार नाही. घरात अव्यवस्थितपणा वाढेल . घरात बहिण भावंडाची भांडणे किती तरी वाढतील.


संस्काराची शिदोरी कोण पुरवेल मग? आईच्या प्रत्येक कृतीतून , प्रत्येक शब्दातून , प्रत्येक नजरेतून प्रेमाचा निरंतर झरा खळखळत असतो. त्यामुळेच तर कुटूंबसंस्था टिकून राहते. तीच संपावर गेली तर सारचं बिघडेल. कुणाचाही कुणाशी मेळ बसणार नाही.

आईच्या सहनशक्तीला तर तोड नाही. तिचं शांत गंभीर अंस्तितव, मौन राहून ही अनेक प्रश्नांचं उत्तर देऊन जातं. तिच्यामुळे घरातला कलह टळतो. महत्त्वाचे निर्णय घेताना तिच्या अमोल विचारांचा हातभार लागतो. घरातल्या सर्वांना काय - काय लागते? सर्वांचे वेगवेगळे स्वभाव कसे आहेत? सर्वांच्या वेळा कशा सांभाळायच्या? सर्वांना वेळेवर सर्व कसे उपलब्ध करून द्यावे? सर्वांच्या अडचणी कशा सोडवाव्यात हे सारं 'आई' च करू शकते. तिला पर्याय होऊच शकत नाही . 

आदर्श माता एकटी पूर्ण मंत्रिमंडळ' सांभाळते. ते सारे एकटी घरात सांभाळत असते. कारण ज्या वेळी आई मुलाला सकाळी उठवून स्नान इत्यादी कामे करावयास लावते तेंव्हा ती आरोग्यमंत्री असते. दप्तर व्यवस्थित देऊन शाळेत पाठवते तेंव्हा ती शिक्षणमंत्री असते. घरी जेवण, न्याहरी देताना ती अन्नपुरवठामंत्री असते. घरकाम , इतर कामे , अभ्यास करावयास लावते तेंव्हा ती गृहमंत्री व औद्यागिकमंत्री असते. खेळ व व्यायाम यासाठी प्रवृत्त करते तेंव्हा ती क्रीडामंत्री असते. रात्री मच्छर . भीती यापासून जपते तेंव्हा ती संरक्षणमंत्री असते .,

आई संपावर गेली तर कुटुंबातील सर्वांचे आरोग्य धोक्यात सापडेल. पावसात भिजल्यास खराखरा डोके पुसून , तव्यावरच्या गरम कपड्याने कोण डोक्याला शेक देईल? हळूवार मायेच्या स्पर्शानेच अर्धे दुखणे नीट होते. मग तिच्यासारखी आमची काळजी कोण घेईल? कुटूंबातल्या सर्वांचा विकास ठप्प होईल. पर्यायाने समाजाचे व देशाचेही नुकसान होईल कारण, आईसारखा दुसरा कोणी गुरू नाही.


साने गुरुजी म्हणतात"खरी शिक्षणदात्री आईच होय, ती देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व
ज्ञान देणारी तीच" प्रत्येकाची काळजी घेणारी अशी आई. थोडा उशीर झाला तरी बाळाच्या वाटेकडे डोळे लावून दारात उभी राहणारी आई.... या माऊलीपुढे हे विश्व , स्वर्ग सारं काही फिक! आईची प्रेममय, त्यागमय मूर्ती ही जीवनाची स्फूर्ती आहे, जीवनाची खरीखुरी प्रेरणा आहे. तिच्याविना एकही क्षण मला करमत नाही. तिला माझी खूप खूप काळजी आहे. मी तिच्या हृदयाचा तुकडा आहे. '


