झाडे नसती तर मराठी निबंध बघणार | if trees were not there essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण झाडे नसती तर मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये झाडे नसल्यावर कोणत्या गोष्टी अशक्य होतील याविषयी सविस्तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
if-trees-were-not-there-essay-in-marathi |
स्वत: उन्हात उभे राहून जे दुसऱ्यांना सावली देतात आणि दुसऱ्यांसाठी फळेसुद्धा धारण करतात ते वृक्ष जणू सत्पुरुषच आहेत, असे वृक्षांचे यथार्थ वर्णन सुभाषितकारांनी केलेले आहे. सर्वांना सुखावह सावली देणारी ही झाडे नसती तर... विविध रंगांची व आकारांची पाने नसती. सुगंधी फुले नसती. मग रसाळ फळे कुठली? मग शंकराला बेल, गणपतीला दूर्वा, सत्यनारायणाला तुळस आणि मंगळागौरीला सोळा प्रकारची पत्री कोठून मिळाली असती?
झाडे नसती तर हापूसचा आंबा खायला कसा मिळाला असता? कच्ची कैरी, लालबुंद सफरचंद, डाळिंब, पेरू, अननस अशा फळांची चंगळ नसती. चाफा, मोगरा, गुलाब यांचा मन प्रसन्न करणारा सुवास आणि वेड लावणारे सौंदर्यच नसते. पिंपळाच्या पारावरच्या गप्पा, वडाच्या सूरपारंब्यांचा खेळ, पारिजातकाचा सडा या साऱ्या गोष्टींतील मौजच हरवली असती!
आज अनेक औषधे वनस्पतींपासून उपलब्ध होतात. कडुनिंबाची पाने आरोग्याची हमी देतात. तुळशी, बेहडा, सबजा इत्यादी औषधी वनस्पती मानवाला वरदाणापेक्षा कमी नाहीत आहेत. झाडे नसती तर आयुर्वेद निर्माण झाला नसता. झाडे नसती तर... वाऱ्याचे अस्तित्व कसे जाणवले असते? पाऊस आला नसता... मातीची धूप थांबली नसती. चंदनाचे झाड नसते तर विरहार्ताला शीतलता आणि देवपूजेला गंध नसते. झाडे नसती तर प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली असती. प्राणवायूचा पुरवठा कसा झाला असता?
झाडे नसती तर कवीमंडळींची फार अडचण झाली असती. 'त्या तरुतळी विसरले गीत' अशी सुंदर काव्यपंक्ती निर्माणच झाली नसती. श्रावणात झोपाळे कोठे बांधले असते? सुगरण पक्ष्याने आपला घरोटा कोठे बांधला असता?
झाडे नसती तर... गजराजासारख्या शाकाहारी प्राण्यांनी काय केले असते? प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याची पाने घरात मांगल्य आणतात. भाजी-आमटीच्या फोडणीची लज्जत कढीपत्ता वाढवतो. झाडे नसती तर... माणसाच्या जीवनातील हिरवेपणा, मृदुताच हरवली असती. मग चांदोबा कोठे लपला असता? हिरव्या चाफ्याला सुगंध लपवण्याची गरजच पडली नसती. रजनीगंधा धुंद झाली नसती. वृक्षाविना सारे जीवन रूक्ष झाले असते. मानवाच्या जीवनातील प्रत्येक क्षण झाडांशी इतका निगडित आहे की, त्यामुळेच माणूस आपल्या वंशावळीला 'वंशवृक्ष' असे सार्थ अभिधान देतो. असा हा मानवाचा थोर मित्र नसेल तर मानवी जीवन नष्टप्राय होईल.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
महत्वाचे मुद्दे :
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- झाडांचे महत्त्व व उपयुक्तता
- झाडांचे विविध प्रकार
- प्रदूषण
- फळे, फुले, लाकडे, औषधे
- निसर्गसौंदर्यात काव्य असते
- पाण्याचा पुरवठा
- वनसंपत्ती उत्पादन
- पशु-पक्षी आणि मानवी जीवनाचा आधार
vij nasti tar marathi nibandh | वीज नसती तर मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वीज नसती तर मराठी निबंध बघणार आहोत. कोणत्याही वस्तुचे हे फायदे तोटे असतातच हेच तत्व विजेबाबत लागु पडते दैनदिन जिवनात आवश्यक असणारी विज नसती तर त्याचे काय परीणाम झाले असते हें या निबंधात दिले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
vij-nasti-tar-marathi-nibandh |
परवाच एका झोपडपट्टीला मोठी आग लागली. सुमारे अडीच हजार झोपड्या जळून खाक झाल्या. गोरगरिबांच्या उभ्या संसाराची राख झाली. सुमारे दीडशे माणसे होरपळून मेली. त्यांत तीन-चार महिन्यांच्या बाळापासून ते सत्तर वर्षांच्या वृद्धापर्यंतची माणसे होती. होरपळेलेली, आपल्या वस्तू, आपले जिवलग यांचा जिवाच्या आकांताने शोध घेत सैरावैरा झालेली हजारो माणसे T.V. पडद्यावर पाहताना काळीज पिळवटून निघत होते. T.V. वर बघणेही नकोसा वाटणारा हा हृदयद्रावक प्रसंग निर्माण केला होता विजेने !
