रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण रेल्वे स्थानकावरील एक तास मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर सामान्यपणे घडणाऱ्या गोष्टीचे वर्णन केले आहे.पण सामान्य असुनही जिवनाच्या विविध पैलुला स्पर्श करण्याचा प्रयत्न यातुन केला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
Railway-Station-Varil-Ek-Taas-Marathi-Nibandh |
" दुपारी चार वाजता पोचत आहे " ताईने मोबाईलवर सांगीतले म्हणून स्टेशनवर गेलो. प्लॅटफॉर्म तिकीट घ्यायला दुसऱ्या वर्गाच्या खिडकीवर ही गर्दी. पहिल्या वर्गावर मात्र २-३ च होते. समाजाच्या वर्गवारीचं सम्यक् दर्शन झालं. तिकीट घेऊन फलाटावर पाय ठेवला तो “ मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन एक्सप्रेस एक घंटा देरीसे आयेगी..." ध्वनिवर्धकानं सांगितलं. झालं ! तासभर थांबणंच आलं. वेळ काढायला उगाच भटकत बसलो.
प्लॅटफॉर्म माणसांनी नुसता फुलला होता. गरीब, मध्यम, श्रीमंत सर्व थरांतील लोक होते. त्यांचे कपडेच बोलत होते. रंगहीन, रंगीबेरंगी, मळकट, जीर्ण, लाजेपुरते तसे झकपक सूटबूट टायही होते. लंकेची पार्वती तशी सालंकृत रमाही ! सप्तरंगी तारुण्य सळसळत होतं तसं वार्धक्याच्या जाळ्यात सापडलेले चेहरेही. लहान निरागस बालकं तसे उगाच केसावरून कंगवा फिरवणारे सख्याहरिही ! माणसांचं म्युझियमच. एवढी माणसं...कशाला प्रवास करत असतील?...मामाच्या गावाला तर कुणी कामाला. नविन सासुरवाशीण तर कुणी माहेरवाशीण, नोकरीच्या शोधात, कुणी औषधपाण्याला कुणी हवापाण्याला. एकाच्या डोळ्यात पाणी दुसऱ्याच्या ओठी गाणी .
गर्दीतून चटपटीतपणे " चाय गरमऽ” “ए, वडा, वडा" म्हणत फिरणारे फेरीवाले. हातात, डोक्यावर, खांद्यावर सामान वाहणारे हमाल, 'रस्ता छोडो' म्हणत नसलेल्या जागेतून वाट काढणारे अन् पळत्या गाडीत चढून जागा धरणारे. पांढरी पैंट, निळा ब्लेझरचा कोट, टायवाले टी. सी. हे सारे सराईत आहेत हे न सांगता कळत होतं.
गाडीला अवकाश होता म्हणून काहीजण उपाहारगृहापाशी चहानाष्टा करत होते तर पेपर स्टॉलवर वाचक रेंगाळत होते. कुणी उगीच भिंतीवरचं रेल्वेटाईमटेबल माना वाकडी करून वाचत होते. कुणी वजन काट्यावर 'वजन' करायचा प्रयत्न करीत होते- ' मशीन बंद आहे-' हे न वाचताच ! प्रतीक्षागृहात उच्चभ्रू लोक टाय सावरत India Today वाचत होते. खरं तर ते नुसते बाहेर आले असते तरी India Today ' दिसला असता.
कुठली तरी गाडी शिटी मारत धडाडत येत होती. एक इंजिन कर्कश्य शिटी मारत शंटिंग करत भाव खात होतं. भिंतींवर सिनेमाची भयानक पोस्टर्स होती. ध्वनिवर्धक तीन भाषांतून गाड्यांची माहिती देत होते. पोर्टर उभ्या गाड्यांची चाकं तपासत होते. घड्याळ बंद होते. गाडीची बेल कधीमधी वाजत होती. मनात विचार आला, अठरा पगड जातींना पोटात सामावणारी आगगाडी, ही राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीकच आहे. खरं तर जीवन हेही या प्लॅटफॉर्मसारखंच आहे. माणसं येतात कुठून, जातात कुठे काहीच माहीत नसतं. योग्य गाडी मिळेपर्यंत थांबतात ती या प्लॅटफॉर्मवर...आणि हा थांबण्याचा थोडा काळ म्हणजेच जीवन !
आपली वेळ झाली, गाडी मिळाली की झटकन् निघून जातो प्रत्येक जण !! “मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन प्लॅटफॉर्म नंबर दो पर आ रही है" म्हणत असताच आरडत ओरडत, दिमाखात स्टेशनमध्ये घुसणाऱ्या गाडीकडे सारे धावले. त्यामध्येच नकळत सामावला जाऊन मी ताईला शोधू लागलो.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला व रेल्वे स्थानकावर तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका
निबंध 2
रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh
रेल्वे स्टेशन ही खूप व्यस्त आणि उत्तेजित करणारी जागा आहे. तिथे नेहमी गाड्या येत जात राहतात. तो एक छोटासा संसार असतो. ज्यात सर्व प्रकारचे स्त्री-पुरुष मुले सतत दिसत असतात. मला अनेकदा रेल्वे प्रवासाची संधी मिळाली आहे. परंतु जेव्हा मी माझ्या काकांना घेण्यास लखनौ स्टेशनवर गेलो तेव्हा मला रेल्वे प्लॅटफॉर्मचा खरा अनुभव आला.