विचारांची शृंखला या शेवटच्या वाक्यावर येऊन थांबली.... अरे, खरंच की! आई मुळी संपावर जाणारच नाही. इतकी कठोर ती माऊली होऊच शकत नाही. फुलासारखं कोमल तिचं हृदय असं वज्रासारखं कठीण होणारच नाही.....
'ए पिंटू  , आज रविवार . सुट्टीचा दिवस जेवायलाही सुट्टी आहे होय? चल लवकर!''..... आईच्या हाकेनं मी भानावर आलो.
एक भयानक स्वप्न बघून डोळे उघडल्यानंतर 'ते स्वप्न होते' हे कळले अन् तेंव्हा जसं मन सुटकेचा श्वास घेतं तशी अवस्था माझी झाली होती.... तरीही मी उद्गारलो


“आई, तू कधीही संपावर जाऊ नकोस....
तुझ्या तळहाताचा पाळणा तुझ्या नजरेची पखरण,
तुझ्या स्नेहाची बरसात तुझ्या संस्काराची काय बात?
अस्तित्व माझे तुझ्यात दुसरे काही नको या जगात...."



(हे पण वाचा माझी आई मराठी निबंध)

हा निबंध मराठी भाषेत (language) आहे.  शब्‍दमर्यादा 250

aai sampavar geli tar essay in marathi | आई संपावर गेली तर निबंध



mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध



निबंंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

मी पाहिलेला अपघात रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना 'कर्रऽऽ' असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

mi-pahilela-apghat-essay-in-marathi
mi-pahilela-apghat-essay-in-marathi


मी चमकून समोर पाहिले तो एक दुमजली बस थडथडत उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला.



लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक ओक्साबोक्शी रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  व अपघात कमी करण्‍यासाठी काय उपाय केले पाहीजे याविषयी  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंंध 2

मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंध बघणार आहोत. वाहतुकीसाठी भारतात रस्ते फार लोकप्रिय आहेत. कारण अगदी लहान खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत सगळीकडे रस्ते आहेत. रस्त्यामुळे संपूर्ण देश जोडला गेला आहे. 


रस्त्याने जाणे येणे जसे सोयिस्कर आहे तसेच स्वस्तही. परंतु भारतात रस्त्यांची स्थिती फार वाईट आहे. पावसाळ्यात तर ती अधिकच धोकादायक व दयनीय होऊन जाते. रस्त्यांची देखभाल आणि विकास यात भारत फारच मागासलेला आहे. रस्त्यांवरील वाहतूक खूप वाढली आहे. परंतु त्यानुसार रस्त्यांचा विकास झालेला नाही. 


परिणामी आपले रस्ते रक्तरंजित आहेत. रोज शेकडो अपघात रस्त्यांवर होतात. त्यात भरपूर प्राणहानी व वित्तहानी होते. दरवर्षी अंदाजे ६०,००० लोकांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू होतो. त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त लोक जखमी व अपंग होतात. 


अमेरिकेच्या तुलनेत भारतात रस्त्यांवरील अपघातांत मरणारांची संख्या २५ पट जास्त आहे. रस्त्यांवर वाहुतकीचा पडणारा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी अंदाजे ८.१० % रस्त्यांवरील वाहतुकीत वाढ होत आहे. 


१९५१ मध्ये भारतात ३ लाख मोटारी होत्या आता त्या ५४० लाख झाल्या आहेत. फक्त दिल्लीत ३ लाख वाहने असतील. वाहन-चालक वाहतुकीच्या नियमांचा भंग करतात. वाहन चांगल्या प्रकारे चालविता येत नसले तरी वाहन चालक परवाना दिला जातो. याच्याशी संबंधीत सर्व सरकारी कार्यालयांत सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो.


एक अडचण ही पण आहे की येथील रस्त्यांवर अनेक प्रकारची वाहने चालतात. उदा. ट्रक, मोटारी, बस, ट्रॅक्टर, टेम्पो, स्कूटर, सायकली, बैलगाड्या, पादचारी, घोडे, गाढवे इ. यापैकी काही जलद काही मंद तर काही अगदी हळू गतीची आहेत. गावांत शहरांत बसमध्ये गर्दी असणे ही तर सामान्य गोष्ट आहे. 