होय, विजेनेच ! शॉर्टसर्किट होऊन आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. या विजेनेच क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकले होते ! ही वीज नसती ना, तर हा उत्पात घडलाच नसता ! कधी कधी मनात येते, माणसाने ही वीज निर्माण करून संकटाचा केवढा मोठा डोंगर उभा करून ठेवला आहे ! खरंच, माणसाने ही वीज निर्माण करायलाच नको होती. नसतीच ही वीज, तर किती बरे झाले असते !
खरोखर, ही वीज निर्माणच झाली नसती तर ? तर... रात्री झगमगीत वाटल्या नसत्या ! माणसाला निरांजनाची-समईची ज्योत, मेणबत्तीचा, कंदिलाचा उजेड यांचाच आश्रय घ्यावा लागला असता. आनंदाच्या प्रसंगी केली जाणारी रंगीबेरंगी नेत्रदीपक रोषणाई केवळ स्वप्नात वा कल्पनेतच राहिली असती.
जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजेचे विलक्षण सामर्थ्य मानवासाठी उपयुक्त ठरले आहे. आज घरातील सर्व प्रकारच्या कामांत वीज ही गृहिणीची सखी झाली आहे. दळणे, कापणे, भाजणे, शिजवणे, केर काढणे, कपडे धुणे, स्वच्छता करणे अशा अनेक कामांत तिला विजेची मोलाची मदत मिळते.
आजच्या या यंत्रयुगात बरीचशी यंत्रे फिरतात, ती विजेच्या सामर्थ्यावर. वीज नसती तर इतकी यंत्रे फिरली नसती. औदयोगिक क्षेत्रात आज झालेली मानवाची प्रगती विजेविना शक्य झाली असती का? अगदी वैदयकीय क्षेत्रातही ही वीज मोठी कामगिरी करते. अशक्त बाळाला 'इनक्युबेटर'मध्ये ठेवले जाते, त्यासाठी वीज हवीच असते. शल्यविशारद शस्त्रक्रिया करतात, तेव्हा वीज आवश्यक असते.
आज विजेवर चालणाऱ्या T.V. मुळे तसेच इंटरनेटमुळे आपण घरात बसून जगाचा फेरफटका मारू शकतो. संगणकामुळे जग जवळ आले आहे. ज्ञानविज्ञानाची भांडारे खुली झाली आहेत. वीज नसती तर हे कसे शक्य झाले असते? अंतरिक्षातील ही शक्ती माणसाने आपल्या मुठीत बंद करून घेतली आहे. ती जर त्याने गमावली, तर तो दुबळा व असहाय होईल.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पेट्रोल संपले तर मराठी निबंध बघणार आहोत.पेट्रोल व डिझल सारख्या खनिज तेलावर मयार्देपेक्षा अवलंबुन राहील्यावर त्याचे काय परीणाम होत आहेत व ते संपल्यावर काय परीणाम होतील याबद्दल या निबंधात सविस्तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
petrol-sample-tar-marathi-nibandh |
भौतिक सुखाचा दिवा पेट्रोलवर तेवतो' हे आजच्या युगातील सुभाषितच म्हणावे लागेल. आज आलेली जीवनाची गती हे पेट्रोलने दिलेलं वरदान आहे. आज ऑस्ट्रेलियात सकाळचा चहा घेऊन भारतात जेवण करून दुपारचा चहा इंग्लंडमध्ये घेऊन रात्री जेवून झोपायला अमेरिकेत जाणे हे यामुळेच शक्य आहे. आजचे युग हे प्लॅस्टिकचे युग मानले जाते त या पेट्रोलमुळेच !