काका दिल्लीहून येत होते. मी गाडी येण्यापूर्वी २०-२५ मिनिटे आधीच गेलो. प्लॅटफॉर्म तिकिट घेतले आणि स्टेशनात गेलो. गाडी अर्धा तास उशिरा येणार होती. मला वाटले एक तास वाट पाहणे फारच कंटाळवाणे होईल. वेळ कसा जाईल मी काय करू?
पण एक तास १० मिनिटासारखा गेला. अजिबात कंटाळा आला नाही. प्रथमच मला असे वाटले की वेळेलाही पंख असतात. तिथे मी जे जे पाहिले, जो अनुभव आला ते सर्व माझ्यासाठी रोमांचक व अविस्मरणीय ठरेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. कधी मी बेंचवर बसत होतो तर कधी प्लॅटफॉर्मवर इकडे तिकडे फिरत होतो. गरम चहा पीत होतो.
प्लॅटफॉर्मवर प्रवासी, हमाल, फेरीवाले रेल्वेचे गार्ड तिकिट कलेक्टर, मेकॅनिक्स, भिकारी इत्यादी ची खूप गर्दी होती. हा एक अद्भुत मेळा होता. सगळेच जण घाईत होते. आपापाल्या कामात व्यस्त होते. पण मी मात्र मजेने या सर्वाचा आनंद लुटत होतो.
प्रेक्षक म्हणून, प्लॅटफॉर्मवर तीळ ठेवायलाही जागा नव्हती. ठिकठिकाणी बॅगा, सुटकेस, बेडिंग, टोपले, पाकिटे, खेळणी, पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. काही लहान मुले आपली खेळणी व फुग्यांशी खेळत होती. एक मुलगा मिठाईसाठी हट्ट करीत होता तर दुसरा छोटा मुलगा कशासाठी तरी आपल्या आईच्या मांडीवर बसून रडत होता.
जेव्हा प्लॅटफॉर्मवर एखादी गाडी यायची तेव्हा लोकांची गर्दी तिच्यावर झडप घालायची. धक्का बुक्की करीत एकमेकांना ढकलीत सगळ्यात आधी घुसण्याचा प्रयत्न लोक करीत होते. हमाल चालत्या गाडीत चढून प्रवाशांना चढविण्यात गढले होते. बायका, म्हातारी माणसे आणि मुले यांना गाडीत चढणे मुश्किल झाले होते.
कुठे रेल्वेचा गार्ड हिरवा झेंडा दाखवून तर गाडीचा ड्रायव्हर शिट्टी वाजवून गाडी सुरू झाल्याचा इशारा प्रवाशांना करीत होता. एखादा टी.सी. तिकिट न घेतलेल्या प्रवाशांना पकडून नेत होता. फारच अजब आणि रोमांचक वातावरण होते.
इंजिन आणि गाड्यांच्या येण्या जाण्याचा जोराने सारखा आवाज येत होता. फेरीवाले ओरडून आपल्या वस्तू विकत होते. कुणी हमाल जास्त हमाली मिळावी म्हणून भांडत होता. कुणी प्रवासी खराब चहा दिल्याबद्दल चहावाल्याशी भांडत होता. कुणी वर्तमानपत्रे, मासिके वाचत बसले होते, कुणी पान चघळत होते. कुणी तिथेच जमिनीवर पथारी पसरून आराम करीत होते. सफाई
कामगार घाण साफ करीत होते. नळावर पाण्यासाठी खूप गर्दी झाली होती. जणू काही दुधाचेच मोफत वाटप होत होते. निरनिराळे रंगीबेरंगी कपडे घातलेले वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक पाहून देशाच्या विशालतेची, विविधतेची, त्यातून प्रतित होणाऱ्या ऐक्याची सहजच ओळख होत होती.
मी प्रवाशांच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो. त्यांचे मनोभाव समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांच्या हावभावांचे निरीक्षण करीत होतो. हे सर्व करण्यात मला आनंद वाटत होता. वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे, त्यावरील हावभाव, अभिव्यक्ती सारे काही खरोखरच आकर्षक, मनोहर व ज्ञान वाढविणारे होते.
गाड्या जात येत होत्या. लोक एकमेकांशी हस्तांदोलन करून निरोप घेत होते. कुणी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करीत होते. कुणी माझ्याप्रमाणेच कुणाची तरी वाट पाहत उभे होते. तिथे एक लग्नाचे व हाड गाडीची वाट पाहत होते
नवरा मुलगा खेड्याचा होता आणि त्याने नवरदेवासाठी असलेला पारंपरिक पोषाख घातला होता. आणि त्यामुळे तो फार आकर्षक वाटत होता. पण पान खाऊन तो इकडे तिकडे धुंकत होता ते पाहून मला खूप किळस आली. इतक्यात एका पोलिसाने एका खिसेकापूला रंगेहात पकडले आणि तो त्याला मारू लागला.
त्यांच्याभोवती गर्दी जमा झाली. चोराची पिटाई होत असलेली पाहून बरेच लोक खुश झाले आणि चोराबद्दल तहेत हेच्या गोष्टी करू लागले. शेवटी त्याला दोरीने बांधून तुरुंगात नेले.