खेड्यातील लोक बसच्या टपावर बसून प्रवास करतात. दोन चाकी वाहनांवर कधीकधी ४ जणांचे संपूर्ण कुटुंब प्रवास करते. परिणामी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात आणि वाहतूक अधिकारी त्याकडे डोळे झाक करतात. वाहतुकीच्या नियमांचे नागरिकांकडून कडक पालन करवून घेत नाहीत. 


वास्तविक वाहतुकीच्या नियम पालनाचा समावेश शाळेच्या पाठ्यक्रमातच असला पाहिजे. म्हणजे बालपणापासूनच नियमपालनाची सवय लागते. रस्त्यावरून चालावे कसे? वाहने कशी चालवातीत? वाहतुकीचे नियम कोणते इत्यादींची माहिती होते.


रस्त्यांची स्थिती तर खराब आहेच पण त्याहीपेक्षा जास्त वाहनांची स्थिती वाईट आहे. ती जुनी व निरुपयोगी आहेत तरी त्यांचा वापर केला जातो. त्यांची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. योग्य निगा राखली जात नाही, ती खूप धूर सोडतात, ज्यामुळे प्रदूषण वाढते, व इतर वाहनाचालकांना रस्ता नीट दिसत नाही. 


एका सर्वेक्षणानुसार ५०% वाहने भारतीय रस्त्यांवर चालण्यास निरुपयोगी आहेत. अमर्याद बोजा लादल्यामुळे, प्रवाशांना चढविण्यामुळे रस्ते व वाहने लवकर खराब होतात. रेल्वेमार्गावर पुष्कळ ठिकाणी चौक असतात पण तिथे फाटकाची सोय नसते वा देखरेख करणारा रेल्वे कर्मचारी नसतो त्यामुळे असंख्य अपघात होतात.


या सर्व कारणांमुळे भारतातील रस्त्यांवरून प्रवास करणे खूपच धोकादायक झाले आहे. बस व ट्रक चालकांना सामान्यपणे दारूची, अमली पदार्थांची सवय असते. त्याचे सेवन करूनच ते वाहने चालवितात. शिवाय ते कमी शिकलेले व मागास जातीचे असतात. 


सतत १०/१२ तास वाहन चालवून थकून जातात. थकल्यावर नशा करणे त्यांची सवय होते. कच्च्या, खराब रस्त्यांवर त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि मग अपघात होतो. दुर्घटनेनंतर ते पळून जातात. कारण त्यांच्यात मानवता, दया, करुणा, सहकार्याची भावना नसते. शिवाय वाहनात प्रथमोपचाराची पेटी नसते. 


रस्त्याच्या जवळ दवाखाना, अॅम्ब्युलन्स, क्रेन आदींची सोय नसते. पोलिसांचा व्यवहारही असमाधानकारकच असतो. रस्त्यावरच कुठेही, कशीही वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक जागेवर दुकाने, वर्कशॉप, घरे, खानावळी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघात होतात. 


सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असतात. मेनहोलमधून घाण बाहेर येते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीत अडथळे येतात. रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा म्हणून अल्पकालीन व दीर्घकालीन योजना बनवून त्या अमलात आणाव्यात. रस्त्यांची सुरक्षितता हा विषय शालेय अभ्यासक्रमात असावा. 


रस्त्यांमध्ये वाढ करावी, नवे रस्ते बांधावेत, जुने दुरुस्त करावेत, त्यांची वरचेवर देखभाल करावी. वाहन चालकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे. वेळोवेळी वाहन चालकांच्या परीक्षा घ्याव्यान. मंदगती वाहनांसाठी वेगळे रस्ते असावेत. वाहनांची गती, निगा, उपयुक्तता यांची तपासणी व्हावी. 


रस्ते व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. परंतु त्यासाठी संबंधित अधिकारी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असले पाहिजेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.