निसर्गान आपल्या जादुइ पोतडीतून मानवाला पेट्रोल दिल आणि माणूस हरकुन गेला. त्याची चालच बदलली. तो धावू लागला सुसाट वेगाने ! शाब्दिक आणि लाक्षणिक अर्थानेही ! पण माणूस मुळातच हावरट. 'अजून' अजून' चा जप तो सोडत नाही. हव्यास ही जशी प्रगतीची निशाणी तशी अधोगतीचीही ! कुठे थांबावे ? हेच माणसाला कळत नाही.
खनिज तेल निसर्गाने पृथ्वीच्या पोटात साठवले, ते मानवाने उकरून काढले... वापरले, वापरत आहे...पण किती अमर्याद ? त्यात माणूस हा प्राणी नंबर एकचा अप्पलपोटा, स्वार्थी, लबाड आणि भांडकुदळ. ' तुझे ते माझे आणि माझे तेही माझेच' ही त्याची वृत्ती ! त्यातूनच उद्भवले हे आखाती युद्ध.साऱ्या जगाला, विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांना वेठीला धरणारे. सद्दाम हुसेनने तर उद्दाम होऊन मुद्दाम तेल विहिरी पेटवून दिल्या, समुद्रात तेल सोडून दिले. त्यावर अमेरिका अणुयुद्धाची' बेजबाबदार भाषा बोलते आहे. त्यामुळे साऱ्या तेलविहिरी नष्ट वा निरुपयोगी होतील. मग पुढे ?... तर काय, भौतिक सुखांचा दिवा फडफडू लागेल अन् काही काळाने 'राम' म्हणेल आणि मग माणसाचे डोळे खाडकन् उघडतील.
आपणच मांडून ठेवलेल्या पसाऱ्याचा अडथळा होऊ लागेल. दळणवळण कोलमडेल. स्कूटर्स, मोटारी आपापल्या जागीच थांबून राहतील. जणू पुतळेच. प्रवास खडतर होईल. संथ होईल. घोडागाडी, बैलगाडी, सायकली आणि स्वतःचे पाय वापरावे लागतील. वेगात चाललेल्या वाहनाला ब्रेक लागून गतिरोध व्हावा तसे जीवन होईल. व्यापार धोक्यात येईल. जिथे जे पिकत नाही तिथे ते पोहचविणे अडचणिचे होईल. महागाई आभाळाला टेकेल तर नश्वर पदार्थांचे अवमूल्यन होईल. द्राक्ष, आंबे यांना विदेश दिसणार नाही. परकीय चलन बुडेल. देशाच्या तिजोरीवर ताण पडेल. एखाद्या वटवृक्षाने स्वतःच 'बोनसाय' बनावे तसे मानवी जीवन खुरटलेलं होईल.
पण यातून काही फायदेही होतील. माणूस निसर्गाच्या जवळ जाईल. प्रदूषणाच्या छायेतुन बाहेर पडेल, कारण कारखाने पक्षाघात झाल्यासारखे होतील. हातपाय वापरल्याने कात टाकलेल्या सापाप्रमाणे त्याच्यातील चैतन्य पुन्हा सळसळू लागेल...अज्ञात साठे-तेलाचे तो हुडकून काढेल, आणि नाहीच मिळाले तर पर्यायी इंधन तो शोधल-माणूस तसा हिकमती आहे !
सौरऊर्जा, समुद्राच्या लाटांपासून तसेच, अणुऊर्जा असे काही ना काही तो शोधेलच. 'गरज ही शोधाची जननी आहे.' माणसाजवळ तेवढी क्षमता नक्कीच आहे. चंद्रावर पाऊल उमटवणाऱ्या मानवी मेंदूला अशक्य काहीच नाही. खनिज तेल संपल्याने जीवनमान दोन पावलं मागे येईल ते पुढची मोठी उडी घेण्यासाठीच !