त्याच वेळी मला समजले की माझ्या काकाची गाडी प्लॅटफॉर्मवर येत आहे. मी सावध झालो. गाडी धडधडत येऊन प्लॅटफॉर्मवर थांबली. काका वातानुकूलित कुपेने येत होते म्हणून मला त्यांना शोधावे लागले नाही. मी धावतच त्यांच्याजवळ गेलो व त्यांना नमस्कार केला. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला.
त्यांनी मला जवळ घेतले व आशीर्वाद दिला. सामान जास्त नव्हते. फक्त एक सुटकेस होती. काकांनी ती हमालाजवळ दिली आम्ही लगेच स्टेशनच्या बाहेर आलो. एक टॅक्सी केली आणि अर्ध्या तासात घरी पोहोचलो. त्यादिवशी प्लॅटफॉर्मवर घालविलेला एक तास माझ्यासाठी एक आठवण आणि अनुभव बनला. तो मी कधीही विसरू शकणार नाही. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता .
Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाचन एक उत्तम छंद मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण वाचन एक उत्तम छंदशीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत प्रत्येकाला कोणतातरी छंद असतोच आणि यांच छंदामुळे आपण उत्साहाने भरून जात असतो व त्याच बरोबर त्यामुळे आपण आनंद, मनोरंजन , ज्ञान पण मिळवु शकतो. आज आपण वाचन या छंदाविषयी माहीती या निबंधात बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
मुद्दे :
- उत्तम छंद
- भरपूर वाचन असलेला माणूस संकुचित विचार विसरतो
- वाचनामुळे अन्य देशांची, अन्य लोकांची, इतर धर्मांची माहिती मिळते
- आपल्यातील उणिवा कळतात
- आनंद मिळतो
- इतिहासातील माहिती मिळते
- कुठेही वाचन करता येते
- वृद्ध, लहान मुले यांना तर खूपच मदत.
असा धरी छंद, जाई तुटोनिया भावबंध।
मोठमोठे लोक सांगतात की, असा छंद धरा की, ज्यामुळे संकुचित विचार झटकून टाकाल.वाचन या छंदामुळे बहुश्रुतपणा येतो. वाचनामुळे आपल्याला आपल्या देशाची व जगाची माहिती मिळते. अन्य देशांतील लोक कसे राहतात, त्यांचा पोशाख कोणता आहे, हे आपल्याला समजते. इतर धर्मांतील लोकांची माहिती मिळते. या सर्व माहितीमुळे आपल्याला आपल्या उणिवा कळतात. आपल्याला आपल्या जीवनात सुधारणा करता येते.
आपल्याला कथा-कादंबऱ्या वाचल्यावर आनंद मिळतो. अनेक लोकांचे अनुभव समजतात. काही पुस्तकांमध्ये पूर्वीच्या काळाची माहिती असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी पृथ्वीवर काय काय घडले, याची माहिती मिळते. आतापर्यंत माणसाने किती प्रगती केली हे कळते.
आपण वाचन केव्हाही, कुठेही करू शकतो. रेल्वेच्या डब्यात खूप गर्दी असते, तेथे खूप गोंगाट असतो, तरी काही माणसे शांतपणे वाचत असतात. वृद्ध माणसांना वेळ कसा घालवावा, ही चिंता असते. त्यांना वाचनाची मदत होऊ शकते. लहान मुलांना गोष्टींच्या पुस्तकांतून खूप आनंद मिळतो. खरोखर, सर्वांना उपयोगी पडणारा वाचन हा छंद सर्वोत्कृष्ट छंद आहे.
मित्रांनो तुम्हाला वाचन एक उत्तम छंद हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता छंद कोणता आहे हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
Vachan-Ek-Uttam-Chand-Essay-Marathi |
नुकतेच माझ्या वाचनात आले...डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपल्या एका भाषणात मागासलेल्या बांधवांना कळवळून सांगितले होते - “वाचाल तर वाचाल !" ऐकायला आणि वाचायलाही जरा विचित्र वाक्य वाटते हे, पण ते अर्थपूर्ण आहे हे विचारांती पटते.
'वाचाल' म्हणजे वाचन कराल, 'तर वाचाल' म्हणजेच टिकाल ! 'वाचाल तर वाचाल' याचा अर्थ वाचन कराल तर टिकून राहाल ! चांगले जीवन जगाल इंग्रजीत म्हण आहे - Survival of the Fittest. जे देशकाल परिस्थितीला अनुसरून अगदी योग्य असेल ते टिकते.
इतर प्राणिमात्र आणि माणूस यात मुख्य फरक हाच आहे की माणूस विचार करू शकतो. तो बोलतो, वाचतो, लिहितो. विचार करण्याची ही शक्ती वाचनातून अधिक विकसित होते. डॉ. आंबेडकरांनी हा विचार ज्या समाजासमोर मांडला त्यापैकी ९९% लोक निरक्षर होते. त्यांना लिहिता, वाचता येत नव्हते.
पुस्तके किंवा वर्तमानपत्रे सोडा साधे पत्रदेखील त्यांना दुसऱ्याकडून वाचून घ्यायला लागे आणि उत्तरसुद्धा दुसरा लिहिणार तेव्हा लिहिले जायचे ! वाचता येईना ! हिशेब समजेना ! काय विचारांवी त्यांची दैना ? सरकार व सावकार दोघेही त्यांना फसवत, लुबाडत असत. म्हणूनच त्यानी वाचायला शिकले पाहिजे (लिहायला व हिशेब करायला शिकले पाहिजे) असे डॉ. आंबेडकर म्हणत.