निबंंध 3

mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध

मी ज्या बसस्टॉपवर उभा होतो, तो रस्ता खप गर्दीचा होता. संध्याकाळची वेळ होती. आजूबाजूच्या शाळा सुटल्या होत्या. मी देखील घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फूटपाथवर बरेच विक्रेते आपला माल घेऊन बसले होते.


अचानक कर्कश आवाज आला व एक मारुती गाडी थांबली. त्या गाडीसमार एक विदयार्थी पडला होता. त्याचे दप्तर बाजूला पडले होते. त्याच्या डोक्याला खोक पडली होती आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. क्षणात लोकांची गर्दी जमली होती; पण मदत करायला कोणी पुढे येत नव्हते.


सिग्नल पडला म्हणून हा विद्यार्थी रस्ता ओलांडायला पुढे आला आणि सिग्नल पडण्यापूर्वी आपण रस्ता ओलांडू, या विचाराने मारुती गाडीवाला पुढे आला अन् अपघात घडला. गाडीवाला त्या मुलाला डॉक्टरकडे न्यायला तयार होता. पण गर्दीतून कोणीही पुढे यायला तयार नव्हते. 


अशा वेळी मी त्याला म्हणालो, "चला, मी येतो तुमच्याबरोबर." अपघात झालेल्या त्या मुलाचे नाव होते सुदीप खरे. आम्ही सुदीपला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर औषधोपचार केले व त्याला कॉफी प्यायला दिली. आम्ही दोघांनी सुदीपला त्याच्या घरी पोहोचवले. 


त्या गाडीवाल्याने आपले कार्ड सुदीपच्या आईवडिलांना दिले व 'काही गरज वाटल्यास फोन करा' असे सांगन त्याने त्यांचा निरोप घेतला आणि मलाही माझ्या घरी सोडले. तेव्हा माझे आभार मानायला तो विसरला नाही.


अपघाताबद्दल माझ्या आईला सांगताना माझ्या मनात आले की, हा अपघात टाळता आला नसता का? याला जबाबदार कोण? मला असे वाटते की रहदारीसाठी सिग्नल असले. तरी लहान मुले आणि वृद्ध यांच्यासाठी, विशेषत: गर्दीच्या वेळी रहदारी नियंत्रक पोलीस हवाच.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : कर्कश आवाज- harsh sound. श भवा४. कठोर आवाज, तीव्र आवाज। रहदारी- traffic. सव२४१२. यातायात, आवागमन।]



mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध

Bhrashtachar Essay in Marathi | भ्रष्टाचार निबंध मराठी 


निबंध 1  
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भ्रष्टाचार निबंध मराठी बघणार आहोत. या निबंधामध्‍ये आज आपल्‍या देशात बोळकावलेला भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराविषयी असणारी समाजमनाची मानसिकता याविषयी वर्णन केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आजच्या एकविसाव्या शतकातही एक भस्मासुर फार मातला आहे. या भस्मासुराचे नाव आहे, भ्रष्टाचार ! हल्ली वर्तमानपत्रांतून तर नित्य नवा 'आर्थिक घोटाळा' जाहीर होत असतो. बँक घोटाळे, मुद्रांक घोटाळे, खोट्या नोटा छापणे... हे असे एक ना अनेक घोटाळे आता चिरपरिचित झालेत.

पुराणकाळातील भस्मासुरापेक्षा या आधुनिक भस्मासुराच्या लीला महाभयंकर आहेत. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो  दिसतो. वाढत्या महागाईमागे याचाच हात आहे. कोणत्याही गोष्टीची कृत्रिम टंचाई हाच निर्माण करतो. नोकऱ्यांची टंचाई असली, तर भ्रष्टाचाराला तेथे मुक्त वाव मिळतो. लाखो रुपयांची लाच देऊन अधिकाराच्या जागा मिळवल्या जातात आणि एकदा अधिकाराची जागा मिळाली की, लाच म्हणून दिलेले पैसे वसूल करण्यासाठी लाच स्वीकारली जाते. असे हे एक दुष्टचक्र सुरू आहे. त्यातून 'काळा पैसा' निर्माण झाला आहे.