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध
aarsa-nasta-tar-marathi-nibandh |
aarsa nasta tar essay in marathi language
काचेचा शोध म्हणजे मानवाच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा एक आविष्कार ! काचेच्या शोधामुळे सुधारणेची अनेक दालने खुली झाली. मूलभूत गरजांच्या शोधयात्रेत स्वत:च्या प्रतिबिंबाचाही शोध लागला. पाण्यात डोकावताना प्रतिबिंब दिसले व काचेच्या शोधातून आरशाचा जन्म झाला.
आरसा माणसाचा जीवनसाथी! घरात त्याचे स्थान अगदी महत्त्वाच्या जागी असते. स्वत:चे प्रतिबिंब पाहिल्याशिवाय माणसाची दैनंदिनी सुरूच होत नाही; आणि हा आरसाच नसता तर... 'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे।' म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यांत बघून आपले प्रतिबिंब शोधावे लागले असते.
प्राचीनकाळी राजेलोकांना आपल्या रूपवती राण्यांसाठी 'आरसेमहाल' उभारताच आले नसते. सुमंतांना बाल प्रभुरामचंद्रांचा 'चंद्र' पाहण्याचा हट्ट पुरा करताच आला नसता. आरसा नसता तर अल्लाउद्दीन खिलजीला लावण्यवती पद्मिनीचे दर्शन झालेच नसते.
रूप आपुले छंद मनाला॥
आरसा नसता तर शास्त्रज्ञांचे थोडे का अडले असते? आरसा नसता तर गुणित प्रतिमा मिळविता आल्या नसत्या. प्रयोगशाळेत तर आरशावाचून फारच अडले असते. नवीन नवीन उपकरणे निर्माण करताच आली नसती. पाणबुड्यांना पाण्यावरील शत्रूची जहाजे दिसलीच नसती.
aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध
आरशात पधिनीची मोहक छबी पाहून तो परतला.
घरात छोट्या बेबीचा किंवा बाळाचा वाढदिवस आहे.
नद्या असणार? शिवाय गढूळ पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल? आजकाल घरात कपाट घेताना आरसा आधी पाहिला जातो. लग्नात, इतरप्रसंगी भेट देण्यासाठी आरसा वापरला जातो.
मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi |
- चंद्राचे आकर्षण
- प्रभू रामाला चंद्र हवा
- वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न
- चंद्रमोहिमेत सहभागी व्हावे
- चंद्रावरचा ससा
- चंद्रावरून पृथ्वी कशी दिसेल
- संदेशवाहिनी
- उपाहारगृह
- पृथ्वी, चंद्र ये-जा उत्सुकता.
aai sampavar geli tar essay in marathi | आई संपावर गेली तर निबंध
'आई, माझं गणिताचे पुस्तक कोठे आहे?' 'आई, हा निबंध कसा लिहू ग? काही मुद्दे सांग ना.' 'आई, या रविवारी जिमखान्याची सहल आहे. काय देशील डबा?' 'आई, यंदा दिवाळीत फराळाचे पदार्थ भरपूर करायचे हं!' 'आई, मला बॅडमिंटनची रॅकेट हवी आहे. कधी घेशील सांग?' अशी आपली हर एक कामे आईशी निगडित असतात. पण समजा, आई संपावर गेली, तर ...
aai sampavar geli tar essay in marathi |
आई संपावर गेल्यास घराचे घरपणच हरवेल. सकाळी उठायला हमखास उशीर होईल; कारण नेहमीप्रमाणे लवकर जागे करण्यास आई नसेल. न्याहारीला टेबलावर केवळ कोरडा पाव असेल. लोणी स्वतः लावून घ्यायचे म्हणजे केवढे कठीण! जवळजवळ उपासमारच! (हे पण वाचा माझी आई मराठी निबंध)
शाळेत जातानाही किती तरी गडबड झालेली असेल. कंपासपेटीच विसरल्यामुळे लिहायला पेन्सिल, पेन काहीच नसणार ! मग त्यासाठी शिक्षकांची बोलणी खावी लागणार. मधल्या सुट्टीसाठी डबाही नसणार, कारण न विसरता सुट्टीसाठी डबा देणारी आई संपावर गेलेली असणार.
शाळेतून दमून भागून घरी यावे, तर स्वयंपाकघरातील सारा पसारा आवरणार कोण? टेबलावर ब्रेड, लोणचे, चटणी ठेवलेली असणार आणि बरोबर एक चिठ्ठीही असणार. 'आई संपावर आहे.' या नुसत्या कल्पनेनेच माझे डोळे पाझरू लागले. आईच्या अपार वात्सल्याची ती जणू पावतीच होती!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद .
“आई, तू कधीही संपावर जाऊ नकोस....तुझ्या तळहाताचा पाळणा तुझ्या नजरेची पखरण,तुझ्या स्नेहाची बरसात तुझ्या संस्काराची काय बात?अस्तित्व माझे तुझ्यात दुसरे काही नको या जगात...."
me pantpradhan zalo tar marathi nibandh | मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध
माझ्या देशाची उच्च सांस्कृतिक परंपरा, चमकदार इतिहास, त्यातील नररत्ने, सामर्थ्यशील शालीनता हे सारे मला या देशाचा पंतप्रधान होण्यास मोह पाडतात. हा काटेरी मुकुट म्हणूनच मी आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे.
me pantpradhan zalo tar marathi nibandh |
पण अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे “लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही" हे मी बिंबविण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करीन.
तळागाळाच्या साऱ्याच जनतेला अन्न, वर, निवारा मिळालाच पाहिजे याकडे माझा कटाक्ष राहील.
मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi
आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध
माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्पनात्मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi
यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्पनात्मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh
yantra sampavar geli tar marathi nibandh |
नेहमी यावेळी गजबजलेली स्टेशने आज शांत होती. म्हणजे माणसे जा-ये करीत होती; पण गाड्याच धावत नव्हत्या. 'पूतळ्याच्या' खेळातल्याप्रमाणे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. बेकरीत ब्रेड नव्हता. मार्केटात भाजी नव्हती. शहरातील सारे जीवन विस्कळीत झाले होते. पाण्याच्या अभावामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध
Essay on sun in marathi
Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi
दहावी - बारावी इयत्तेतील विदयार्थ्यांचे जे काही हाल होतात, ते अन्य लोकांना समजणे अशक्यच आहे. ज्यांना हे समजून घ्यायचे असतील, त्यांनी या दहावीबारावीच्या परीक्षेला बसून बघावेच ! सुखाची झोप टाकून पहाटे पहाटे उठणे, पेंगुळणाऱ्या डोळ्यांनी अभ्यासाला बसणे, धावत-पळत क्लासला जाणे. पुन्हा घुऊन येऊन गृहपाठ . मग शाळेत जाणे,
शाळेतून आल्यावर पुन्हा क्लासला जाणे, घरी आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणे व रात्री उशिरापर्यंत सराव प्रश्नपत्रिका सोडवायला बसणे या रहाटगाड्यात अक्षरशःआम्ही पिळून निघतो ! सकाळी जबरदस्तीने उठताना वाटते - हा सूर्य उगवला नाही तर किती बरे होईल ! सगळी पीडा नाहीशी होईल !
अमूक वाजले; आता हे करा; तमूक वाजले; आता ते करा. असल्या जाचातून मुक्तता होईल. सूर्यच नसल्याने घामाच्या धारा नसतील आणि कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण व्हावे लागणार नाही !
surya-ugawala-nahi-tar-essay-in-marathi |
मी मात्र त्याच वेळी माझे दुसरे मन मला सावध करू लागले - खरेच का, सूर्य नसेल तर फक्त मजाच असेल? थोडा वेळ विचार करताच भविष्यातील एकेक बाब डोळ्यासमोर साकार होऊ लागली. भीतीदायक विचारांचे मोहोळच उठू लागले. सूर्य उगवलाच नाही, तर शाळा नसेल, हे वरवर ठीक वाटते. पण शाळेत मिळणारा केवढा आनंद आयुष्यातून वजा होईल !
मित्र नसतील, मग मित्रांबरोबर संध्याकाळचे भटकणे कसे घडेल? मित्रांबरोबरची सगळी धमालच नष्ट होईल ! मैदानावर कधी मनसोक्त खेळताच येणार नाही ! कायम घरात नि घरात ! टी. व्ही., पत्ते, कॅरम किती वेळ चालणार? अंथरुणात लोळत तरी किती वेळ राहणार?
निबंध 2
सूर्य संतापला, तर... मराठी निबंध
सूर्य उगवला नाही तर
- autobiography of sun in marathi
- atmakatha of sun in marathi
- surya information in marathi
- surya che mahatva in marathi
- surya chi atmakatha in marathi
- marathi nibandh surya
- surya ugavala nahi tar short essay in marathi