गेल्या चाळीस पन्नास वर्षात ह्या समाजात खूपच सुधारणा झाली आहे. बरेच लोक केवळ साक्षर नव्हे तर सुशिक्षित झाले आहेत. आपल्या व्यथा वेदना ते बोलून दाखविताहेत. दया पवार यांचे 'बलुतं', लक्ष्मण माने यांचे 'उपरा', शरणकुमार लिंबाळे यांचे 'अक्करमाशी' अशा कित्येक आत्मकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. मागासलेल्या समाजातून अशी आशेची प्रकाशकिरणे फाकत आहेत.
पण केवळ एका विशिष्ट समाजापुरताच हा संदेश आहे का ? तसेच वाचाल म्हणजे केवळ वाचायला शिकाल, साक्षर व्हाल तर वाचाल एवढेच का डॉक्टरांना सांगायचे असावे ? 'वाचाल' याचा अर्थ इतका मर्यादित असेल का ? तसे नक्कीच नाही. वाचाल म्हणजे काय वाचाल ? दुसरी चौथीची पुस्तके ? वर्तमानपत्रे ? दरमहा प्रसिद्ध होणारी मासिके ? रस्त्यावर दिसणाऱ्या लहान मोठ्या जाहिराती ?
निरक्षराने साक्षर होणे आणि साक्षराने सुशिक्षित बनणे, हे जसे क्रमप्राप्त ठरते, तसे वाचता येऊ लागल्यावर वर वाचनात सहजता, सफाई येणे आवश्यक आहे. मोठ्या आवाजात आवश्यक तेथे योग्य तो चढउतार करून वाचता येणे, आवाज न करता मनात वाचता येणे हे जमले पाहिजे.
त्याचप्रमाणे पुढे पुढे वाचनात निवड हवी. रोज कोणते तरी एक पुस्तक वाचून ज्ञान वाढत नाही व मन समृद्ध होत नाही. मनोरंजनासाठी कथाकादंबऱ्यासारखे हलके फुलके साहित्य वाचणे आवश्यक तसे विचार प्रवर्तक निबंध, माहितीपूर्ण लेखन, उत्तमोत्तम प्रवास वर्णन, थोरा मोठ्यांची चरित्रे किंवा आत्मचरित्रे यांचेही वेचक वाचन हवे.
नुसते भराभर व भाराभर वाचन करणारा माणूस म्हणजे टनावारी ओझी वाहणारा हमालच ! त्याच्या डोक्यावरून तो जे नेतो त्यातले त्याच्या डोक्यात काय उतरते? म्हणूनच वाचनाला शिस्त हवी, वळण हवे, वाचलेले नीट पचले पाहिजे, आकलन झाले पाहिजे. त्यातूनच बौद्धिक समंजसपणा येतो. It is not what you eat but what you digest, that makes you strong; it is not what you read but what you understand, that makes you learned.
त्याचप्रमाणे वाचन चौफेर हवे. आपल्या आवडत्या एकाच विषयाचे वाचन नको. विविध विषय विविध प्रकार वाचनात असावेत. जाता जाता अखेरची एक शंका मांडावीशी वाटते. सध्याचे जग इलेक्ट्रॉनिक्सचे व संगणकाचे आहे. टी. व्ही., व्हिडिओ, टेपरेकॉर्डर, कॅसेटस् यांच्या जमान्यात वाचनाचे महत्त्व पुढे राहील का ? काळच याचे खरे उत्तर देईल ! पण चित्रपट आले म्हणून नाटके संपली नाहीत.
टी. व्ही, व्हिडिओ आले म्हणून चित्रपटगृहे ओस पडली नाहीत. तसेच वाचनाचे ! वाचन कशासाठी ? ज्ञानासाठी ! ते एवढ्या पुरतेच नसते तर एका वेगळ्या प्रकारच्या आत्मिक समाधानासाठी असते. वाचनाचे वेड लागलेला माणूस पहा. वाचन त्याचे काम नसते. वाचन हा त्याचा स्वभाव बनतो. अनेक उत्तमोत्तम ग्रंथांशी त्याची जवळची दोस्ती बनते. त्याच्या सुखदुःखाच्या क्षणी हे ग्रंथच त्याला सोबत करतात. दिलासा देतात. प्रोत्साहन देतात. प्रेरणा मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद
pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध
pradushan-ek-samasya-in-marathi-essay |
प्रदूषणाची समस्या मराठी निबंध
प्रदूषणाची समस्या मराठी निबंध
लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो.
औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.
निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे.
my sister essay in marathi | माझी ताई मराठी निबंध
my-sister-essay-in-marathi |
karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध
karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi |
कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ ला जन्मलेले हे बालक बालपणापासून हट्टी स्वभावाचे होते. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे वडिलांसोबत भाऊरावांच्या पायालाही भिंगरी लागलेली. परंतु भाऊरावांचे मामा हे पैलवान, त्याचा मित्र सत्याप्पा हा तर शूर साहसी अन् त्याबरोबर दयाळू अन् गरिबांचा वाली. तो श्रीमंताकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे. त्याच्या चातुर्याच्या, हिमतीच्या चांगुलपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होत होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच सत्याप्याकडून मिळाले होते.
Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध
निबंध 1
मुद्दे :
- पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
- लहान मुलांसाठी लेखन
- विनोदी लेखन
- व्यक्तिचित्रे
- अनेक नाटके
- प्रवासवर्णने
- अनेकांच्या पुस्तकांना प्रस्तावना
- माणुसकी गौरवणारा,
- माणुसकीचा गहिवर असलेला एक अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा माणूस व अष्टपैलू लेखक
maza-avadta-lekhak-nibandh |
माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
माझे आवडते लेखक आहेत पु. ल. देशपांंडे कारण पु.ल. आनंदात जगले, विविध कलांच्या क्षेत्रांत ते लीलया वावरले. विशेष म्हणजे पु.लं.ना जो जो आनंद गवसला, जेथे जेथे आनंद मिळाला, तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला. आपल्या एका मुलाखतीत पु.ल. म्हणाले होते, 'मला जेव्हा जेव्हा काही चांगले दिसते, आवडते तेव्हा तेव्हा ते दुसऱ्याला सांगण्यासाठी मी उत्सुक असतो, आतुर असतो.' म्हणून पु.ल. हे केवळ शब्दार्थी आनंदयात्री नव्हते, तर ते खरोखरीचा आनंद उधळणारे 'आनंददात्री' होते.पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले, असा प्रश्न विचारण्याऐवजी पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले नाही? असेच विचारावे लागेल. अशा या अष्टपैलू कलावंताचा जन्म १९१९ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे एम्.ए.,एल्.एल्.बी. पर्यंत झाले. त्यांनी संस्कृत व बंगाली या भाषांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यांनी लिपिक, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध स्तरांवर नोकऱ्या केल्या. आकाशवाणीवर नाट्यविभागप्रमुख म्हणून काम केले. दिल्ली दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे ते पहिले निर्माते होते.
पु.लं.जवळ असामान्य निरीक्षणशक्ती होती. त्यांच्या लहानपणी घरी आलेल्या पाहुण्याचे अचूक निरीक्षण करून आपला हा बाळ काही जगावेगळे बोलणार नाही ना, अशी भीती त्यांच्या आईला वाटे. पण याच निरीक्षणशक्तीतून पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली' साकार झाल्या. 'गणगोता 'तील आप्तजन चिरंजीव झाले. पु.लं.च्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की, अनेकदा वाचून, पाहून वाचकांनाही ती सारी माणसे आपलीच, जवळचीच वाटू लागली. 'बटाट्याची चाळ' या पु.लं.च्या पुस्तकातील प्रत्येक माणूस आपल्यापरीने वेगळा आहे.
पु.लं.नी भरपूर प्रवास केला आणि 'अपूर्वाई' , 'पूर्वरंग' आणि 'वंगदेश' अशा पुस्तकांतून तो वाचकांपुढे मांडला. युरोपातील 'कापी' बेटावरील निळाईच्या सौंदर्याने पु.लं.चे अंत:करण भरून आले आणि त्यांना आठवला ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला 'कोटिचंद्रप्रकाश'.
पु.लं.चे चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग सारेच लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांतल्या संवादांनी, गाण्यांनी, अभिनयाने आणि दिग्दर्शनाने रसिकांना अमाप आनंद दिला. पु.लं.चा विनोद हा अभिजात होता. कुणालाही न दुखावणारा, कुणाच्याही व्यंगावर बोट न ठेवणारा. शब्दाशब्दांवर ते लीलया कोट्या करत. त्यांचे 'कोट्यधीश' हे पुस्तक वाचकाला कोणत्याही परिस्थितीत खुलवते.
पु.ल. स्वतः मूलतः कविमनाचे होते, संगीतकार होते. त्यांचे 'नाच रे मोरा' हे गाणे ऐकल्यावर प्रत्येक मराठी बालकाचे बालपण सुखावून जाते. पु.ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई हे दोघेही काव्यवेडे. स्वानंदासाठी ते नेहमीच कविता वाचत, म्हणत. त्यांना शेकडोंनी कविता पाठ होत्या. पण त्यांच्या मनात आले, हा आनंद आपण इतरांपर्यंत पोहोचवला तर... आणि मग भाईंनी आणि सुनीताताईंनी कविवर्य बोरकर, मढेकर आणि आरती प्रभूच्या कवितांच्या वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. स्वत:ला मिळालेला आनंद हजारो श्रोत्यांवर उधळून दिला.
पु.लं.च्या बाबतीत म्हणावे लागते की, 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी'.कोठे कोणी चांगले काम करत आहे, पैशासाठी काम अडले आहे असे कळले की, पु.लं.चा मदतीचा हात तेथे पोहोचत असे. कुणा एका आडवळणाच्या गावी एक प्राचार्य आपल्या महाविदयालयासाठी धडपडत आहे, हे कळल्यावर पु.ल. फाऊंडेशन तेथे मदतीला गेले.
माझा आवडता साहित्यिक मराठी निबंध
majha avadta lekhak in marathi essay
maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध
maze-ajoba-marathi-nibandh |
पण शेवटी आजोबांनीच आम्हांला धक्का दिला. जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांसाठी उत्कृष्ट आंबा आइस्क्रीम मागवले होते आणि समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांनी एकेक भेटवस्तु दिली आणि ती भेटवस्तू देताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिचे छंद, तिच्या आवडी लक्षात घेतल्या होत्या. त्यामुळे खूपच मजा आली.