Bhrashtachar Essay in Marathi
Bhrashtachar Essay in Marathi


विज्ञानाच्या बळावर व्यक्तिगत जीवनात अनेक सुखसोयी, चैनीच्या गोष्टी सहजपणे उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येकाला त्या हव्याहव्याशा वाटतात. त्याकरिता पैसा मिळवण्यासाठी कष्ट करण्याची कोणाचीच तयारी नसते. सहजगत्या, सुलभतेने मिळणारा पैसा बहुतेकांना हवा असतो. चंगळवादाच्या या हव्यासापोटी भ्रष्टाचाराचा जन्म होतो. पैसा हे एकदा सर्वस्व' मानल्यावर, तो मिळवण्यासाठी वाट्टेल ते केले जाते.

अन्नात व  औषधातदेखील भेसळ केली जाते. औषधातील भेसळीमुळे निरपराध जीवांचे  बळी घेतले जातात. भ्रष्टाचार करणाऱ्यांची विवेकशक्ती नष्ट झालेली असते. बालवर्गापासून शाळा-महाविद्यालयापर्यंत प्रवेशासाठी लाच घेतली जाते. लाच घेऊन परीक्षच्या प्रश्नपत्रिका फोडल्या जातात व लाच घेऊनच परीक्षेचे गुण फिरवले जातात. वैयक्तिक स्वार्थासाठी देशाची संरक्षणविषयक गुपिते परकीय सत्तेला पुरवली जातात.


चोरट्या व्यापाराला उधाण येते. नव्या पिढीला नष्‍ट करणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यापाराला जोर चढतो.
भ्रष्टाचाराच्या या भस्मासुराचा वेळीच बळी घेतला नाही, तर तो भारताचा विध्वंस केल्यावाचून राहणार नाही. आजच्या युवकांनी  समाजातील भ्रष्टाचागची मुळे उपटून काढून स्वच्छ जीवनाचा पाया घातला पाहिजे.

मित्रांनो तुम्‍हाला भ्रष्टाचार निबंध मराठी   हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद 

महत्‍वाचे मुद्दे : 

  • सध्याचा महासुर 
  • सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार 
  • कृत्रिम टंचाई
  • महागाई
  • पैसे दिल्याशिवाय काम होत नाही
  • काळा पैसा 
  • चंगळवाद 
  • त्यासाठी सहज मिळणारा पैसा
  • भ्रष्टाचारी नीतिमत्ता घालवून बसतो 
  • भेसळ
  • भयंकर परिणाम 
  • शाळामहाविदयालयीन प्रवेश पैसा
  •  नोकरीसाठी लाच
  • दुष्टचक्र
  • प्रश्नपत्रिका फोडणे 
  • गुण बदलणे 
  • अमली पदार्थांची आयात 
  • नवीन पिढी बरबाद 
  • सचोटी हरवली आहे...

निबंध 2  

Bhrashtachar Ek Samasya, corruption essay in marathi


काही वर्षांपूर्वी आपल्या देशात भ्रष्ट आचरणाला वाव नव्हता. भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई. पण आज साऱ्याच नैतिक मूल्यांचा हास झाला आहे. आज असे एकही क्षेत्र नाही की, जेथे भ्रष्टाचार होत नाही. उलट आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.

केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर अगदी खेडोपाडीसुद्धा कामांच्या कागदांवर 'वजन' ठेवले नाही तर कामे होत नाहीत. सरकारी कार्यालयातुन  या रोगाची लागण प्रथम झाली. कोणतेही काम तेथील कर्मचाऱ्यांकडून करून घ्यायचे असेल, तर आधी त्यांचे हात 'ओले' करावे लागतात. आजकाल विमा कंपनी, बँका, आयकर कार्यालय या ठिकाणी हा भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, यात आपण काही गैर करत आहोत, असे कुणालाही वाटत नाही.
भ्रष्टाचाराची वाळवी समाजमनाला पोखरू लागली आहे.