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- व्यक्तिमत्त्व वर्णन
- वय, पोशाख, काही सवयी
- स्वभाव- एखादा प्रसंग
- घरात असून अलिप्त
- परंतु घरातील एक
- वय मोठे; पण मन तरुण
- कर्तबगारी
- कर्तव्यदक्ष
- शिकवण
- My (majhe) Grandfather Essay in Marathi language
maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध
Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध
माझा आवडता ऋतु पावसाळा मराठी | maza avadata rutu pavsala essay in marathi
चातकाप्रमाणे आतुर झालेला मानव त्याला न्याहाळू लागतो. एकाएकी एकमेकांवर ढग आपटू लागतात, त्या तालावर मोर नाचू लागतात, बेधुंदपणे वारा वाहू लागतो. आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर पडू लागतात. धरित्री तर केव्हाची तहानलेली असते. भराभरा ते पाणी अधाश्याप्रमाणे पिऊन टाकते. तिची तहान भागते, ती वसुंंधरा आनंदाने पुलकित होऊन...
सगळीकडे आपल्या जवळचा सुगंध पसरवून टाकते. मग तर मोर बेहोष होऊन नाचू लागतात. गुरे, ढोरे शेपट्या उंचावून धावत सुटतात. बेडकांच्या तर 'डराँव डराँव'ने सारा आसमंत भरून जातो आणि 'वर्षा ऋतू'चे आगमन मोठ्या उत्साहात या पृथ्वीतलावर होते.
खरोखरीच या चराचरसृष्टीला मिळालेली अनमोल भेट म्हणजे हा 'वर्षा ऋतू' होय. 'नवचैतन्य' घेऊन येतो हा वर्षा ऋतू. कालपर्यंत उजाड-खडकाळ माळरान तापलेला, तो दोन-तीन दिवसात हिरवागार होऊन जातो. या हिरव्या रंगांच्या छटा तरी किती हो ! हिरवा कंच... काळपट हिरवा... पोपटी हिरवा... हिरवागार हिरवा... अशा विविध रंगात रोपटी वाढतात.
शेते बहरतात. झाडे फळे-फुले-पाने यांनी बहरून जातात. मानवाला आपले सारे वैभव देण्यास आनंदाने डुलू लागतात, नम्र होतात. मक्याची-ज्वारीची-गव्हाची ताटे, लोंब्या वाऱ्यावर डोलु लागतात. कळ्या उमलू लागतात, फुले हसू लागतात अन् हिरव्यागार शालूवर पाण्याचे मोती चमकू लागतात.
ग्रीष्मात आटून गेलेल्या नद्या-नाले-ओढे आता दुथडी भरून वाहू लागतात. त्यामधील दगड-धोंडे-गोटे-खडक एकदम स्वच्छ धुऊन जाऊन चमकायला लागतात. नद्यांची पात्रे अथांगपणे भरधाव वाहु लागतात. असा हा जीवनदायी 'पावसाळा'. मानवी जीवनाला समृद्ध करून टाकतो.
Maza-avadata-rutu-essay-marathi-languageAdd caption |
कोठेही नजर टाका, हिरवा मांगल्याचा, सूचक समृद्धीचा प्रतिक, डोळे अन् आत्मामन तृप्त करणारा हा वर्षा ऋतू म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटतो. ना ग्रीष्माचा दाह ना शिशिरातील थंडीचा कडाका.. सगळा कसा सात्त्विक... सौम्य स्वभावाचा आल्हाददायी हा ऋतू. आषाढातील वर्षाचे आगमन...
याच आषाढात... संपूर्ण वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी वारकऱ्यांची लाट येते... 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात वारकरी चिंब भिजून जातात. पण उत्साहात नाचत राहतात.
शेतकरी या पावसाच्या धारामध्ये आपल्या घामाच्या...कष्टाच्या धाराही मिसळतो अन् मग काय ? आनंदच आनंद. धरित्री भरभरून पीक देते. शेतकरीच नव्हे तर सर्व प्राणिमात्र आनंदीत होतात.
तसा पाहिला तर 'वर्षा ऋतू', 'वसंत ऋतू'च्या पुढे उपेक्षिला जातो. परंतु त्या 'वसंत ऋतूच्या क्षणिक सुखापुढे या 'वर्षा'चा उदात्तपणा. उदारपणा केवढा महान असतो. खरोखरीच वर्षा ऋतू सृष्टीचे 'सौभाग्य' आहे. ती मानवी जीवनाची 'गंगोत्री' आहे. मानवाला मिळालेले 'महान वरदान' आहे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .
Maza avadata rutu marathi nibandh
छत्र्या दुरुस्तीला निघतात, गच्चीवर गळती थांबवण्याचे लेप दिले जातात, बाजारात छत्र्या रेनकोटची रेलचेल होते, विक्सच्या जाहिराती वाढतात, शेतकरी शेतं नांगरून आभाळाकडे नजर लावून बसतात...! पावसाची नऊ नक्षत्रं कोरडी गेली तर ग्रीष्माची अनिर्बंध सत्ताच ! एरवी ग्रीष्माने भाजून काढलेल्या जमीन, झाडवेली, पशुपक्षी यांना दिलासा देते ती वर्षाराणीच...
मृगाच्या रथात बसून बिजलीचा चाबूक घेऊन, नभांच्या मेघगर्जनेच्या तुताऱ्या फुकत तिचं दिमाखदार आगमन होतं. साऱ्या आसमंतात मृद्गंधाचं अत्तर उधळलं जाऊन सारं वातावरण कसं सुगंधी होतं. मरगळलेले वृक्ष वेली अंग झटकुन चैतन्यानं फुलू लागतात, आनंदान डोलू लागतात.
कोरड पडलेल्या नद्या, ओढे, तळी, धरणे पाणी पिऊन आनंदीत होतात. अगोदरच तयार करून ठेवलेल्या घरट्यात पक्षी विसावतात. दाणागोटाही अगोदरच साठवलेला असतो म्हणून हळूच डोकावून वर्षाराणीचं वैभव निःशब्दपणे कौतुकाने बघतात.
मुंग्याही वारुळाचा आश्रय घेतात. हिरवा शालू नेसून काळ्या मेघांचं काजळकुंकू करून तर जास्तच गोड दिसते. घरांच्या छपरावर होणारी टप टप् कृषिराजाला मधुर स्वर वाटू लागतात.
सारी सृष्टी बेहोष होते. बेभान, धुंद होते. तशीच बेहोषी भाविकांनाही येते. नामसंकीर्तनात दंग होऊन त्यांची "पाऊले चालती पंढरीची वाट ! " चंद्रभागेच्या तीरी जल्लोष होतो. टाळ मृदुंग आकाश दणाणून सोडतात.
मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi
दोनवेळा सामना अनिर्णित राहिला. अर्थात त्यामुळे विश्रांतीचा दिवसही रद्द करून सामना चालू ठेवायचा आणि त्यातून निर्णय घ्यायचा असे ठरले. वादावादी, गाजावाजाही वाढत होताच. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. स्टेडियम माणसांनी कसे फुलून गेले होते. अशा सामन्यातून आंतरराष्ट्रीय संघांची निवड होणार असते. देशभरातून अनेक क्रिकेट शौकिनांनी आज भाऊगर्दी केली होती.
एखादा चौकार असो किंवा षटकार सारा स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमून निघत होता. एखादा झेल सुटला तरी सगळीकडे निराशेचा सुस्कारा ऐकू येत होता. इकडे विरुद्ध संघही बचावाचा खेळ खेळत होता. त्यामुळे खेळात तसा रंग चढत नव्हता. विकेट तर आमच्या गोलंदाजांनाच अनुकूल होती. परंतु नावाजलेल्या गोलंदाजांची गोलंदाजीही आज मूग गिळून बसली होती.
मैदानाच्या दिशेने आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली, कागदांचे बोळे यायला लागले. अखेरीस दिवस संपेपर्यंत विरुद्ध संघ कसाबसा संपूर्ण आटोपला तेव्हा त्याच्या २१० धावा झाल्या होत्या.
पहिल्या आघाडीच्या पाच खेळाडूंनी जणू चंगच बांधला होता. एकही बॉल, बॅटला स्पर्श केल्याशिवाय जातच नव्हता. ९४ धावांची आघाडी पार करून त्यांनी पुढे जोराचा पवित्रा घेतला आणि अखेरचा गडी बाद होईपर्यंत आमच्यावर १९९ धावांची आघाडी मिळविली.
mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi |
आमच्या संघाला वाटले, ही धावसंख्या आपण सहज पार करू. परंतु पहिले तीन खेळाडू जेमतेम ४०-४५ धावा करून तंबूत परतले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. इकडे विरुद्ध पक्षाला 'चिअरअप' जोरात सुरू झाला आणि आमच्यावर दबाव वाढला.
नशिबाने साथ दिली. अन् पुढील दोन खेळाडूंनी दमदार खेळ सुरू करून धावसंख्या १५० पर्यंत नेली. पुन्हा एकापाठोपाठ पाच गडी बाद झाले. आता धावसंख्या पार करण्यासाठी ५० धावांची गरज होती. नववा गडी म्हणून मी तंबूतून बाहेर पडलो. खरा मी गोलंदाज, आता बॅट कशी साथ देते तेच पाहायचे होते. कॅप्टनने मला धीर दिला. माझी पाठ थोपटली. मी मैदानावर आलो. बॅटला बॉल लागला आणि समोरच्या खेळाडूच्या मदतीने धावा सुरू केल्या.
दोघांनी मिळून ४३ धावा केल्या. तेवढ्यात समोरचा गडी बाद झाला. पुन्हा टेन्शन वाढले. पाहिजे होत्या फक्त ७ धावा. आता दहाव्या खेळाडूला धीर देण्याची वेळ माझी होती. तो दबकत दबकत खेळत होता. चोरटी एखाद्-दुसरी धाव काढत होता. एक चेंडू आला अन माझ्याकडून दणदणीत चौकार मारला गेला अन् स्टेडियम दणाणून गेले. कप्तानासह सर्व खेळाडुंनी मैदानाकडे धाव ठोकली. मला व माझ्या जोडीदार खेळाडूला उचलून घेतले.
गौरवाने तंबूत आणले, जणू काही मीच एकटा यशाचा मानकरी होतो. आमच्या संघाने ट्रॉफी जिंकली होती. ट्रॉफी घेतानाही आमचा सर्व संघ उपस्थित होता. ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचत होता. असा हा माझा क्रिकेटचा सामना माझ्या जीवनातील अविस्मरणीय सामना ठरला. (100 हुन अधिक निबंध वाचा तुमच्या मोबाईलवर )
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .
एक रंगलेला क्रिकेटचा सामना
एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते. अखेरीस ‘संघ अ' विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.
महत्वाचे मुद्दे :
- आम्ही मुले नेहमीच खेळतो
- एके दिवशी मोठ्या माणसांचा सामना
- काहीजण चांगले खेळले
- काही गमती
- आनंदाचे वातावरण.
मी पाहिलेला क्रिकेटचा सामना
पण यात विशेष आवडला तो दुसरा कसोटी सामना. कारण, या सामन्यामुळे विश्वचषक सामन्यात लागलेला कलंक पुसला गेला. बांगलादेशच्या याच संघाने आमच्या सर्व वीरांना चारी मुंड्या चित केले होते. त्याच संघावर आमच्या क्रिकेट वीरांनी नेत्रदीपक विजय मिळवला.
असा हा सामना बांग्लादेशातील ढाका येथील शेरेबांगला स्टेडियमवर झाला. प्रथमच नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीलाच आपल्या खेळाडूंना सूर सापडला आणि भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या वेगवान व फिरकी गोलंदाजीचे पार खोबरे करून टाकले. एकापाठोपाठ एक अशा पाच फलंदाजांनी आपली शतके झळकावली.
सचिन व सौरभ यांनी आधीचा लागलेला डाग पुसून टीकाकारांची बोलती बंद केली. सहाशे दहा धावांचा डोंगर रचून भारतीय संघाने आपला डाव सोडला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला, बांग्लादेशला, खेळाची संधी दिली.
भारताच्या झहीर खानच्या तुफानी गोलंदाजीपुढे बांग्लादेशचा अर्धा संघ बाद झाला. उरल्यासुरल्या फलंदाजांना अनिल कुंबळेने तंबूत पाठवले.
चारशे धावांचे ओझे घेऊन फालोऑन स्वीकारून बांगलादेश दुसरा डाव खेळायला मैदानात उतरला. आता पाऊसच त्यांना वाचवू शकणार होता. पण त्या दिवशी तोही त्यांच्यावर फिदा नव्हता. या डावात बांगलादेशच्या खालेद मासूद, अश्रफूल आणि मोर्तझा यांनी अटीतटीची झुंज दिली. पण भारतीय खेळाडू आता पेटून उठले होते. अगदी सचिनने गोलंदाजीतही आपली करामत दाखवली आणि दोन गडी टिपले. भारताने बांग्लादेशचा १ डाव आणि २३९ धावांनी दणदणीत पराभव केला.
या यशाने भारताने जणू दाखवून दिले, 'हम भी कुछ कम नही !' आता आपल्या लाडक्या खेळाडूंवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली, याचा मला विशेष आनंद झाला.
- विश्वचषक सामन्यात आलेले अपयश
- त्यामुळे निंदानालस्ती
- मन दुखावले
- बांग्लादेशात सामने
- फलंदाजीतील पराक्रम
- गोलंदाजीतील विक्रम
- मिळालेले यश
- यशाचा परिणाम.
मी पाहिलेला चुरशीचा सामना
त्यात दक्षिण आफ्रिकेच्या कप्तानाने हॅन्सी क्रॉनिएने बाजी मारली. मैदानाचा रागरंग पाहून त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. कप्तानाने चेंडू शॉन पोलॉक याच्या हातात दिला.
आता साऱ्या प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या खेळाची सुरवात मोठ्या सावधपणे केली. खेळ थोडा धीमा वाटत होता. प्रेक्षक धावांच्या आतषबाजीसाठी आतुर होते; पण फलंदाज फारच जबाबदारीने खेळत होते.
धावफलकावर ७ गडी बाद २०० धावा लागल्या. आता फक्त १४ धावा करायच्या होत्या. बहुतेक हेच दोन्ही खेळाडु सामना जिंकून देतील, असे वाटत असतानाच जॉन्टी बाद झाला. सारे प्रेक्षक हळहळले. जमलेली जोडी फुटली होती. नंतर आलेला शॉन पोलॉक शून्यावर बाद झाला. आता चुटपूट लागली, दक्षिण आफ्रिका सामना गमावणार की काय? पण अखेरच्या षटकात क्लुसनरने तीन चौकार मारले.
आता फक्त दोनच धावा हव्या होत्या; पण शेवटचा फक्त एकच गडी बाकी होता. कशीबशी एक धाव मिळाली. आता एक धाव काढली की विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार होता. सारे प्रेक्षक नि:स्तब्ध होते आणि दुर्दैव म्हणजे, डोनॉल्ड धावचीत झाला. दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच झाली, २१३ ! मॅच 'टाय' झाली होती.
सर्व अधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर झाला. साखळी सामन्यांत पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली असल्यामुळे 'ऑस्ट्रेलिया'चा संघ विजयी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. 'क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स' म्हणतात ते यासाठीच! आजवर मी अनेक सामने पाहिले; पण अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकवून धरणारा असा रंगतदार सामना मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.
- सामना कोठे व कोणत्या खेळाचा
- संघ
- सामन्याचे वर्णन
- सामना आवडल्याची कारणे
- अविस्मरणीय घटना
- सामना पाहून आल्यावर मनात आलेले विचार...