आज भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे; कारण भ्रष्टाचाराने आपले हातपाय शिक्षण, वैदयक अशा मानवी जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांपर्यंत पसरवले आहेत. शाळा-महाविदयालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पैसे चारावे लागतात. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून भागत नाही, म्हणून गुणांची अदलाबदल केली जाते. केवळ काही रुपयांसाठी हुशार विदयार्थी आपल्या गुणवत्तेचे श्रेय कोणालाही विकायला तयार होतात.

वैदयकशास्त्र हे केवढे पवित्र क्षेत्र ! दुसऱ्याला जीवनदान देणारा डॉक्टर, वैदय हा एके काळी परमेश्वराचे दुुुुुसरे रूप  वाटत असे. पण आज अनेक ठिकाणी हा परमेश्वर असुरासारखे वागताना आढळतो. कशासाठी? तर काही मूठभर पैशांसाठी! कुणा गरिबाची किडनी त्याला फसवून काढून विकणारा डॉक्टर हा देव कसला? त्याला दानवच म्हटले पाहिजे. शिक्षणक्षेत्रातही भ्रष्टाचाराने आपले पाय दूरवर पसरले आहेत.



 माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा, निष्ठा का हरवतात? मंदिराचा सुवर्णकळस घडवणाराच कळसातील सोने चोरतो, तेव्हा त्या आचरणाला काय म्हणावे? या साऱ्या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे  'माणसाची उपभोगवादी वृत्ती!" 'भ्रष्टाचार' हा गरीब-श्रीमंत सगळेच करताना दिसतात. सुशिक्षित  माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात. येथे स्त्री-पुरुष असा कोणताच भेदभाव नाही. प्रत्येकाला फक्त चैन हवी, सत्ता हवी. त्यासाठी फार मौल्यवान अशी आपली नीतिमूल्ये आपण हरवून बसलो आहोत.


प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या नाटकातील नायक भ्रष्टाचाराच्या विकृतीला 'मनाचा महारोग' म्हणतो. क्रिकेट खेळातील 'मॅच फिक्सिग' प्रकरणाने सारे जग हादरले. क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आणि त्या खेळातील खेळाडू ही त्यांची आवडती दैवते. आपली तहानभूक विसरून, आपली महत्त्वाची कामे बाजूला ठेवून ते त्यांचा खेळ पाहण्यासाठी आटापिटा करतात. असे हे आपले आवडते खेळाडू काही रुपयांसाठी मुद्दाम बाद होतात, हे कळल्यावर लोकांना कमालीचा धक्काच बसला.

भ्रष्टाचाराचा हा भस्मासुर सर्वत्र बोकाळला आहे. खळाळणाऱ्या, उफाळणाऱ्या पाण्यात एखादा भोवरा निर्माण होतो आणि मग पट्टीचा पोहणाराही या भोवऱ्यात गुरफटला जातो; आणि एकदा का भोवऱ्यात गुरफटला गेला की त्याची सुटका नसते. आज असेच आपण सगळे या भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकलो आहोत. त्यातून आपली सुटका होणार तरी कधी?


निबंध 3

Essay on Corruption in Marathi Wikipedia Language

आजकाल 'बुंध्यावर घाव घाला, फांद्या आपोआप पडतील ' या न्यायाने माणूस गुण मिळवण्याऐवजी पैशाच्याच मागे लागलाय. पैसा... मग तो कशाही मार्गाने असो तो मिळवण्याचा तो आटोकाट प्रयत्न करू लागला आहे. यातूनच जन्माला आला-भ्रष्टाचार !

वाढलेल्‍या गरजा हीच या अधोगतीची जननी आहे. वैज्ञानिक प्रगतीन वैयक्तिक सुखांची रेलचेल झाली. माणुस काय सुखाच्‍याच शोधात असतो.  कुठलंही भौतिक सुख सामान्य माणसाला पटकन भावतं, मग ते मिळविण्यासाटी लागणारा पैसा मिळविण्यासाठी प्रथम नकळत, नंतर समजून उमजून तो वाकड्या मार्गाने जातो, मानवी रक्‍ताला चटावलेल्‍या नरमांसभक्षक वाघासारखा पैशावर झडप घालु लागतो. हडप करू लागतो. 
वैयक्तिक स्वरूपाच्या लोभीपणाच एकवेळ   समजु शकतं पण याची लागण आज सगळीकडे झालेली दिसते ही दुदैवाची गोष्ट आहे. आज एकही क्षेत्र असं नाही जिथे भ्रष्टाचार पोचला नाही. भ्रष्टाचार शिष्टाचार होऊ पाहात आहे.

 माणसाची श्रीमंती, उच्चपद, अधिकार, सत्ता हे तो किती भ्रष्ट आहे यावरच अवलंबून आहे असं वाटु  लागतं, हवं ते मिळवण्यासाठी आजकाल माणुस वाटेल ते करू लागलाय, कंडक्टरने सुटे पैसे परत न करणे, वजनामध्ये तराजू मारणे, गॅस सिलेंडरसाठी बक्षिसी देणें, स्वतःचीच जमीन स्वतःच्या नावावर करण्यामठी कचेरीत साहेबांना खुश करणे,


 प्रमोशनसाठी वरिष्ठांना ओली पार्टी देणे, यापासून ते अक्षम्य अशा, राष्ट्राची गुपित परराष्ट्रांना विकणे, राष्ट्रसंरक्षक हत्यारं खरेदीत प्रचंट पैसा खाणे यापर्यत माणसाची मजल गेली आहे. हे सारं का घडतं? माणसाच्या मनावरचा नीतीचा अंकुशच हरवला आहे. 'कष्टाविण नाही फळ' असं पूर्वज म्हणायचे, त्यांना 'या' मार्गाची कल्पना नसावी. अन्यथा 'कष्टावीणही मिळे फळ,' असे म्हटले असते.

सार्वजनिकरीत्या, गोंडस नावाखाली राजरोस भ्रष्टाचार चालतो तेव्हा राष्ट्राच्या भवितव्याची चिंता वाटते. बोगस प्रतिष्टानं काढून राजरोस अलोट पैसा जमवतात तेव्हा कुंपणानं खाल्लेलं शेत पाहुन कीव येते. शाळेच्या प्रवेशासाठी, इमारतीसाठी हजारोंची देणगी उकळली जाते. 

प्रत्येकानं आता भेसळीचं प्रशिक्षण घेतल्यासारखंच वाटतं. उद्घाटनाच्या दिवशीच पूल कोसळताहेत. भेसळीच्या अन्नानं, मद्यानं, औषधानं अनेकांचे प्राण घेतले आहेत. मंत्र्यांचा आशीर्वाद असतो हे तर लाजिरवाण आहे.  पाश्चात्त्य देशांतही 'वॉटरगेट' प्रकरणं होतात तेव्हा अवघ्या मानवजातीलाच ही कीड लागली आहे की काय असे वाटते. मोठेपणाचा मार्ग भ्रष्टाचाराच्या मैदानातूनच जातो की काय असे वाटते. 


याला उपाय ? वरिष्ठांनी स्वतः नीतिमान राहणं, धन्याच्या बागेतील आंबा घेतला तर हात कलम करून घ्यायला निघालेले दादोजी कोंडदेव यांचा आदर्श ठेवणं, स्वत:च्या काकांना राघोबा पेशव्यांना दिलेली शिक्षा योग्य म्हणणारे माधवराव पेशव्यांसारखे स्वच्छ, निःस्पृह राज्यकर्ते असणं, रंगे हाथ पकडलेल्यांना शासन करणं, नवीन पिढीवर सुसंस्कार करणं हेच होत. अन्यथा या नरकातून सुटका नाही.

Bhrashtachar Essay in Marathi | भ्रष्टाचार निबंध मराठी